शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

आजरा कारखाना राष्ट्रवादीच्या संचालकांनी कामगारांना हाताशी धरून बंद पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

आजरा : आजरा साखर कारखाना चांगला चालू होता; पण विरोधी राष्ट्रवादीच्या संचालकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. हसन मुश्रीफ ...

आजरा : आजरा साखर कारखाना चांगला चालू होता; पण विरोधी राष्ट्रवादीच्या संचालकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. हसन मुश्रीफ यांना सांगून कारखाना बंद पाडण्याचा तगादा लावला होता. तरीही कारखाना सुस्थितीत सुरू होता. मग कामगारांना हाताशी धरून कारखाना बंद पाडण्यात आला, असा आरोप आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांनी केला. ते आजरा सूतगिरणीच्या कार्यस्थळावर गोकुळ निवडणुकीबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.

तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच विकासाला महत्त्व दिले. विरोधकांच्या षड्‌यंत्रानंतर कारखान्याचे अध्यक्षपद सोडले. त्यावेळी ३९ कोटी असणारे कर्ज ६५ कोटींवर गेले. यामध्ये तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काय चूक, असा सवालही चराटी यांनी केला. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत गेल्या वेळी तालुक्यातून १६० मतांची व्यवस्था करून दिल्यानंतर सत्तारूढ पॅनल निवडून आले; पण गेल्या पाच वर्षांत महादेव महाडिक किंवा आमदार पी. एन. पाटील यांनी आम्हाला विचारात घेतले नाही. कारखान्याला कर्ज देताना जिल्ह्यातील नेत्यांनी राजकारण केले. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही ताकद दाखविणार आहे, असेही अशोक चराटी यांनी सांगितले.

मेळाव्यास विलास नाईक, विजयकुमार पाटील, के. व्ही. येसणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश रेडेकर, दिगंबर देसाई, सुरेश डांग, डॉ. अनिल देशपांडे, दशरथ अमृते, राजू पोतनीस, निवृत्ती शेंडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. इंद्रजित देसाई यांनी आभार मानले.

- आजरा कारखान्याबाबत हात आखडता का ?

जिल्ह्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्यांना जिल्हा बँक अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी मदत केली; पण आजरा कारखान्याला उभारी देण्यासाठी हात आखडता का घेतला, असा सवालही अशोक चराटी यांनी केला.

-------

गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी आपल्याकडे ४० ठरावधारक आहेत; पण स्वाभिमान गहाण ठेवून कोणताही निर्णय घेणार नाही, असे अशोक चराटी यांनी सांगून महादेव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांच्यावर थेट आरोप केले.

-------------------

* कारखाना सुरू करण्याच्या अभिवचनाचे काय ?

कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी आपले मेडिकल कॉलेज बंद पडले तरी चालेल; पण कारखाना सुरू करणार असे अभिवचन दिले होते. त्याचे काय झाले, असाही सवाल अशोक चराटी यांनी केला.