शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

प्रगत तंत्रज्ञानासह तलाठीही बनले अद्ययावत

By admin | Updated: April 29, 2015 01:03 IST

कोल्हापूरही अद्ययावत : महिनाभरात देणार संगणकावर ७/१२ उतारे

भारत चव्हाण - कोल्हापूर  नवीन तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामकाजात उपयोग करणे म्हणजे सुरुवातीच्या काळात जाचक वाटणारी गोष्ट असते. खासगी असो की शासकीय कर्मचारी असो, प्रारंभी कंटाळा करत आजचे काम उद्यावर ढकलण्याच्या मानसिकतेत असतात पण जेव्हा हेच काम अपरिहार्य ठरते, तेव्हा मात्र त्यात लक्ष घालावेच लागते. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ७/१२ व फेरफार उतारे संगणकावरून प्रिंट काढून देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तलाठीही सहा महिने अडखळले. प्रशिक्षण घेतल्यावर मात्र अवघ्या दीड वर्षांत जिल्ह्यातील तब्बल दहा लाखांहून अधिक ७/१२ उताऱ्यांची नोंद संगणकावर करून नव्या तंत्रज्ञानासह आपणही अद्ययावत बनल्याची साक्ष दिली. गावपातळीपासून शासकीय कागदपत्रांतून हाताने लिहीणारे तलाठी आता येत्या महिन्याभरातच संगणकासमोर बसून ७/१२ उतारे देताना नागरिकांना पाहायला मिळणार आहे. राज्य व केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’चा नारा दिला त्याचवेळी शासकीय कामात आमुलाग्र बदल होणार असल्याची जाणीव झाली होती. राज्यभरात सर्व जिल्ह्यात यापुढे ७/१२ व फेरफार उतारे संगणकावर दिले जाणार आहेत. हाताने लिहून देण्याची पद्धत त्यामुळे रद्द होणार आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने हे आव्हानात्मक काम स्वीकारले आणि दोन वर्षांच्या अथक प्रयत्नातून ते पूर्णही केले. मुळात हे काम तलाठ्यांनाच करायचे होते पण पहिले सहा महिने सर्वच तलाठी प्रचंड तणावाखाली आले. मात्र, त्यांना प्रशिक्षण देऊन कसे काम करायचे हे शिकविले गेले. त्यामुळे हळू-हळू हे काम पुढे सरकत राहिले. आधी जिल्ह्यातील सर्व तलाठी अद्ययावत झाल्यावर कामाला गती मिळाली. केवळ दीड वर्षांत अत्यंत किचकट तसेच गुंतागुंतीचे वाटणारे काम पूर्ण झाले. या दीड वर्षांत बारा तालुक्यांत १० लाखांंहून अधिक सातबारा उताऱ्याच्या नोंदी संगणकावर करण्यात आल्या. या कामासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्यामध्ये प्रत्येक सातबारा उताऱ्यांच्या नोंदी बिनचूक करण्याचे आव्हान होते. जिल्ह्यातील काही सातबारा उतारे हे १० ते १२ पानांचे आहेत. त्यांचे मालक सतत बदलत गेले. त्यामुळे जेवढे मालक होते, त्यांच्या नोंदी त्यावर येणार आहेत. तलाठ्यांच्या संघटनेने विनंती केल्यामुळे सातबारा उताऱ्यांची आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने एकदा खात्री करून घेण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे प्रिंट काढून झालेल्या नोंदी योग्य व बिनचूक आहेत का याची खात्री केली जात आहे. याशिवाय उताऱ्यांत काही चुका असल्यास त्या महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १५५ प्रमाणे संबंधितांना दुरुस्त करून घेता येणार आहेत. - जिल्ह्यात तलाठ्यांची संख्या ४९१ - जिल्ह्यात १० लाख सातबारा उताऱ्यांच्या संगणकावर नोंदी. - सर्वाधिक १ लाख ९० हजार सातबारा उतारे करवीर तालुक्यात. -सर्वांत कमी १२ हजार ५०० सातबारा उतारे गगनबावडा तालुक्यात.- सर्व सातबारा उताऱ्यांच्या सीडी तयार, खात्री करण्याचे काम सुरू. - सप्टेंबरपासून त्यावर पीक नोंदणी होणार संगणकावर सातबारा उतारे देण्याचे काम पूर्ण झाले असून प्रायोगिक उतारेही काढण्यात आले. आता केवळ खात्री केली जात आहे. येत्या महिन्याभरात आॅनलाईन काम सुरू होईल. प्रताप पाटील, अतिरिक्त जिल्हा सूचना/ विज्ञान अधिकारी कसे झाले काम पूर्ण ? संगणकावर सातबारा उतारे देण्याकरीता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येक उतारानिहाय माहिती भरण्यात आली. जमिनीचे मालक किती वेळा बदलले,त्यांचे व्यवहार कधी झाले, जागेचे क्षेत्र किती आहे, जमीन किती आणेवारीतील आहे, पीक कोणते आहे, यासंबंधीची सर्व माहिती त्यात भरण्यात आली आहे. काही तलाठ्यांनी या कामाकरीता आॅपरेटर्सचे सहकार्य घेतले. या कामावर जिल्हा स्तरावर नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण हे तर तालुकास्तरावर तहसीलदार काम पाहत आहेत.