शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘एआयएसएफ’चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:18 IST

केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद या दोन्ही कायद्याला विरोध करत ते रद्द करावेत, या मागणीसाठी ‘एआयएसएफ’ व ‘एआयवायएफ’ या संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘एआयएसएफ’चा मोर्चाजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

कोल्हापूर : केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद या दोन्ही कायद्याला विरोध करत ते रद्द करावेत, या मागणीसाठी ‘एआयएसएफ’ व ‘एआयवायएफ’ या संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.सकाळी साडे अकराच्या सुमारास बिंदू चौक येथून गिरिष फोंडे, अतुल आंबी, शिवाजी माळी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद हे कायदे रद्द करा...’,‘मोदी-शहा मुर्दाबाद...’, ‘भाजप सरकार चलेजाव...’,‘इन्कलाब झिंदाबाद...’अशा घोषणा देत आंदोलकांनी मोर्चा मार्ग दणाणून सोडला. लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.

या ठिकाणी आंदोलकांनी जोरदार घोषणा देत तीव्र निदर्शने केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), आलॅ इंडिया युथ फेडरेशन (एआयवायएफ) च्या कार्यकर्त्यांसह नेहरु महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की, लोकसभेतील पाशवी बहुमताच्या जोरावर राज्यसभेतील जेमतेम जोरावर गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने ‘नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद’ हे दोन्ही कायदे संमत करण्यात आले. त्याला देशभरातून विरोध सुरु झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना पोलीसांकडून मारहाण केली आहे.

या अमानुष छळाचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे हे दोन्ही कायदे त्वरीत मागे घेऊन विद्यार्थी व नागरिकांना झालेल्या मारहाणीची चौकशी करुन संबंधितांना शिक्षा करावी. अन्यथा देशभर आंदोलनाची व्यापकता वाढविली जाईल. आंदोलनात जावेद तांबोळी, आरती रेडेकर, धीरज कठारे, अरबाज पठाण, दिलदार मुजावर, कृष्णा पानसे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर