शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

धर्मांधता, भांडवलशाहीची देशात युती

By admin | Updated: March 5, 2015 00:45 IST

बी. जी. कोळसे-पाटील : गडहिंग्लज येथे राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प

गडहिंग्लज : देशात राजकारण राहिलेलेच नाही. टोळभैरवांची भांडवलदारांच्या इशाऱ्यावर नाचणारी टोळीच शिल्लक राहिली आहे. त्यामुळे धर्मांधता आणि भांडवलशाहीची युतीच देश चालवत असल्याचा घणाघाती आरोप उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केला.येथील नगरपरिषदेच्या प्रांगणात श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील अखेरचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष अकबर मुल्ला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.‘राजकारणातील बदलते प्रवाह’ याविषयावर बोलताना कोळसे-पाटील यांनी शब्दप्रामाण्यवाद्यांनी समाजातला बुद्धी प्रामाण्यवाद का आणि कसा संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे, याचा लेखाजोखा मांडला. मीडिया, न्यायव्यवस्था आणि प्रशासन या लोकशाहीच्या तिन्ही खाबांचे पाठबळ शब्दप्रामाण्यवाद्यांना मिळत आहे. त्या जोरावर हे समाजाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या माणसाला मारत आहेत. मूठभर असले तरी भयानक आहेत; पण त्यांच्या हिंसेला अहिंसेने, शब्दाला बुद्धीने उत्तर देण्यासाठी आता समाजाने ‘डोळस’ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांनी स्वागत केले. कॉ. आय. सी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अकबर मुल्ला, सुभाष धुमे, आदींनी मनोगत व्यक्त केले. कॉ. उज्ज्वला दळवी यांनी आभार मानले. (वार्ताहर)पानसरेंना आताच का मारले ?२६/११ च्या हल्ल्याचे आणि शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूविषयी गूढ उकलण्याचे आणि वस्तुस्थिती समाजासमोर आणण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात ३० डिसेंबरला केशवराव भोसले नाट्यगृहात सभा घेतली. राज्यभर सभा घेण्याचा त्यांनी केलेला निर्धार व त्याला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद २६/११ च्या कटामागील धर्मांध शक्तींना मान्य नव्हता. त्यातूनच पानसरेंची हत्या झाल्याचा आरोप कोळसे-पाटील यांनी जाहीर सभेत केला.