शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

आजरा कारखाना राष्ट्रवादीच्या संचालकांनी कामगारांना हाताशी धरून बंद पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

आजरा : आजरा साखर कारखाना चांगला चालू होता; पण विरोधी राष्ट्रवादीच्या संचालकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. हसन मुश्रीफ ...

आजरा : आजरा साखर कारखाना चांगला चालू होता; पण विरोधी राष्ट्रवादीच्या संचालकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. हसन मुश्रीफ यांना सांगून कारखाना बंद पाडण्याचा तगादा लावला होता. तरीही कारखाना सुस्थितीत सुरू होता. मग कामगारांना हाताशी धरून कारखाना बंद पाडण्यात आला, असा आरोप आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांनी केला. ते आजरा सूतगिरणीच्या कार्यस्थळावर गोकुळ निवडणुकीबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.

तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच विकासाला महत्त्व दिले. विरोधकांच्या षड्‌यंत्रानंतर कारखान्याचे अध्यक्षपद सोडले. त्यावेळी ३९ कोटी असणारे कर्ज ६५ कोटींवर गेले. यामध्ये तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काय चूक, असा सवालही चराटी यांनी केला. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत गेल्या वेळी तालुक्यातून १६० मतांची व्यवस्था करून दिल्यानंतर सत्तारूढ पॅनल निवडून आले; पण गेल्या पाच वर्षांत महादेव महाडिक किंवा आमदार पी. एन. पाटील यांनी आम्हाला विचारात घेतले नाही. कारखान्याला कर्ज देताना जिल्ह्यातील नेत्यांनी राजकारण केले. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही ताकद दाखविणार आहे, असेही अशोक चराटी यांनी सांगितले.

मेळाव्यास विलास नाईक, विजयकुमार पाटील, के. व्ही. येसणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश रेडेकर, दिगंबर देसाई, सुरेश डांग, डॉ. अनिल देशपांडे, दशरथ अमृते, राजू पोतनीस, निवृत्ती शेंडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. इंद्रजित देसाई यांनी आभार मानले.

- आजरा कारखान्याबाबत हात आखडता का ?

जिल्ह्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्यांना जिल्हा बँक अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी मदत केली; पण आजरा कारखान्याला उभारी देण्यासाठी हात आखडता का घेतला, असा सवालही अशोक चराटी यांनी केला.

-------

गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी आपल्याकडे ४० ठरावधारक आहेत; पण स्वाभिमान गहाण ठेवून कोणताही निर्णय घेणार नाही, असे अशोक चराटी यांनी सांगून महादेव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांच्यावर थेट आरोप केले.

-------------------

* कारखाना सुरू करण्याच्या अभिवचनाचे काय ?

कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी आपले मेडिकल कॉलेज बंद पडले तरी चालेल; पण कारखाना सुरू करणार असे अभिवचन दिले होते. त्याचे काय झाले, असाही सवाल अशोक चराटी यांनी केला.