शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढून टाकणार

By admin | Updated: November 23, 2014 00:30 IST

सहकारमंत्र्यांची कोल्हापुरात घोषणा : केंद्राकडून कारखान्यांना सॉफ्ट लोन मिळवून देणार

कोल्हापूर : दोन साखर कारखान्यांमधील १५ किलोमीटर हवाई अंतराची अट लवकरच काढून टाकणार असल्याची घोषणा राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली. कारखान्याशेजारी स्पर्धक उभारल्याशिवाय शेतकऱ्यांचा फायदा होणार नसल्याचे सांगत सध्या ऊसदरासाठी कारखान्यांना केंद्र सरकारकडून सॉफ्ट लोन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री पाटील म्हणाले, विक्रमसिंह घाटगे ‘एफ.आर.पी.’पेक्षा जास्त दर देऊ शकतात, मग इतर कारखाने का देत नाहीत. अडचणीतील सहकारी कारखाने खासगी झाले की फायद्यात येतात, हे कसे घडते, असा सवाल करीत नजीकच्या काळात दोन साखर कारखान्यांमधील १५ किलोमीटर हवाई अंतराची अट काढून टाकणार आहे. सहकारी कारखान्यांच्या शेजारी खासगी कारखाना आल्याशिवाय स्पर्धा निर्माण होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सहकार बॅँकांच्या पुढे एन.पी.ए.चा मोठा प्रश्न असून, तो कमी करण्यासाठी एकरकमी परतफेड योजनेला ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक सूतगिरणींच्या चौकशीला स्थगिती दिलेली आहे. ती उठवून ६७५ संस्थांची पुन्हा चौकशी सुरू करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. ऊसदर नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे; पण हंगामाच्या तोंडावर बैठक घेऊन मार्ग निघत नाही, यासाठी वर्षभर प्रत्येक महिन्याला बैठका घेऊन अडचणी सोडविण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर काही कारखाने उसाचा काटामारी करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटा बसवून त्यांची वारंवार तपासणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. मळी नियंत्रणमुक्तीचा निर्णय येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला जाईल, त्याचबरोबर ऊसतोडणी मजुरांसाठी महामंडळाची स्थापना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामभाऊ चव्हाण उपस्थित होते. सहकाराला काय धाड भरली? सहकार तत्त्वावर सुरू असताना कारखाना सतत आजारी असतो, तोच कारखाना खासगी मालकाने घेतला की दोन वर्षांत नफ्यात येतो. दालमिया शुगर्स दोन वर्षांत सहवीज प्रकल्पासह आघाडीवर आहे. मग सहकारी कारखानदारांना काय धाड भरली, असा संतप्त सवाल मंत्री पाटील यांनी केला. बदली, बढती आणि भरतीसाठीच गर्दी ! गेले दोन दिवस मंत्री पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे जनतेशी सुसंवाद साधला. यामध्ये जनतेने कोणती गाऱ्हाणे मांडली, याबाबत विचारणा केली असता, बदली, बढती व भरती यासाठीच अनेकांनी गर्दी केल्याचे पाटील यांनी सांगितले. यानंतरच जिल्हा बॅँकेची निवडणूकजिल्हा बॅँक व ‘गोकुळ’ या संस्थांशी संलग्न प्राथमिक संस्थांच्या निवडणुका येत्या दोन महिन्यांत पूर्ण होतील. त्यानंतरच या शिखर संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.