शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

अंबाबाई मंदिर परिसरातील गर्दीवर नियंत्रण हवे : भाविकांचा श्वास कोंडतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:14 IST

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात भाविकांच्या सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले असले तरी जेथे खºया अर्थाने विकासाची गरज आहे तो मंदिराच्या

ठळक मुद्देशाळांचे योग्य ठिकाणी स्थलांतर व्हावे; फेरीवाले, अतिक्रमणे हटवावीतपुनर्वसनासाठी फेरीवाला संघटनांचे सहकार्य गरजेचे कपिलतीर्थ मार्केटमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स फायदेशीर

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात भाविकांच्या सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले असले तरी जेथे खºया अर्थाने विकासाची गरज आहे तो मंदिराच्या भोवतालचा परिसरच यातून वगळला आहे. शाळांची गर्दी, रस्ते अडविलेले फेरीवाले, वाहनांची कोंडी, बेशिस्त पार्किंग अशा बजबजपुरीतच देवी अडकली आहे. एका तीर्थक्षेत्रासाठी आवश्यक असलेली शांतता, प्रसन्नता यायची असेल तर कपिलतीर्थ मार्केटच्या बहुमजली इमारतीच्या प्रस्तावात फेरीवाल्यांचे पुनर्वसन आणि बाह्य परिसरात येथील शाळांचे स्थलांतर करणे गरजेचे आहे. असे झाल्यास हा परिसर मोकळा श्वास घेऊन भाविकांना निवांतपणे फिरण्याचा आणि खरेदीचाही देईल.

अंबाबाई मंदिराला लागून विद्यापीठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आहे. समोर इंदुमती गर्ल्स हायस्कूल आहे. या शाळांमधील मिळून जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांची फार मोठी गर्दी होते. येथेच विद्यार्थ्यांच्या सायकलींसह दुचाकी, चारचाकी वाहने लावली जातात. मेन राजाराम हायस्कूलचेही विद्यार्थी येथे असतात. त्यामुळे या शाळांचे स्थलांतर करून त्या शाळांच्या इमारतींचा उपयोग दर्शनमंडप, यात्री निवास, अन्नछत्रसारख्या भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी करता येईल. शाळा गावाबाहेर नेल्या तर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांची जागा त्यांना दिल्यास विद्यार्थ्यांचीही जवळच सोय होईल.

मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेरील प्रांत कार्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहात कमालीची अस्वच्छता असते. वाहत आलेले पाणी, दुर्गंधीचे ओंगळवाणे दर्शन घेत आणि नाकाला रुमाल लावत येथून भाविक मंदिरापर्यंत जातात. महाद्वाराच्या कमानीपर्यंत आवळे-चिंचावाल्यांनी मोठ्या बुट्ट्या मांडून मंदिरात जाण्या-येण्याचा रस्ताच अडवून ठेवला आहे. दुतर्फा असलेल्या दुकानदारांनी बाहेर तीन-चार फूट मांडव व पत्रे मारून अतिक्रमण केले आहे. त्यांतील अनेक दुकानदार समोरची जागा फेरीवाल्यांना देऊन दुहेरी उत्पन्न लाटत आहेत. गजरेवाले, बांगड्यावाले, पिनावाले स्टॅँड लावून बसलेले असतात. तेथेच चप्पल स्टॅँडही आहे. या गर्दीत मंदिरात जायला-यायला एका माणसापुरता रस्ता राहतो. गर्दीच्या वेळी श्वास गुदमरायला होते.

एवढी गर्दी पाहून एकही फेरीवाला थोडेसे बाजूला होऊन रस्ता देण्याचे सौजन्य दाखवित नाही. तेथून पुढे सरस्वती टॉकीजच्या चौकापर्यंत हीच अवस्था आहे. दुकानदार, फेरीवाले, फळ-भाजी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते, रिक्षावाले आणि भरीस भर म्हणजे दुचाकी व चारचाकी वाहने, अशा सगळ्या भाऊगर्दीतून वाट काढत चालणे म्हणजे जीव नकोसा होतो. इकडे जोतिबा रोडचीही स्थिती अशीच.

अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्यातच रस्ते आणि फेरीवाल्यांचा विचार होणे अपेक्षित होते; पण अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचा अभाव होताच; शिवाय नवा प्रस्ताव म्हटले की विरोध हा ठरलेलाच. शिवाय लगेच राजकीय दबाव टाकला जात असल्याने महापालिकेनेही त्यात स्वारस्य दाखविले नाही.भाजीवाले-फेरीवाल्यांचे पुनर्वसनदोन-तीन वर्षांपूर्वी महापालिकेने कपिलतीर्थ मार्केटच्या जागेवर बहुमजली पार्किंगचा प्रस्ताव केला होता. मात्र, भाजीवाल्यांनी त्याला विरोध केला. विकास आराखड्यानुसार आता सरस्वती टॉकीजच्या जागेत बहुमजली पार्किंग करण्यात येणार आहे. महाद्वार रोड, ताराबाई रोड आणि जोतिबा रोडवर मिळून साडेतीनशेच्यावर फेरीवाले आहेत. त्यामुळे कपिलतीर्थ मार्केटच्या तळमजल्यावर भाजी मंडई, वरच्या मजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून तेथेच फेरीवाल्यांचे पुनर्वसन करता येईल. अंबाबाई भक्तांसाठी चालविल्या जाणाºया महालक्ष्मी अन्नछत्रासाठीही मोठी जागा मिळेल. सरस्वती टॉकीज येथे उभारण्यात येणाºया बहुमजली पार्किंगच्या प्रस्तावातही हे करता येईल. त्यासाठी भाजी विक्रेते व फेरीवाल्या संघटनांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. 

महापालिकेने फेरीवाल्यांना सोयीसुविधा देऊन योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे. त्या बदल्यात काही रक्कम आकारावी. असे केल्याने महापालिकेचेही उत्पन्न वाढेल. फेरीवाल्यांनाही व्यवसाय करण्यास अडचणी येणार नाहीत.- महेश उरसाल (उपाध्यक्ष, महाद्वार रहिवासी व्यापारी संघ)अंबाबाई मंदिराचा पूर्ण परिसर फेरीवाल्यांनी वेढला आहे. फेरीवाल्यांनी रस्त्यांवर व्यवसाय करू नये आणि भाविकांना मोकळेपणाने फिरता यावे यासाठी महापालिकेने फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे. त्यासाठी कपिलतीर्थ मार्केट किंवा सरस्वती टॉकीज येथील बहुमजली इमारतींचा विचार व्हावा.- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती