शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर खंडपीठासाठी आंदोलन तीव्र

By admin | Updated: September 12, 2014 23:36 IST

विवेक घाटगे : कोल्हापूर खंडपीठासाठी वकिलांची मोर्चेबांधणी

सिंधुदुर्गनगरी : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी पुन्हा एकदा वकिलांनी कंबर कसली आहे. सहाही जिल्ह्यातील वकिलांची भेट घेऊन कोल्हापूर येथे या सर्वांचा लवकरच मेळावा घेऊन आगामी आंदोलनाचे धोरण निश्चित केले जाणार आहे आणि स्वतंत्र खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचे नियोजन करू, असे प्रतिपादन उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी केले.मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहाही जिल्ह्यातील वकिलांचा संघर्ष सुरू असून, हा संघर्ष अधिक तीव्र करून खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सध्या कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्यावतीने कोल्हापुरातील वकील सहाही जिल्ह्यांचा प्रवास करीत असून, आज हे सर्व वकील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा वकील संघटना सभागृहात अ‍ॅड. राजेंद्र रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती अध्यक्ष अ‍ॅड. घाटगे बोलत होते. यावेळी सचिव राजेंद्र मंडलिक, कोल्हापूर नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक ठाकूर, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. विनय कदम, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना सचिव अ‍ॅड. विरेश नाईक, अ‍ॅड. व्ही. पी. चिंदरकर, अ‍ॅड. राजीव बिले, अ‍ॅड. दीपक नेवगी, अ‍ॅड. उमेश सावंत, जिल्हा सरकारी वकील अमोल सावंत आदी उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले की, ५८ दिवसांच्या आंदोलनात सर्वांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंदोलनाला चांगली साथ मिळाली. मुख्य न्यायमूर्तींनी मुख्यमंत्र्यांना या खंडपीठासंदर्भात ठराव घेण्याबाबत कळविले आहे. तरीही जोवर खंडपीठ अस्तित्त्वात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवावे लागेल. सभाध्यक्ष अ‍ॅड. रावराणे म्हणाले, लोकन्यायालये, कायदाविषयक प्रबोधन शिबिरे आणि न्यायालयांच्या विविध उपक्रमांवर वकिलांनी यापुढे बहिष्कार घालावा लागेल तरच ते आंदोलन आणखीन प्रभावी होईल. हुबळी खंडपीठासाठी तेथील वकिलांनी छेडलेल्या आंदोलनाचे उदाहरण अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिले. खंडपीठासाठी सात वेळा पाठविलेला प्रस्ताव तेथील उच्च न्यायालयाने नाकारला. शेवटी आठव्यावेळी मंजूर केला. तोपर्यंत तेथील वकिलांनी चिकाटी सोडली नव्हती. अ‍ॅड. विनय कदम, अ‍ॅड. हलगे यांनी एकजुटीने हा लढा लढला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आंदोलन तीव्र करण्यासाठी आमचा सहभाग आहे, असे अ‍ॅड. राजीव बिले यांनी सांगितले. अ‍ॅड. विरेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कोल्हापुरातून सुमारे ४० वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)