शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

कृषिपंप वीज जोडणीविना

By admin | Updated: December 10, 2014 23:52 IST

रत्नागिरी पंचायत समिती सभा : महावितरण अधिकाऱ्यांबाबत नाराजी

रत्नागिरी : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी पंपांच्या अनेक कनेक्शनची अजूनही जोडणी केलेली नसल्याने ती तत्काळ करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देत सभापतींसह सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ रत्नागिरी पंचायत समितीची आजची सभा सभापती प्रकाश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत मँगोनेटच्या माध्यमातून निर्यातीसाठी आंबा बागायतदारांनी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करावयाची आहे़ शेतकऱ्यांसाठी कौशल्यावर आधारित तीन शेतीशाळांमध्ये उपक्रम घेण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले़ आंबा नुकसान भरपाईसाठी ८ कोटी रुपयांचे अनुदान आले होते़ त्यापैकी ६ कोटी वाटप करण्यात आले असून, उर्वरित २ कोटी रुपये रक्कम पडून आहे़ ती घेऊन जाण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले़अंगणवाडी सेविकेच्या भरतीसाठी २१ ते ३५ वर्षे वयोमर्यादा होती़ मात्र, आता त्यामध्ये शासनाने बदल केला असून, २१ ते ३० वर्षे वयोमर्यादा करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले़ महावितरणच्या कामाबाबत आजच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली़ मुख्यमंत्री योजनेतून शेतकऱ्यांना कृषी पंपाचे कनेक्शन देणे आवश्यक आहे़ मात्र, महावितरणकडून सन २०११-१२ या वर्षातील लाभार्थींनाही अजून वीज कनेक्शन देण्यात आली नसल्याचे सभापती साळवी यांनी निदर्शनास आणले़ त्यानंतर त्यांनी महावितरणच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त करुन ताबडतोब कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिली़ यावेळी माजी सभापती स्वप्नाली सावंत यांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते़ निमशिक्षकांमुळे तालुक्यातील ६ शून्य शिक्षकी शाळांमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ मात्र, अजूनही तालुक्यामध्ये ६ शून्य शिक्षकी शाळा आहेत़ तेथे लवकरच शिक्षण विभागाकडून ही पदे भरण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी पंचायत समिती सभागृहात स्पष्ट केले़ या सभेला सभापती प्रकाश साळवी, उपसभापती योगेश पाटील, सदस्य मंगेश साळवी, नदीम सोलकर, मनोज हळदणकर, महेश म्हाप, सदस्या अनुष्का खेडेकर, स्वप्नाली सावंत, फातिमा होडेकर, स्नेहगंधा साळुंखे, दाक्षायिणी शिवगण व अन्य उपस्थित होते़ (शहर वार्ताहर)विविध प्रश्नांवर चर्चा....आंबा नुकसानीचे २ कोटी पडून.माजी सभापतींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर.मँगोनेटच्या माध्यमातून निर्यातीसाठी आंबा बागायतदारांनी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक.अंगणवाडीसेविकेच्या भरतीसाठी २१ ते ३५ वर्षे वयोमर्यादेत बदल.महावितरणकडून सन २०११-१२ या वर्षातील लाभार्थींनाही अजून वीज कनेक्शन देण्यात आली नसल्याची माहिती.