शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
7
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
8
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
9
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
10
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
11
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
12
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
13
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
14
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
15
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
16
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
17
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
18
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
19
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
20
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक

अमरनाथ यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणार सहा हजार भाविक, नोंदणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 10:22 IST

कोल्हापूर : धार्मिक महत्त्व आणि निसर्गसौंदर्याचे देणे लाभलेल्या अमरनाथ यात्रेसाठी कोल्हापुरातून यंदा सहा ते सात हजार भाविक रवाना होत ...

ठळक मुद्देअमरनाथ यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणार सहा हजार भाविकयात्रा आॅगस्टमध्ये, नोंदणी सुरू

कोल्हापूर : धार्मिक महत्त्व आणि निसर्गसौंदर्याचे देणे लाभलेल्या अमरनाथ यात्रेसाठी कोल्हापुरातून यंदा सहा ते सात हजार भाविक रवाना होत आहेत. यंदा ही यात्रा २० जून ते १५ आॅगस्ट या कालावधीत होत असून, त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे.अमरनाथ येथे दरवर्षी २० जून ते आॅगस्ट या दीड महिन्याच्या कालावधीत शिवशंकराचे अधिष्ठान असलेल्या बर्फाचे शिवलिंग तयार होते. या शिवलिंगाचे दर्शन घ्यायला आणि भारतातील स्वर्ग असलेले जम्मू-काश्मीरचे पर्यटन करण्यासाठी देशभरातून लाखो लोक अमरनाथ यात्रेसाठी जातात.

समुद्रसपाटीपासून १४ हजार फूट उंची असल्याने नैसर्गिकदृष्ट्या खडतर प्रवास आणि आत्मघाती हल्ले या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंच्या सोईच्या दृष्टीने जम्मू-काश्मीर शासन, सीआरपीएफ, बीएसएफ अशा सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयातून दरवर्षी यात्रेची तारीख ठरविली जाते. यामध्ये भाविकांची सुरक्षा, प्रवास व जेवणाची सोय, राहण्यासाठी लंगरची उभारणी, स्वच्छतागृह अशा सोईसुविधा निर्माण केल्या जातात. यात्रेआधी एक महिना ही तयारी सुरू असते.यंदा २० तारखेपासून या यात्रेला सुरुवात होत असून, त्यासाठी आजवर देशभरातून दोन लाख ६० हजार भाविकांनी नोंदणी केली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सहा ते सात हजार भाविकांचा समावेश आहे. पहिल्यांदाच अमरनाथ यात्रेला जाणारे भाविक टूर कंपन्या अथवा टूर आॅपरेटर्सना प्राधान्य देतात. त्यांची संख्या जवळपास ६० टक्के आहे; तर दरवर्षी अथवा दर दोन वर्षांनी अशी वारंवार यात्रा करणाऱ्या भाविकांना तेथील परिसर चांगला माहीत झाल्याने ते स्वतंत्ररीत्या जाणे पसंत करतात.प्रवास असा...देशातील विविध भागांतील यात्रेकरू जम्मूमध्ये एकत्रित येतात. येथून अमरनाथ येथील गुहेपर्यंत जाण्यासाठी पहेलगाम, सोनमर्ग, बालटाल असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय हेलिकॉप्टरचीसुद्धा सोय आहे. पायी यात्रा करायची असेल तर चार दिवस लागतात. कोल्हापूर ते अमरनाथ आणि पुन्हा कोल्हापूर असा जवळपास १० दिवसांचा यात्रेचा कालावधी असतो.

धार्मिक, आध्यात्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्यादेखील चमत्कार असलेली अमरनाथ यात्रा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी. काश्मीर व्हॅलीमधील हे सर्वांगसुंदर ठिकाण आहे; पण यात्रेला जाण्यापूर्वी भाविकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेणे आणि शारीरिक क्षमता वाढविणे गरजेचे आहे.- विनोद कांबोज, ज्येष्ठ गिर्यारोहक व साहसी पर्यटनाचे आयोजक 

 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूर