शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

राज्यातील प्राथमिक शाळा आरसीसी करण्याचा मानस: हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 20:33 IST

राज्यात खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा विविध योजना राबवून प्राथमिक शाळांसमोर आव्हाने उभी करत आहेत.

- दत्ता पाटीलकोल्हापूर (म्हाकवे):  राज्यात खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा विविध योजना राबवून प्राथमिक शाळांसमोर आव्हाने उभी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनेक प्राथमिक शाळांची पडझड झाली असून, दुरवस्था होतेय. त्यामुळे राज्यातील पहिल्यांदा केंद्रीय शाळा त्यानंतर सर्वच प्राथमिक शाळा आरसीसी करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शिक्षकांनीही अंतर्मुख होऊन या शाळा वाचविण्यासाठी शिक्षणाचा दर्जा सुधारावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेंडूर(ता.कागल)येथील प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.आपण शिक्षणमंत्री असताना सेमी इंग्रजी सुरू केले होते, असे सांगत ना. मुश्रीफ म्हणाले. राज्यात ६५ हजार ३२४ प्राथमिक शाळा असून यामध्ये अडीच लाखांहून अधिक शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत. मात्र,अनेक शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे. कौले फुटलेली असतात. त्यामुळे या शाळांचा लूक बदलणे गरजेचे आहे. दरम्यान, प्राथमिक शाळा या सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे प्रवेशद्वार आहे. त्या टिकविण्याची जबाबदारी पालक, शिक्षक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकसंधपणे उचलली पाहिजे, असे मतही ना. मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

ग्रामविकास खाते 'पथदर्शी' बनवूः मुश्रीफग्रामविकास मंत्रिपदाच्या काळात दिवगंत आर. आर. पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव ही महत्त्वाकांक्षी अभियानाने राबवून ग्रामविकास खाते गतिमान केले. त्यांच्या आदर्श पायवाटेवरून मार्गक्रमण करून विविध योजनांच्या माध्यमातून हे खाते 'पथदर्शी'बनवू, असा विश्वासही ना. मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.