शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे कोल्हापुरात युती - आघाडीत बंडखोरी अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:42 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा ठिकाणी तिरंगी, तर चार ठिकाणी दुरंगी लढती ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा ठिकाणी तिरंगी, तर चार ठिकाणी दुरंगी लढती होतील, असे आजचे चित्र आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती, काँग्रेस आघाडीमध्येही बंडखोरी अटळ दिसत आहे. या मतदारसंघातील तब्बल १५ उमेदवार लढतीसाठी शड्डू मारून तयार आहेत.लोकसभेला दोन्ही जागा जिंकून हवा निर्माण केलेल्या शिवसेनेपुढे हे यश कायम राखण्याचे आव्हान आहे. काँग्रेसला नव्याने खाते उघडताना, तर राष्ट्रवादीला सध्या आहे त्या जागा कायम राखताना ताकद पणाला लावावी लागणार आहे. काँग्रेस आघाडी व भाजप-शिवसेना युतीने नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे जाहीर केले असले तरी या जिल्ह्यात मात्र दहाही मतदारसंघांत विद्यमान विरुद्ध प्रस्थापित अशीच लढत होणार आहे. नवा चेहरा इच्छुकांच्या यादीत असला तरी ते प्रस्थापित कुटुंबातीलच आहेत.गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस व भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढली तरी त्याचा फायदा शिवसेनेला झाला व या पक्षाचे तब्बल सहा आमदार निवडून आले. या यशात त्या पक्षापेक्षा स्थानिक परिस्थिती व उमेदवाराचा प्रभावही तितकाच महत्त्वाचा राहिला. हे शिवसेनेचे निर्भेळ पक्षीय यश नव्हे. कारण तसे असते तर त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोल्हापूरने शिवसेनेला म्हणावे तेवढे यश दिले नाही. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर शिवसेनेला यश मिळाले असले तरी तीच हवा कायम राहण्याची शक्यता नाही; कारण विधानसभेला स्थानिक प्रश्न, उमेदवाराबद्दलची आत्मीयता, गटातटांचे राजकारण असे अनेक घटक उफाळून येतात, तसे ते या निवडणुकीतही येणार आहेत. सध्या आमदार असलेल्या दहांपैकी कुणाचीच उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता नाही. त्याशिवाय काँग्रेसमधून आमदार सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण), पी. एन. पाटील (करवीर), प्रकाश आवाडे (इचलकरंजी), राजूबाबा आवळे (हातकणंगले), जनसुराज्य पक्षातून विनय कोरे (शाहूवाडी) व राजीव आवळे (हातकणंगले) यांची उमेदवारी नक्की मानली जाते. त्यानुसार त्यांनी राजकीय मोर्चेबांधणी, प्रचारही सुरू केला आहे. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि इचलकरंजी येथे दुरंगी लढतीचे चित्र आहे. उर्वरित सहा ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते.उमेदवारीमध्ये कोल्हापूर उत्तरमधून दोन्ही काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तिथे मधुरिमाराजे, ऋतुराज पाटील व व्ही. बी. पाटील यांची नावे चर्चेत आहेत. या मतदारसंघात ताकदीचा उमेदवार देण्याचा काँग्रेस आघाडीचा प्रयत्न आहे; परंतु अजून ही जागा कोणत्या पक्षाकडे जाणार व उमेदवार कोण हे ठरता ठरेना झाले आहे. असेच त्रांगडे आघाडीच्या उमेदवारांबाबत शिरोळ मतदारसंघात आहे. या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी संघटना या पक्षांकडे तगडे उमेदवार आहेत. स्वाभिमानी संघटना दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे आणि शिरोळ हा संघटनेचा हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीसमोर पेच आहे. भाजप-शिवसेना युतीपुढे असाच तिढा कागल व चंदगड मतदारसंघांत आहे. कागलमध्ये भाजपकडून शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी जोरदार तयारी केली आहे; परंतु शिवसेनेकडून माजी आमदार संजय घाटगे हेदेखील इच्छुक आहेत. चंदगडमध्ये भाजपकडून रमेश रेडेकर, गोपाळराव पाटील, तर शिवसेनेतून राजेश पाटील, संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर हे तयारी करीत आहेत. त्यांच्यात कसा समझोता घडवून आणायचा, हेच युतीपुढे आव्हान आहे.जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे हे भाजप आघाडीचे घटक असले तरी त्यांना शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांचे आव्हान असेल. राष्ट्रवादीत राधानगरी मतदारसंघात माजी आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यात उमेदवारीसाठीच रस्सीखेच आहे. या मतदारसंघात भाजपमधून राहुल देसाई यांची बंडखोरी असेल.गत निवडणुकीत दुसºया क्रमांकावरील उमेदवारकाँग्रेस- ०५, राष्ट्रवादी- ०२, शिवसेना, जनसुराज्य व अपक्ष प्रत्येकी- ०१सर्वांत मोठा विजय : राधानगरी- प्रकाश आबिटकर (शिवसेना) - ३९४०८ (पराभव : के. पी. पाटील, राष्ट्रवादी)सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : शाहूवाडी-विनय कोरे (जनसुराज्य)- ३८८ (विजयी : सत्यजित पाटील - शिवसेना)सध्याचे पक्षीय बलाबलशिवसेना : 06भाजप व राष्ट्रवादी : प्रत्येकी 02