शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

घळभरणीच्या ठिकाणी आत्महत्येस परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST

उत्तूर : आंबेओहोळ (ता. आजरा) येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करतो, असे धरणग्रस्तांच्या बैठकीत आश्वासन देणाऱ्या जिल्हाधिकारी यांनी ...

उत्तूर : आंबेओहोळ (ता. आजरा) येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करतो, असे धरणग्रस्तांच्या बैठकीत आश्वासन देणाऱ्या जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन न होता घळभरणीस परवानगी कोणी दिली? असा थेट सवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून धरणग्रस्तांनी केला आहे.

घळभरणी सुरू झाल्याने धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी, कोल्हापूर येथे जाऊन निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद केले आहे, ‘आधी पुर्नवसन मगच... धरण‘ असा कायदा असताना घळभरणीस परवानगी कोणाची घेतली याचा खुलासा करावा. आपण परवानगी दिली नसेल तर चालू असलेल्या कामाला अनुसरून संबंधित ठेकेदार, पाटबंधारेचे अधिकारी व इतर जबाबदार लोकांवर तत्काळ कारवाई करून धरणाचे काम थांबवावे, पुनर्वसनाअभावी घळभरणी पूर्ण झाली तर जिवंतपणी धरणग्रस्त मरतील; त्यापेक्षा आम्हाला इच्छामरणास परवानगी द्यावी अथवा घळभरणीमध्ये आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

निवेदनावर सदानंद व्हनबट्टे, महादेव खाडे, सचिन पावले, अशोक पावले, संदीप पुंडपळ, शंकर पावले, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, पुनर्वसन मंत्री यांना देण्यात आल्या आहेत.