शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पूरग्रस्त आक्रोश मोर्चा : दोघांनी घेतली नृसिंहवाडी येथील पंचगंगा पुलावरून उडी; बचाव पथकामुळे अनर्थ टळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 17:48 IST

शेतकरी वाचलाच पाहिजे, राजू शेट्टींना बळ दिलेच पाहिजे, अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होत्या.

ठळक मुद्देशेतकरी वाचलाच पाहिजे, राजू शेट्टींना बळ दिलेच पाहिजे, अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होत्या.

नसिम सनदी-आदित्य वेल्हाळकुरुंदवाड : माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या पूरग्रस्त आक्रोश मोर्चात रविवारी सायंकाळी एकाने नृसिंहवाडी येथील पंचगंगा पुलावरून उडी घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे पुलावर बंदोबस्त पाहणीसाठी आले होते. त्यांच्या समोरच उडी घेतल्याने एकच गोंधळ उडाला. त्याला बचाव पथकानं तात्काळ बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान हा उडी मारणारा कोण याची स्वाभिमानाच्या कोणत्याच नेत्याला माहित नव्हती. शेट्टी यांचा आदेश येईपर्यंत कोणीही कोणती पावलं उचलू नये असे पुकारण्याची वेळ नेत्यांवर आली. त्यानंतर आणखी एका व्यक्तीनं पुलावरून उडी घेतली. परंतु बचाव पथकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

पुराचा लोंढा दिसावा तसा लोकांचा पूर यात्रेच्या मार्गावर दिसत होता. नृसिहवाडी जवळ येईल तशी गर्दी वाढत होती. कुरुंदवाडमध्ये तर रस्ते तुडुंब भरून वाहत होते. शेतकरी वाचलाच पाहिजे, राजू शेट्टींना बळ दिलेच पाहिजे अशा घोषणा त्या ठिकाणी केल्या जात होत्या.कुरुंदवाड मध्ये सभा"प्रयाग चिखली पासून मोर्चाला सुरुवात केल्यापासून हजारो आया बहिणींनी माझे औक्षण केले. यावेळी माझ्या कपाळाला कुंकू लावलेल्या ठिकाणी जखम झाली आहे. पण या जखमेचे दुःख नाही ही जखम कधीतरी भरून येईल. पण मला हे भाग्य लाभले त्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो," अशी भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

प्रचंड जल्लोष...एकसारखी वाजणारी हलगी, डफ आणि टाळ, घुमणारे ढोल, फुटणाऱ्या फटाक्याच्या माळा आणि दिल्या जाणाऱ्या घोषणा आणि स्वागतासाठी उधळली जाणारी फुले, पायावर घातले जाणारे पाणी असे वातावरण पाहता आक्रोश कमी आणि जल्लोष जास्त दिसत होता. अक्षरशः फटाके लावून संगीताच्या तालावर लोक थिरकत होते. वाजणाऱ्या शिट्या आणि लोक तर हार बुके घेऊन स्वागत करताना दिसत होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीfloodपूर