शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढून टाकणार

By admin | Updated: November 23, 2014 00:30 IST

सहकारमंत्र्यांची कोल्हापुरात घोषणा : केंद्राकडून कारखान्यांना सॉफ्ट लोन मिळवून देणार

कोल्हापूर : दोन साखर कारखान्यांमधील १५ किलोमीटर हवाई अंतराची अट लवकरच काढून टाकणार असल्याची घोषणा राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली. कारखान्याशेजारी स्पर्धक उभारल्याशिवाय शेतकऱ्यांचा फायदा होणार नसल्याचे सांगत सध्या ऊसदरासाठी कारखान्यांना केंद्र सरकारकडून सॉफ्ट लोन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री पाटील म्हणाले, विक्रमसिंह घाटगे ‘एफ.आर.पी.’पेक्षा जास्त दर देऊ शकतात, मग इतर कारखाने का देत नाहीत. अडचणीतील सहकारी कारखाने खासगी झाले की फायद्यात येतात, हे कसे घडते, असा सवाल करीत नजीकच्या काळात दोन साखर कारखान्यांमधील १५ किलोमीटर हवाई अंतराची अट काढून टाकणार आहे. सहकारी कारखान्यांच्या शेजारी खासगी कारखाना आल्याशिवाय स्पर्धा निर्माण होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सहकार बॅँकांच्या पुढे एन.पी.ए.चा मोठा प्रश्न असून, तो कमी करण्यासाठी एकरकमी परतफेड योजनेला ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक सूतगिरणींच्या चौकशीला स्थगिती दिलेली आहे. ती उठवून ६७५ संस्थांची पुन्हा चौकशी सुरू करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. ऊसदर नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे; पण हंगामाच्या तोंडावर बैठक घेऊन मार्ग निघत नाही, यासाठी वर्षभर प्रत्येक महिन्याला बैठका घेऊन अडचणी सोडविण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर काही कारखाने उसाचा काटामारी करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटा बसवून त्यांची वारंवार तपासणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. मळी नियंत्रणमुक्तीचा निर्णय येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला जाईल, त्याचबरोबर ऊसतोडणी मजुरांसाठी महामंडळाची स्थापना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामभाऊ चव्हाण उपस्थित होते. सहकाराला काय धाड भरली? सहकार तत्त्वावर सुरू असताना कारखाना सतत आजारी असतो, तोच कारखाना खासगी मालकाने घेतला की दोन वर्षांत नफ्यात येतो. दालमिया शुगर्स दोन वर्षांत सहवीज प्रकल्पासह आघाडीवर आहे. मग सहकारी कारखानदारांना काय धाड भरली, असा संतप्त सवाल मंत्री पाटील यांनी केला. बदली, बढती आणि भरतीसाठीच गर्दी ! गेले दोन दिवस मंत्री पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे जनतेशी सुसंवाद साधला. यामध्ये जनतेने कोणती गाऱ्हाणे मांडली, याबाबत विचारणा केली असता, बदली, बढती व भरती यासाठीच अनेकांनी गर्दी केल्याचे पाटील यांनी सांगितले. यानंतरच जिल्हा बॅँकेची निवडणूकजिल्हा बॅँक व ‘गोकुळ’ या संस्थांशी संलग्न प्राथमिक संस्थांच्या निवडणुका येत्या दोन महिन्यांत पूर्ण होतील. त्यानंतरच या शिखर संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.