शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राजकीय पाठबळाने एजंट गब्बर, त्यातूनच बोगस कामगारांचे जाळे..; कोट्यवधी रुपयांची लूट 

By उद्धव गोडसे | Updated: July 31, 2025 17:15 IST

सहायक कामगार आयुक्तांकडून सुरू झालेल्या तपासणीमुळे अनेकांचे बिंग फुटणार

उद्धव गोडसेकोल्हापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात. याचा लाभ उठविण्यासाठी गावागावांत एजंट सक्रिय झाले आहेत. त्यांनी बनावट दाखले तयार करून बोगस कामगारांची फौजच कागदोपत्री तयार केली आहे. मंडळाच्या योजनांचा लाभ घेणारे आणि बोगस कामगारांकडून कमिशन उकळणारे एजंट गब्बर झाले आहेत. राजकीय पाठबळामुळे त्यांचे फावले होते. मात्र, आता सहायक कामगार आयुक्तांकडून सुरू झालेल्या तपासणीमुळे अनेकांचे बिंग फुटणार आहे.गेल्या १०-१२ वर्षांत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला कोट्यवधी रुपयांचा मिळाला. या पैशातून बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांना सुरक्षा साहित्याचा संच देणे, ७५ टक्के दिव्यांग कामगारांना दोन लाखांची आर्थिक मदत करणे, कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत वैद्यकीय उपचार करणे, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक साहाय्य, संसारोपयोगी भांडी, घरकुल, काम करताना किंवा अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते.

वाचा- बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी, ४५ लाखांचा गंडा; कोल्हापुरात २५ जणांवर गुन्हा अशा विविध योजनांचा लाभ उठविण्यासाठी काही एजंटनी बोगस कामगारांच्या नोंदी सहायक कामगार आयुक्त कार्यालयांकडे केल्या आहेत. बांधकाम क्षेत्राशी काही संबंध नसलेल्या हजारो नावांची नोंदणी केली. त्यांच्या नावावर एजंट लाभ उठवत आहेत. राजकीय पाठबळामुळे राज्यात सर्वत्र हीच स्थिती असल्याने मंडळाच्या कोट्यवधी रुपयांची लूट सुरू आहे.पडताळणीच नाहीकल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांची वेळोवेळी पडताळणी करणे गरजेचे होते. मात्र, कोणतीही खातरजमा न करता नोंदणी झाली आणि लाभाचे वाटपही झाले. तक्रारींचा ओघ वाढताच सहायक कामगार आयुक्तांकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांत तपासणी सुरू झाली आहे. यातून बोगस बांधकाम कामगारांसह एजंटच्या साखळीचा पर्दाफाश होणार आहे. त्यामुळे एजंटगिरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बनावट दाखल्यांचे रॅकेटमोठे आर्थिक लाभ मिळविण्यासाठी बनावट दाखले तयार करून देणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून मृत्यू दाखले, दिव्यांग दाखले, शैक्षणिक कागदपत्रे तयार करून दिली जात आहेत. मुलीच्या लग्नासाठी मिळणारी मदत लाटण्यासाठी लग्न झाल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. असे अनेक गंभीर प्रकार राज्यात सर्वत्र सुरू आहेत.