शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी-महायुतीचे पैलवान सज्ज

By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST

आखाडा विधानसभेचा : करवीर, राधानगरी व शाहूवाडी मतदारसंघांत तिरंगी लढतीचे चित्र; इतर ठिकाणी दुरंगीच लढती

विश्वास पाटील / कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व दहाही मतदारसंघांत लक्षवेधी लढती होतील, असे आजचे चित्र आहे. त्यातील कागल, करवीर, शाहूवाडी, आदी मतदारसंघांतल्या लढती तर अधिक चुरशीच्या होतील, असे वातावरण आतापासूनच तयार झाले आहे. निवडणुकीची घोषणा झाल्याने राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी पक्की झाली असून, बहुधा जागावाटपही तसेच राहण्याची शक्यता जास्त आहे. राष्ट्रवादीने जागा वाढवून मागितल्या तरी त्यावर लढण्यासाठी त्यांच्याकडे तगडे उमेदवार नाहीत. कुरघोडीचे राजकारण म्हणून वाढीव जागा मागितल्या जात आहेत. महायुतीचे जागावाटप झाले नसले तरी कुणी किती जागा लढवायच्या, यावरून तणातणी होऊ शकते; परंतु तरीही लोकसभेप्रमाणे ‘महायुती’ही पाच घटक पक्षांसह विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार हे नक्की आहे. त्यामुळे या रिंगणातील दोन्ही प्रमुख आघाड्यांचे उमेदवार कोण असतील, हे देखील जवळपास निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांपैकी तब्बल सतरा उमेदवारांची उमेदवारीही नक्की असून, त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. आताचे विधानसभानिहाय चित्र पाहिले तर लढतीचा अंदाजही येऊ लागला आहे. दहापैकी करवीर, राधानगरी व शाहूवाडी मतदारसंघांत तिरंगी लढतीचे चित्र दिसते. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस व कोल्हापूर दक्षिणमध्ये महायुतीचा उमेदवारांचा शोध संपलेला नाही. प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्यांची कागदोपत्री संख्या जास्त होईल; परंतु लढती मात्र अपवाद वगळता दुरंगीच होतील.कोल्हापूर ‘दक्षिण’ मतदारसंघात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात सक्षम उमेदवार कोण? हाच प्रश्न आजही विरोधी पक्षासमोर आहे. भाजपकडून महेश जाधव, अमल महाडिक व उद्योजक चंद्रकांत जाधव यांची नावे चर्चेत आहेत. टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक श्रीनिवास साळोखे यांनीही येथून लढण्याची घोषणा केली आहे.आमदार के. पी. पाटील यांच्या विरोधात कोण, हा तिढा महायुतीला अजून सोडविता आलेला नाही. जेवढे जास्त उमेदवार तेवढी ‘के.पीं.’ची लढत सोपी होईल. शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर व ‘स्वाभिमानी’कडून जालंदर पाटील यांच्यात उमेदवारीची बाजी कोण मारते व एकास उमेदवारी मिळाल्यास दुसरा काय करतो, हीच गोष्ट निर्णायक ठरेल.हातकणंगलेत माजी खासदार जयवंतराव आवळे यांनीच पुन्हा शड्डू ठोकला आहे. तिथे शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर विरुद्ध आवळे अशी लढत होईल. मिणचेकर यांचा तसा कुणाला राजकीय उपद्रव नसल्याने त्यांच्याबद्दल मतदारांत सहानुभूती आहे. ‘जनसुराज्य’चे माजी आमदार राजीव आवळे यांचा युवकांच्या गाठीभेटीद्वारे प्रचार सुरू आहे. डाव्या लोकशाही आघाडीकडून भाकपचे रघुनाथ कांबळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर विरुद्ध काँग्रेसचे सत्यजित कदम अशी संभाव्य लढत होईल. मधुरिमाराजे यांना रिंगणात उतरण्याच्या हालचाली राष्ट्रवादीतर्फे आजही सुरू आहेत. सागर चव्हाण यांचे नावही कॉँग्रेसकडून पुढे करण्यात येत आहे. महायुतीत शिवसेना व ‘स्वाभिमानी’त या मतदारसंघासाठी रस्सीखेच आहे. महायुतीच्या उमेदवारावरच ‘जनसुराज्य’चे आमदार विनय कोरे यांना निवडणूक कशी जाणार, हे ठरणार आहे. सत्यजित पाटील यांची उमेदवारी शिवसेनेकडून नक्की झाल्यास भारतअप्पा पाटील काय करणार, याचाही निकालावर परिणाम होईल. काँग्रेसतर्फे कर्णसिंह गायकवाड नक्की आहेत. आमदार सा. रे. पाटील हेच अजूनही स्पर्धेत आहेत. त्यांचे वय सध्या ९३ वर्षे आहे. त्यांना उमेदवारी नसेल, तर मुलगा गणपतराव पाटील यांचे नाव चर्चेत होते. अनिल यादव किंवा ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील हे दोन पर्यायही काँग्रेसकडे आहेत. मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्यास राजेंद्र पाटील-यड्रावकर हे उमेदवार असतील. खासदार राजू शेट्टी हे उल्हास पाटील व सावकर मादनाईक यांच्यापैकी कुणाला संधी देतात, हे महत्त्वाचे आहे.आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध पी. एन. पाटील या लढतीत ‘जनसुराज्य’-‘शेकाप’ आघाडीच्या राजू सूर्यवंशी यांच्या उमेदवारीने चांगलाच रंग भरला आहे. तिघाही उमेदवारांची तयारी पाहता लढत अटीतटीची होणार यात शंका नाही. संवेदनशील असलेल्या करवीरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून डिजिटल फलक, आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकारण तापले आहे. कुपेकर घराण्यातच उमेदवारीवरून तयार झालेला ‘दादा की ताई’ हा गुंता पक्षाने सोडविला आहे. तिथे आमदार संध्यादेवी कुपेकर यांचीच उमेदवारी नक्की झाल्याचे सांगण्यात येते. तसे झाल्यास संग्राम कुपेकर यांना आणखी पाच वर्षे विश्रांती घ्यावी लागेल. महायुतीतर्फे ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्ड्यान्नावर यांची उमेदवारी निश्चित आहे. स्वाती कोरी यांचेही नाव चर्चेत आहे.संवेदनशील व संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या कागल मतदारसंघात जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे अशी थेट लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात प्रचंड ुउलथापालथ झाली असून, मंडलिक व संजय घाटगे गटाने ‘भगवा’ हातात घेतला आहे. मंडलिक व घाटगे गट सध्या एकत्र आहेत. त्यामुळे अटीतटीची लढत होणार आहे. येथे विक्रमसिंह घाटगे गटाच्या भूमिकेस महत्त्व आहे.