शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

संभाव्य पूर टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:24 IST

कोल्हापूर : पाटबंधारे विभागाने मागील दहा वर्षांचा अभ्यास करून पूर नियंत्रणाबाबतचे नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये दि. २५ ते ...

कोल्हापूर : पाटबंधारे विभागाने मागील दहा वर्षांचा अभ्यास करून पूर नियंत्रणाबाबतचे नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये दि. २५ ते ३० जुलै आणि दि. ८ ते १२ ऑगस्टदरम्यान पूर येतो. २०१९ ला आलेल्या पुराचा अनुभव पाहता, मागी वर्षी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पध्दतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक ऑनलाईन झाली. त्यात खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव सहभागी झाले. जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षात प्रत्येक विभागाचा एक प्रतिनीधी कार्यरत असतो. सातारा, सांगली येथील पाटबंधारे विभागाच्या संपर्कात याही जिल्ह्याचा विभाग असून, येणाऱ्या आपत्तीपासून सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याला नियंत्रित ठेवू, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत मासाळ यांनी पूर्वतयारीची माहिती दिली. आर. के. पोवार, सर्जेराव पाटील, शिवाजी मोरे, सत्यजित जाधव, अशोक रोकडे, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी, पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष रूपाली धडेल, ए. बी. पाटील यांनी काही सूचना मांडल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

चौकट

नवीन सात बोटी घेण्यात येणार

कोविडच्या अनुषंगाने संभाव्य पूरग्रस्त गावातील लोकांच्या स्थलांतरणाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये मोटराईज्ड बोटी असून, नवीन सात बोटी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना

धैर्यशील माने : स्थलांतरणाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा.

प्रकाश आवाडे : धरणातील पाणी सोडायचे नियोजन हवे.

अरुण लाड : अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याबाबत समन्वय हवा.

चंद्रकांत जाधव : गेल्यावर्षीप्रमाणे यंदा प्रशासनाने नियोजन करावे.

राजेश पाटील : चंदगडला मोटरबोटची आवश्यकता आहे. महावितरणने आधीच साधनसामग्रीची तयारी ठेवावी.

बजरंग पाटील : गगनबावडा तालुक्यातील तीन धरणांतील गाळ काढावा.

फोटो (१७०५२०२१-कोल-पूर नियोजन बैठक) : कोल्हापुरात सोमवारी मान्सूनपूर्व आढावा बैठक ऑनलाईन झाली. त्यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी शेजारी शैलेश बलकवडे, बजरंग पाटील, कादंबरी बलकवडे, आदी उपस्थित होते.

===Photopath===

170521\17kol_2_17052021_5.jpg

===Caption===

फोटो (१७०५२०२१-कोल-पूर नियोजन बैठक) : कोल्हापुरात सोमवारी मान्सून पूर्व आढावा बैठक ऑनलाईन झाली. त्यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी शेजारी शैलेश बलकवडे, बजरंग पाटील, कादंबरी बलकवडे, आदी उपस्थित होते.