शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

शिरोळमध्ये आरोग्य यंत्रणेला हवा डोस-: आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी सुविधा आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 21:42 IST

शिरोळ तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी शासनाचे म्हणावे तितके नियंत्रण या यंत्रणेवर नाही. त्यामुळेच तालुका आरोग्य कार्यालयाकडून कागदोपत्री अहवाल तयार करण्यापलीकडे काही काम होत नाही असे दिसून येते. एखादे सर्वेक्षण राबवायचे झाल्यास त्यात संवेदनशीलता दिसून येत नाही.

ठळक मुद्देतालुका आरोग्य विभागाबाबत कर्मचाऱ्यांतून नाराजी

संदीप बावचे ।शिरोळ : शिरोळ तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी शासनाचे म्हणावे तितके नियंत्रण या यंत्रणेवर नाही. त्यामुळेच तालुका आरोग्य कार्यालयाकडून कागदोपत्री अहवाल तयार करण्यापलीकडे काही काम होत नाही असे दिसून येते. एखादे सर्वेक्षण राबवायचे झाल्यास त्यात संवेदनशीलता दिसून येत नाही. तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३३ उपकेंद्रे, दोन ग्रामीण रुग्णालये असा कारभार यंत्रणेचा सुरू असला तरी ही यंत्रणा आणखी सक्षम बनविण्यासाठी आरोग्याच्या आणखी चांगल्या सुविधा पुरविण्याची गरज आहे.

शासनाच्या आरोग्य यंत्रणेमार्फत प्राथमिक व उपकेंद्राच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घटकापर्यंत ही यंत्रणा पोहोचत आहे. आरोग्य केंद्रांकडे पुरेसे डॉक्टर्स व कर्मचारीदेखील उपलब्ध आहेत. तालुक्यात शिरोळ, दत्तवाड ही दोन ग्रामीण रुग्णालये, तर नृसिंहवाडी, अब्दुललाट, दानोळी, नांदणी, जयसिंगपूर, घालवाड, टाकळी अशी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. एक जि. प. दवाखाना, दोन आयुर्वेदिक दवाखाने व ३३ उपकेंद्रे, तर उदगाव येथे क्षय रुग्णालय आहे. वैद्यकीय यंत्रणेला मदतीसाठी सुमारे २८० हून अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत असून, त्यांच्यामार्फत अनेक सर्वेक्षणाच्या मोहीम यंत्रणा राबवीत असते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत साठ ते सत्तर रुग्णांची दररोज तपासणी केली जाते.

रुग्णांच्या तक्रारीनंतर आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध होत आहे. तालुका आरोग्य कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे काही आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांकडून आओ जाओ घर तुम्हारा असे चित्र दिसते. नियंत्रण ठेवणाºया यंत्रणेबाबत काही आरोग्य कर्मचाºयांकडून नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा असून, एखाद्या साथीचा फैलाव झाल्यानंतर यंत्रणा जागृत होते, मग उपाययोजना राबविल्या जातात. पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच लोकप्रतिनिधींचा शासकीय आरोग्य यंत्रणेवर अंकुशच राहिलेला नाही.आणखी ‘१०८’ची गरजशासनाची अत्यावश्यक सेवा बजावणारी १०८ ही रुग्णवाहिका तालुक्यासाठी सोयीची ठरली असली तरी सध्या तीनच रुग्णवाहिका कार्यरत आहेत. अपघातातील रुग्ण असो वा तातडीची आरोग्य सुविधा, त्यासाठी आणखी दोन रुग्णवाहिकांची गरज आहे. त्या उपलब्ध झाल्यास तत्काळ सेवा देण्यास मदत होणार आहे. 

जयसिंगपूरला प्रतीक्षाचपाच वर्षांपूर्वी जयसिंगपूरसाठी ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे. मात्र, जागेच्या तांत्रिक अडचणीमुळे हे रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. वास्तविक, जयसिंगपूरसारख्या शहरातील गरजू रुग्णांना आणखी चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी ग्रामीण रुग्णालय गरजेचे आहे.तालुक्यातील स्थिती०७ प्राथमिक आरोग्य केंद्रे.३३ आरोग्य उपकेंद्रे आहेत.०१ जिल्हा परिषद दवाखाना.०२ आयुर्वेदिक दवाखाने आहेत.०७ रुग्णवाहिका आहेत.१२ एमबीबीएस डॉक्टर आहेत.०८ परिचारिका आहेत.२९ आरोग्यसेवक आहेत, मंजूर पदे ३३ आहेत.३६ आरोग्यसेविका आहेत, मंजूर पदे ४१ आहेत.१२ आरोग्य सहायक आहेत.०९ औषध निर्माता आहेत. 

आरोग्य केंद्रात गेल्यानंतर योग्य ती औषधे उपलब्ध नसतात, असा अनुभव येत आहे. वेळीच औषधे मिळाल्यास त्याचा रुग्णांना उपयोग होणार आहे. रुग्णालयात स्वच्छता असली तरी त्यामध्ये सातत्य दिसून येत नाही.- मंगल जगताप, यड्रावनृसिंहवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. दैनंदिन ७५ ते ८० रुग्ण तपासणीसाठी येतात. येथील आरोग्य यंत्रणा सतर्क असून, रुग्णदेखील समाधानी आहेत.- डॉ. पी. एस. पाखरे 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर