शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

आणेवारीवरून आंदोलन पेटणार

By admin | Updated: October 15, 2015 00:44 IST

चिपरी, तमदलगेसह सात गावांचा समावेश : जयसिंगपुरात आज आंदोलनाची दिशा ठरणार

जयसिंगपूर : जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे, चिपरी, धरणगुत्ती व हरोली या सात गावांत चुकीच्या पद्धतीने आणेवारी करण्यात आली असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. यामुळे आणेवारीवरून आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, फेर सर्वेक्षण करून आणेवारी कमी करावी, या मागणीसाठी सात गावांतील प्रतिनिधींची आज, गुरुवारी जयसिंगपूर येथे बैठक होणार आहे. याबैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे. यंदा पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाळून गेली असून, शेतकरी आर्थिक आरिष्ठात सापडला आहे. सात गावांत सरासरीपेक्षा कमी पाऊस कायमच पडतो. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी न करताच आणेवारी वाढवून लावली आहे. त्यामुळे योग्य पंचनामे होऊन येथील नागरिकांना शासकीय लाभ मिळावा. याबाबत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा तहसीलदार सचिन गिरी यांना २५ सप्टेंबरला निवेदनद्वारे देण्यात आला होता.जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे, चिपरी, हरोली व धरणगुत्ती ही सात गांवे टंचाईग्रस्त असून, याठिकाणी नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असते. यावर्षी पावसाळा कोरडाच गेल्यामुळे खरीप हंगामात पेरणी झालेली पिके पूर्णत: वाळून गेली आहेत. तसेच येथील जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सात गावांची आणेवारी चुकीची झाली असून, सध्या ७१ टक्के नजर पैसेवारी दाखविली आहे. सदरची नजर पैसे आणेवारी फेर तपासणी करण्यात यावी. येथील गावातील आणेवारी ही ५० टक्यांहून कमी असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणेवारी निश्चित करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत असून, आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सात गावांतील प्रतिनिधींची गुरुवारी जयसिंगपूर येथे बैठक होणार असून, या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. एकूणच आणेवारीवरून गावातील वातावरण तापले आहे. (प्रतिनिधी)जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे, चिपरी, धरणगुत्ती व हरोली या सात गावांत चुकीच्या पद्धतीने आणेवारी झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप फेर सर्वेक्षण करून आणेवारी कमी करण्याची मागणीही गावे टंचाईग्रस्त असून, याठिकाणी नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असते. पावसाळा कोरडाच गेल्यामुळे पेरणी झालेली पिके वाळली आहेत.