शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डेडलाईन संपली, तरी अमृतची कामे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:19 IST

भारत चव्हाण / कोल्हापूर : शहरात अमृत योजनेतून सुरू असलेल्या जलवाहिन्या, ड्रेनेजलाईन टाकण्यासह बारा जलकुंभ बांधण्याच्या कामाची ‘डेडलाईन’ संपली, ...

भारत चव्हाण / कोल्हापूर : शहरात अमृत योजनेतून सुरू असलेल्या जलवाहिन्या, ड्रेनेजलाईन टाकण्यासह बारा जलकुंभ बांधण्याच्या कामाची ‘डेडलाईन’ संपली, तरी कामे पन्नास टक्के अपूर्णच राहिली आहेत. तांत्रिक अडचणी, ठेकेदाराचे दुर्लक्ष, कामावरील नियंत्रणाचा अभाव यामुळे कामे अपूर्ण असली, तरी ती पूर्ण झाली नाहीत, तर थेट पाईपलाईनचे पाणी दिवाळीपर्यंत कसे मिळणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

काळम्मावाडी धरणातून शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची योजना आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यावर्षी दिवाळीचे पहिले स्नान दुधगंगा धरणातील पाण्यानेच होईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. त्यामुळे या योजनेबाबात शहरवासीयांत उत्सुकता लागून राहिली आहे.

थेट पाईपलाईन योजनेचे पाणी येईल, तेव्हा शहरातील वितरण व्यवस्था अधिक सक्षम करावी लागणार असल्यामुळे ही कामे अमृत योजनेतून हाती घेण्यात आली आहेत. शहरांतर्गत जलवाहिन्या टाकणे, जुन्या वाहिन्या बदलणे, विविध ठिकाणी १२ जलकुंभ उभारणे अशा कामांसाठी २०१७ मध्ये १७५ कोटींचा निधी मंजूर झाला. दास ऑफशॉवर कंपनीची ठेकेदार म्हणून नियुक्ती झाली. ड्रेनेजलाईनची कामे ३३ महिन्यांत, तर पाणी पुरवठ्याची कामे ३० महिन्यांत पूर्ण करायची होती. कामात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी व कोरोनाची साथ यामुळे ठेकेदारास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. परंतु डेडलाईन संपली, तरी कामे पन्नास टक्केच झाली आहेत.

पॉईंटर -

-ही आहे कामाची गती -

- शहरात १२ जलकुंभांपैकी आठ जलकुंभांचे काम सुरू.

- आठही जलकुंभांचे काम २५ टक्केच पूर्ण.

- चार जलकुंभांच्या कामाला अद्याप सुरुवातच नाही.

- ३९६ किमीपैकी २४७ किमी जलवाहिनीचे काम पूर्ण.

- ११३ किमी पैकी ५९ किमी ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण.

- येथे बांधले जातायत जलकुंभ -

- कसबा बावडा, गोळीबार मैदान, शिवाजी पार्क, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, कदमवाडी, सम्राटनगर, पुईखडी, राजारामपुरी ९ वी गल्ली (अंशत: काम पूर्ण) -

- ताराबाई पार्क, सायबर चौक, आपटेनगर, बोंद्रेनगर. (अद्याप कामाला सुरुवात नाही)

‘डेडलाईन’संपली, कारवाई काय करणार?

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी २४ नोव्हेंबर २०२० रोजी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत केवळ तीस टक्केच काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी ठेकेदाराचे प्रतिनिधी, एमजेपीचे अधिकारी यांना धारेवर धरले होते. एवढेच नाही,तर दि. ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण करावीत अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला होता. डेडलाईन संपली तरी, कामे अपूर्णच असल्यामुळे आता प्रशासक बलकवडे काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

- जागा संपादनाचे प्रस्ताव देणार - घाटगे

चार जलकुंभ हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेवर बांधायचे असून, त्यासाठी नगरविकास विभागामार्फत पाणी पुरवठा विभागाला प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले. कामाला सुरुवात होऊनही तीन वर्षे प्रस्ताव का पाठविले गेले नाहीत, हेच कळत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महापालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाच त्यातून समोर आला आहे.