शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

उन्हाच्या तडाख्याने आजरेकरांचे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST

गेले आठ दिवसांपासूनचा कडक उन्हाळा आजरेकरांना त्रासदायक ठरू लागला आहे. दिवसा आग ओकणाऱ्या सूर्याने घामाघूम तर मध्यरात्रीनंतर सुटणारा गार ...

गेले आठ दिवसांपासूनचा कडक उन्हाळा आजरेकरांना त्रासदायक ठरू लागला आहे. दिवसा आग ओकणाऱ्या सूर्याने घामाघूम तर मध्यरात्रीनंतर सुटणारा गार वारा यामुळे नागरिकांच्या आजारी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्रत्येक वर्षी होळीच्या दरम्यान वळवाचा पाऊस होता. त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी असते; पण चालू वर्षी वळवाच्या पावसाने अद्यापही हुलकावणी दिली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांमुळे नागरिक होरपळून जात आहेत. दुपारच्या वेळेत बाजारपेठेसह रस्ते ओस पडत आहेत. वातावरणातील बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. थंडी, तापाचे रुग्ण दवाखान्यातून वाढत आहेत. उन्हाच्या झळांनी दमछाक होऊन शरीराला आलेला थकवा घालविण्यासाठी शीतपेयांच्या दुकानांतून गर्दी होत आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे कलिंगडे, गाजर, बीट, काकडी यांचे दर वाढले आहेत.

दिवसभराच्या उष्म्यानंतर वातावरणात बदल होऊन रात्री ११ नंतर हवेत गारवा पसरतो. दिवसा व रात्रीच्या तापमानात मोठा फरक पडत असल्याने त्याचा थेट आरोग्यावर परिणाम होत आहे. वयस्कर व्यक्तींना या बदलत्या वातावरणाचा जास्त त्रास होत आहे. प्रचंड उन्हामुळे आजऱ्याच्या बाजारपेठेत दुपारी १२ ते ५ यावेळेत शुकशुकाट असतो.