शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
4
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
5
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
6
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
7
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
8
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
9
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
10
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
11
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
12
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
13
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
14
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
15
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
16
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
17
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
18
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
19
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
20
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स

कृषिपंप वीज जोडणीविना

By admin | Updated: December 10, 2014 23:52 IST

रत्नागिरी पंचायत समिती सभा : महावितरण अधिकाऱ्यांबाबत नाराजी

रत्नागिरी : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी पंपांच्या अनेक कनेक्शनची अजूनही जोडणी केलेली नसल्याने ती तत्काळ करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देत सभापतींसह सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ रत्नागिरी पंचायत समितीची आजची सभा सभापती प्रकाश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत मँगोनेटच्या माध्यमातून निर्यातीसाठी आंबा बागायतदारांनी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करावयाची आहे़ शेतकऱ्यांसाठी कौशल्यावर आधारित तीन शेतीशाळांमध्ये उपक्रम घेण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले़ आंबा नुकसान भरपाईसाठी ८ कोटी रुपयांचे अनुदान आले होते़ त्यापैकी ६ कोटी वाटप करण्यात आले असून, उर्वरित २ कोटी रुपये रक्कम पडून आहे़ ती घेऊन जाण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले़अंगणवाडी सेविकेच्या भरतीसाठी २१ ते ३५ वर्षे वयोमर्यादा होती़ मात्र, आता त्यामध्ये शासनाने बदल केला असून, २१ ते ३० वर्षे वयोमर्यादा करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले़ महावितरणच्या कामाबाबत आजच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली़ मुख्यमंत्री योजनेतून शेतकऱ्यांना कृषी पंपाचे कनेक्शन देणे आवश्यक आहे़ मात्र, महावितरणकडून सन २०११-१२ या वर्षातील लाभार्थींनाही अजून वीज कनेक्शन देण्यात आली नसल्याचे सभापती साळवी यांनी निदर्शनास आणले़ त्यानंतर त्यांनी महावितरणच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त करुन ताबडतोब कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिली़ यावेळी माजी सभापती स्वप्नाली सावंत यांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते़ निमशिक्षकांमुळे तालुक्यातील ६ शून्य शिक्षकी शाळांमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ मात्र, अजूनही तालुक्यामध्ये ६ शून्य शिक्षकी शाळा आहेत़ तेथे लवकरच शिक्षण विभागाकडून ही पदे भरण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी पंचायत समिती सभागृहात स्पष्ट केले़ या सभेला सभापती प्रकाश साळवी, उपसभापती योगेश पाटील, सदस्य मंगेश साळवी, नदीम सोलकर, मनोज हळदणकर, महेश म्हाप, सदस्या अनुष्का खेडेकर, स्वप्नाली सावंत, फातिमा होडेकर, स्नेहगंधा साळुंखे, दाक्षायिणी शिवगण व अन्य उपस्थित होते़ (शहर वार्ताहर)विविध प्रश्नांवर चर्चा....आंबा नुकसानीचे २ कोटी पडून.माजी सभापतींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर.मँगोनेटच्या माध्यमातून निर्यातीसाठी आंबा बागायतदारांनी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक.अंगणवाडीसेविकेच्या भरतीसाठी २१ ते ३५ वर्षे वयोमर्यादेत बदल.महावितरणकडून सन २०११-१२ या वर्षातील लाभार्थींनाही अजून वीज कनेक्शन देण्यात आली नसल्याची माहिती.