शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कृषी विद्यापीठ ऊस व दुग्ध संशोधनाचे प्रमुख केंद्र करणार - डॉ. संजय पाटील यांचा निर्धार : तळसंदेतील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST

विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरच नव्हे, तर दक्षिण महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा ऊस आणि दुग्ध व्यवसाय हा कणा आहे. ...

विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूरच नव्हे, तर दक्षिण महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा ऊस आणि दुग्ध व्यवसाय हा कणा आहे. हा प्रदेश महाराष्ट्रात स्वाभिमानाने उभा आहे. त्यामागे साखर कारखानदारी व दूध व्यवसायातून आलेली सुबत्ता आहे. त्यामुळे तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात या दोन व्यवसायांतील संशोधन व अद्ययावत ज्ञान मिळवून देणारे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देणार असल्याचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या विद्यापीठाचे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते सकाळी १० वाजता व्हर्च्युअल पध्दतीने उद्घाटन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ पाटील बोलत होते.

तळसंदेतील ओसाड माळरान ते आता कृषी विद्यापीठ असा विकासाचा टप्पा घडविण्यात संजय पाटील यांची दूरदृष्टी, नियोजन महत्त्वाचे ठरले. एकदा एक काम मनावर घेतले की ते उत्तम पध्दतीनेच करून दाखवायचे, या त्यांच्या कार्यपध्दतीला धरूनच या विद्यापीठाची वाटचाल होणार आहे. आगामी दहा वर्षांचा विद्यापीठ विकासाचा रोडमॅप डोळ्यासमोर ठेवूनच या विद्यापीठाचा पाया घातला आहे. या विद्यापीठामुळे दक्षिण महाराष्ट्राच्या कृषी, तंत्रज्ञान, शैक्षणिक विकासातही महत्त्वाची भर घातली आहे. विद्यापीठाच्या उभारणीबद्दल सांगताना डॉ. पाटील म्हणाले, सध्या तळसंदे येथील कृषी महाविद्यालयात चार हजार विद्यार्थी उत्तम दर्जाचे शिक्षण घेत आहेत. तिथे मुला-मुलींचे चांगले वसतिगृह आहे. बी. एस्सी. ॲग्री, बी. टेक ॲग्रिकल्चरल आणि कृषी पदविका अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळे कृषी शिक्षणाची पार्श्वभूमी, उत्तम वातावरण आहे. तिथे आता तिथे कृषी विद्यापीठ आकार घेत आहे. यंदापासूनच किमान ३० अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. येत्या दहा वर्षांत या विद्यापीठाची विद्यार्थी संख्या १६ हजारांवर न्यायचे नियोजन करूनच आम्ही विद्यापीठाचे उद्घाटन करत आहोत.

डॉ. पाटील म्हणाले, हे फक्त कृषी विद्यापीठ नाही. त्याला आम्ही तंत्रज्ञान अभ्यासक्रमांचीही जोड देत आहोत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला बी.एस्सी. झाल्यानंतर एम. बीए. करायचे असेल, तर त्यास याच विद्यापीठात ते करता येईल. एखाद्याला कृषी शिक्षण घेऊन शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करण्याचे ज्ञान मिळवायचे असेल, तर त्याचेही शिक्षण त्यास या विद्यापीठात मिळू शकेल. नव्या काळानुसार व गरजांनुसार समाजाची जी गरज आहे, ती ओळखूनच विद्यापीठाच्या शिक्षणाचा पॅटर्न विकसित करणार आहोत. शिक्षण एका बाजूला आणि समाजाची गरज दुसऱ्या बाजूला ही दरी तयार होणार नाही, अशाच शिक्षणावर आम्ही भर देऊ. त्यातही दक्षिण महाराष्ट्राचा गाभा असलेल्या ऊस व दूध व्यवसायाला पूरक शिक्षण व संशोधनास प्राधान्य देऊ. दक्षिण महाराष्ट्राच्या शेतीच्या गरजा भागवणारे शिक्षण देऊ शकणारे केंद्र म्हणून आम्ही या विद्यापीठाकडे पाहत आहोत. या प्रदेशाचा दूध उद्योग हा मुख्य उद्योग होत आहे. त्यासाठी डेअरी डेव्हलपमेंट, व्हेटरनरी सायन्स शिक्षणाची गरज आहे. ती व्यवस्था आम्ही उभी करू. शेतकऱ्याची नवी पिढी आता शेतीत नवे काही करू पाहत आहे. शिक्षण, ज्ञान घेऊन शेतीत उतरणारे तरुण शेतकरी गावोगावी तयार होत आहेत. तो दूध धंद्यापासून फूलशेती, भाजीपाला, फळशेती, डेअरी फार्म ते आले लागवडीमध्येही रस घेत आहे. त्याला ज्या ज्ञानाची, संशोधनाची, प्रात्यक्षिकांची आणि प्रशिक्षणाची गरज असेल, ते देणारे हे विद्यापीठ प्रमुख केंद्र बनवू.

सातवे विद्यापीठ..

डी. वाय. पाटील यांच्या नावे महाराष्ट्रात हे सातवे विद्यापीठ आता होत आहे. सुरुवातीची तीन विद्यापीठे मुंबई, पुणे व कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित आहेत. त्यानंतरची लोहगाव, आकुर्डी, तळेगावला अभियांत्रिकी शिक्षणाशी संबंधित, तर आता सातवे तळसंदे येथे कृषी शिक्षणाशी संबंधित विद्यापीठ होत आहे.

१२ हजार ट्रॉली मातीतून मळा..

तळसंदे हे वाठारपासून पश्चिमेकडील बाजूला सहा किलोमीटरवर असणारे हे नऊ हजार लोकवस्तीचे गाव आहे. तिथे ३३ वर्षांपूर्वी माळरानावर संजय पाटील यांनी जमीन घेतली. २०५ एकराचे क्षेत्र आहे. कशीबशी इंचभर माती असताना मुळात शेतीची प्रचंड आवड असणाऱ्या संजय पाटील यांनी तिथे १२ हजार ट्रॉली माती आणून मळा फुलवला. पुढे १९९४ ला त्यांनी सहा किलोमीटर पाईपलाईन घालून वारणा नदीतून पाणी आणून हा मळा हिरवागार गेला.