शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पुलाचे काम बंद पाडणाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा पर्यायी शिवाजी पूल : नागरी कृती समिती लेखी म्हणणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:03 IST

कोल्हापूर : शिवाजी पुलावर घडलेल्या बस दुर्घटनेस जबाबदार धरून पर्यायी पुलाचे काम बंद पाडणाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा,

कोल्हापूर : शिवाजी पुलावर घडलेल्या बस दुर्घटनेस जबाबदार धरून पर्यायी पुलाचे काम बंद पाडणाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या सदस्यांनी करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासमोर जबाब नोंदविला.

त्याशिवाय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. विवेक घाटगे यांनीही कृती समितीच्या बाजूने युक्तिवाद मांडला. दरम्यान, आणखी संबंधितांचे जबाब नोंदवून त्याबाबतचा अहवाल पुढील ५ दिवसांत पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना देण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक गुरव यांनी दिली.

शिवाजी पुलावर मिनी बस दुर्घटना घडल्यानंतर सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना निवेदन दिले होते. ज्या अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे, तथाकथित पर्यावरणप्रेमी, तक्रारदाराने पर्यायी पुलाचे काम बंद पाडले आणि धोकादायक शिवाजी पूल नागरिकांना वापरण्यास भाग पाडले त्यातूनच २६ जानेवारीला बस दुर्घटना घडून १३ जणांचा बळी गेला. त्यामुळे संबंधितांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, असे म्हटले होते.

त्यानुसार मंगळवारी दुपारी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, अशोक पोवार, आण्णा पोतदार, अजित सासने यांचे लेखी जबाब नोंदविले. तसेच सन २०१५मध्ये राष्टÑीय महामार्ग अभियंत्यांनी हा शिवाजी पूल धोकादायक व कालबाह्य झाल्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच तथाकथित पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड आणि दिलीप देसाई यांच्याही तक्रारीमुळे हे काम बंद पडल्याने त्यांनाही जबाबदार धरण्यात यावे, असे जबाबात नोंदविले आहे.पाच दिवसांत अहवाल देणार : गुरवआणखी काही संबंधितांचे जबाब नोंदवून पुढील पाच दिवसांत याबाबतचा अहवाल तयार करून तो पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना देण्यात येणार असून, त्यानंतर मनुष्यवधाचे गुन्हे नोंदविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी दिले.शिवाजी पुलावरील बस दुर्घटनेस जबाबदार धरून पर्यायी पुलाचे काम बंद पाडणाºयांवर गुन्हा नोंदवावा यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या सदस्यांनी सूरज गुरव यांच्यासमोर जबाब नोंदवला. यावेळी अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, बाबा पार्टे, अ‍ॅड. विवेक घाटगे, आर. के. पोवार, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अशोक पोवार, आदी उपस्थित होते..