शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे काम बंद पाडणाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा पर्यायी शिवाजी पूल : नागरी कृती समिती लेखी म्हणणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:03 IST

कोल्हापूर : शिवाजी पुलावर घडलेल्या बस दुर्घटनेस जबाबदार धरून पर्यायी पुलाचे काम बंद पाडणाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा,

कोल्हापूर : शिवाजी पुलावर घडलेल्या बस दुर्घटनेस जबाबदार धरून पर्यायी पुलाचे काम बंद पाडणाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या सदस्यांनी करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासमोर जबाब नोंदविला.

त्याशिवाय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. विवेक घाटगे यांनीही कृती समितीच्या बाजूने युक्तिवाद मांडला. दरम्यान, आणखी संबंधितांचे जबाब नोंदवून त्याबाबतचा अहवाल पुढील ५ दिवसांत पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना देण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक गुरव यांनी दिली.

शिवाजी पुलावर मिनी बस दुर्घटना घडल्यानंतर सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना निवेदन दिले होते. ज्या अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे, तथाकथित पर्यावरणप्रेमी, तक्रारदाराने पर्यायी पुलाचे काम बंद पाडले आणि धोकादायक शिवाजी पूल नागरिकांना वापरण्यास भाग पाडले त्यातूनच २६ जानेवारीला बस दुर्घटना घडून १३ जणांचा बळी गेला. त्यामुळे संबंधितांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, असे म्हटले होते.

त्यानुसार मंगळवारी दुपारी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, अशोक पोवार, आण्णा पोतदार, अजित सासने यांचे लेखी जबाब नोंदविले. तसेच सन २०१५मध्ये राष्टÑीय महामार्ग अभियंत्यांनी हा शिवाजी पूल धोकादायक व कालबाह्य झाल्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच तथाकथित पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड आणि दिलीप देसाई यांच्याही तक्रारीमुळे हे काम बंद पडल्याने त्यांनाही जबाबदार धरण्यात यावे, असे जबाबात नोंदविले आहे.पाच दिवसांत अहवाल देणार : गुरवआणखी काही संबंधितांचे जबाब नोंदवून पुढील पाच दिवसांत याबाबतचा अहवाल तयार करून तो पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना देण्यात येणार असून, त्यानंतर मनुष्यवधाचे गुन्हे नोंदविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी दिले.शिवाजी पुलावरील बस दुर्घटनेस जबाबदार धरून पर्यायी पुलाचे काम बंद पाडणाºयांवर गुन्हा नोंदवावा यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या सदस्यांनी सूरज गुरव यांच्यासमोर जबाब नोंदवला. यावेळी अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, बाबा पार्टे, अ‍ॅड. विवेक घाटगे, आर. के. पोवार, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अशोक पोवार, आदी उपस्थित होते..