शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांधता, भांडवलशाहीची देशात युती

By admin | Updated: March 5, 2015 00:45 IST

बी. जी. कोळसे-पाटील : गडहिंग्लज येथे राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प

गडहिंग्लज : देशात राजकारण राहिलेलेच नाही. टोळभैरवांची भांडवलदारांच्या इशाऱ्यावर नाचणारी टोळीच शिल्लक राहिली आहे. त्यामुळे धर्मांधता आणि भांडवलशाहीची युतीच देश चालवत असल्याचा घणाघाती आरोप उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केला.येथील नगरपरिषदेच्या प्रांगणात श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील अखेरचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष अकबर मुल्ला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.‘राजकारणातील बदलते प्रवाह’ याविषयावर बोलताना कोळसे-पाटील यांनी शब्दप्रामाण्यवाद्यांनी समाजातला बुद्धी प्रामाण्यवाद का आणि कसा संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे, याचा लेखाजोखा मांडला. मीडिया, न्यायव्यवस्था आणि प्रशासन या लोकशाहीच्या तिन्ही खाबांचे पाठबळ शब्दप्रामाण्यवाद्यांना मिळत आहे. त्या जोरावर हे समाजाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या माणसाला मारत आहेत. मूठभर असले तरी भयानक आहेत; पण त्यांच्या हिंसेला अहिंसेने, शब्दाला बुद्धीने उत्तर देण्यासाठी आता समाजाने ‘डोळस’ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांनी स्वागत केले. कॉ. आय. सी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अकबर मुल्ला, सुभाष धुमे, आदींनी मनोगत व्यक्त केले. कॉ. उज्ज्वला दळवी यांनी आभार मानले. (वार्ताहर)पानसरेंना आताच का मारले ?२६/११ च्या हल्ल्याचे आणि शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूविषयी गूढ उकलण्याचे आणि वस्तुस्थिती समाजासमोर आणण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात ३० डिसेंबरला केशवराव भोसले नाट्यगृहात सभा घेतली. राज्यभर सभा घेण्याचा त्यांनी केलेला निर्धार व त्याला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद २६/११ च्या कटामागील धर्मांध शक्तींना मान्य नव्हता. त्यातूनच पानसरेंची हत्या झाल्याचा आरोप कोळसे-पाटील यांनी जाहीर सभेत केला.