शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे कोल्हापुरात युती - आघाडीत बंडखोरी अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:42 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा ठिकाणी तिरंगी, तर चार ठिकाणी दुरंगी लढती ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा ठिकाणी तिरंगी, तर चार ठिकाणी दुरंगी लढती होतील, असे आजचे चित्र आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती, काँग्रेस आघाडीमध्येही बंडखोरी अटळ दिसत आहे. या मतदारसंघातील तब्बल १५ उमेदवार लढतीसाठी शड्डू मारून तयार आहेत.लोकसभेला दोन्ही जागा जिंकून हवा निर्माण केलेल्या शिवसेनेपुढे हे यश कायम राखण्याचे आव्हान आहे. काँग्रेसला नव्याने खाते उघडताना, तर राष्ट्रवादीला सध्या आहे त्या जागा कायम राखताना ताकद पणाला लावावी लागणार आहे. काँग्रेस आघाडी व भाजप-शिवसेना युतीने नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे जाहीर केले असले तरी या जिल्ह्यात मात्र दहाही मतदारसंघांत विद्यमान विरुद्ध प्रस्थापित अशीच लढत होणार आहे. नवा चेहरा इच्छुकांच्या यादीत असला तरी ते प्रस्थापित कुटुंबातीलच आहेत.गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस व भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढली तरी त्याचा फायदा शिवसेनेला झाला व या पक्षाचे तब्बल सहा आमदार निवडून आले. या यशात त्या पक्षापेक्षा स्थानिक परिस्थिती व उमेदवाराचा प्रभावही तितकाच महत्त्वाचा राहिला. हे शिवसेनेचे निर्भेळ पक्षीय यश नव्हे. कारण तसे असते तर त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोल्हापूरने शिवसेनेला म्हणावे तेवढे यश दिले नाही. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर शिवसेनेला यश मिळाले असले तरी तीच हवा कायम राहण्याची शक्यता नाही; कारण विधानसभेला स्थानिक प्रश्न, उमेदवाराबद्दलची आत्मीयता, गटातटांचे राजकारण असे अनेक घटक उफाळून येतात, तसे ते या निवडणुकीतही येणार आहेत. सध्या आमदार असलेल्या दहांपैकी कुणाचीच उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता नाही. त्याशिवाय काँग्रेसमधून आमदार सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण), पी. एन. पाटील (करवीर), प्रकाश आवाडे (इचलकरंजी), राजूबाबा आवळे (हातकणंगले), जनसुराज्य पक्षातून विनय कोरे (शाहूवाडी) व राजीव आवळे (हातकणंगले) यांची उमेदवारी नक्की मानली जाते. त्यानुसार त्यांनी राजकीय मोर्चेबांधणी, प्रचारही सुरू केला आहे. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि इचलकरंजी येथे दुरंगी लढतीचे चित्र आहे. उर्वरित सहा ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते.उमेदवारीमध्ये कोल्हापूर उत्तरमधून दोन्ही काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तिथे मधुरिमाराजे, ऋतुराज पाटील व व्ही. बी. पाटील यांची नावे चर्चेत आहेत. या मतदारसंघात ताकदीचा उमेदवार देण्याचा काँग्रेस आघाडीचा प्रयत्न आहे; परंतु अजून ही जागा कोणत्या पक्षाकडे जाणार व उमेदवार कोण हे ठरता ठरेना झाले आहे. असेच त्रांगडे आघाडीच्या उमेदवारांबाबत शिरोळ मतदारसंघात आहे. या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी संघटना या पक्षांकडे तगडे उमेदवार आहेत. स्वाभिमानी संघटना दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे आणि शिरोळ हा संघटनेचा हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीसमोर पेच आहे. भाजप-शिवसेना युतीपुढे असाच तिढा कागल व चंदगड मतदारसंघांत आहे. कागलमध्ये भाजपकडून शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी जोरदार तयारी केली आहे; परंतु शिवसेनेकडून माजी आमदार संजय घाटगे हेदेखील इच्छुक आहेत. चंदगडमध्ये भाजपकडून रमेश रेडेकर, गोपाळराव पाटील, तर शिवसेनेतून राजेश पाटील, संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर हे तयारी करीत आहेत. त्यांच्यात कसा समझोता घडवून आणायचा, हेच युतीपुढे आव्हान आहे.जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे हे भाजप आघाडीचे घटक असले तरी त्यांना शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांचे आव्हान असेल. राष्ट्रवादीत राधानगरी मतदारसंघात माजी आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यात उमेदवारीसाठीच रस्सीखेच आहे. या मतदारसंघात भाजपमधून राहुल देसाई यांची बंडखोरी असेल.गत निवडणुकीत दुसºया क्रमांकावरील उमेदवारकाँग्रेस- ०५, राष्ट्रवादी- ०२, शिवसेना, जनसुराज्य व अपक्ष प्रत्येकी- ०१सर्वांत मोठा विजय : राधानगरी- प्रकाश आबिटकर (शिवसेना) - ३९४०८ (पराभव : के. पी. पाटील, राष्ट्रवादी)सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : शाहूवाडी-विनय कोरे (जनसुराज्य)- ३८८ (विजयी : सत्यजित पाटील - शिवसेना)सध्याचे पक्षीय बलाबलशिवसेना : 06भाजप व राष्ट्रवादी : प्रत्येकी 02