शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

घळभरणीच्या ठिकाणी आत्महत्येस परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST

उत्तूर : आंबेओहोळ (ता. आजरा) येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करतो, असे धरणग्रस्तांच्या बैठकीत आश्वासन देणाऱ्या जिल्हाधिकारी यांनी ...

उत्तूर : आंबेओहोळ (ता. आजरा) येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करतो, असे धरणग्रस्तांच्या बैठकीत आश्वासन देणाऱ्या जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन न होता घळभरणीस परवानगी कोणी दिली? असा थेट सवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून धरणग्रस्तांनी केला आहे.

घळभरणी सुरू झाल्याने धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी, कोल्हापूर येथे जाऊन निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद केले आहे, ‘आधी पुर्नवसन मगच... धरण‘ असा कायदा असताना घळभरणीस परवानगी कोणाची घेतली याचा खुलासा करावा. आपण परवानगी दिली नसेल तर चालू असलेल्या कामाला अनुसरून संबंधित ठेकेदार, पाटबंधारेचे अधिकारी व इतर जबाबदार लोकांवर तत्काळ कारवाई करून धरणाचे काम थांबवावे, पुनर्वसनाअभावी घळभरणी पूर्ण झाली तर जिवंतपणी धरणग्रस्त मरतील; त्यापेक्षा आम्हाला इच्छामरणास परवानगी द्यावी अथवा घळभरणीमध्ये आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

निवेदनावर सदानंद व्हनबट्टे, महादेव खाडे, सचिन पावले, अशोक पावले, संदीप पुंडपळ, शंकर पावले, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, पुनर्वसन मंत्री यांना देण्यात आल्या आहेत.