शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

धोक्याची घंटा, जिल्ह्यात ४७ नवे कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST

कोल्हापूर : कोरोनासारख्या महामारीतून गतवर्षी बाहेर पडताना कोल्हापूरकरांच्या तसेच जिल्हा प्रशासनाच्या नाकी दम आला होता. परंतु आता त्याचीच पुनरावृत्ती ...

कोल्हापूर : कोरोनासारख्या महामारीतून गतवर्षी बाहेर पडताना कोल्हापूरकरांच्या तसेच जिल्हा प्रशासनाच्या नाकी दम आला होता. परंतु आता त्याचीच पुनरावृत्ती होते की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चोवीस तासात ४७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने परिस्थिती गंभीर वळण घेत असल्याचे मंगळवारी दिसून आले. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. या ४७ नवीन रुग्णांपैकी ३२ रुग्ण हे कोल्हापूर शहरातील आहेत.

कोल्हापूर शहरात गर्दीवर नियंत्रण नसल्याने तसेच नागरिक सुध्दा शारीरिक अंतर ठेवण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करत असल्यामुळे दि. १ फेब्रुवारी ते दि. २३ फेब्रुवारी अखेर १०५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. अवघ्या तेवीस दिवसातील ही रुग्णवाढ गंभीर आहे. मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात तर कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून कोल्हापूर शहराकडे पाहिले जात होते. त्यामुळे आताही रुग्ण वाढत असताना त्यात कोल्हापूर शहरातील रुग्ण जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होऊ लागले आहे. शहरवासीयांचा निष्काळजीपणा नव्या संकटाला आमंत्रण देणारा ठरत आहे.

मंगळवारी सीपीआर रुग्णालयाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४७ नवीन रुग्ण आढळून आले तर एकाचा मृत्यू झाला. रामानंदनगर जवळील दत्तात्रय कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा सीपीआर रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यांत हा सर्वाधिक आकडा असून तो चिंता करायला लावणार आहे. चोवीस तासांत १३९ आरटीपीसीआर, ११२ ॲन्टीजेन तर खासगी लॅबमधून २०१ कोरोना चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले.

शहराबरोबरच आजरा, गडहिंग्लज, कागल, करवीर, पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी एक, हातकणंगले तालुक्यात दोन, नगरपालिका हद्दीत तीन तर इतर जिल्ह्यातील पाच रुग्णांचा बाधितांमध्ये समावेश आहे. गेल्या काही दिवसापासून ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत नव्हते, पण मंगळवारी एक, दोन रुग्ण आढळून आले आहेत.

पाईंटर -

- २८ डिसेंबर ते २१ फेब्रुवारी दरम्यान आठ आठवड्यात ७७५ नवीन रुग्णांची नोंद.

- दि. २३ फेब्रुवारीपर्यंत एकूण रुग्ण - ५० हजार २५३

- कोरोनामुक्त झालेले रुग्णांची संख्या - ४८ हजार ३४०

- आतापर्यंत कोरोनाचे बळी - १७३८

-मृ्त्यूचा दर - ३.५

- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - ९६.२२ टक्के.

- कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग प्रमाण - १०.३० टक्के

- एकूण चाचण्या - ३ लाख ४८ हजार १३०