शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा जातीनेच घेतला सूरजचा बळी

By admin | Updated: January 9, 2015 00:46 IST

विचारपूस नाही : शासकीय यंत्रणाही ढिम्मच

सचिन भोसले -कोल्हापूर - असंवेदनशील यंत्रणा आणि संस्थाचालकांचा नसलेला वचक यांमुळे एका उमलणाऱ्या भविष्याचा गुरुवारी अंत झाला. पाचगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेत नववीत शिकणाऱ्या सूरज पोवारने शाळा अधीक्षक व शिक्षकांनी वारंवार केलेल्या मानहानीमुळे शांतीनगर, उचगाव येथील राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.सूरजची मृत्यूशी झुंज सुरू असताना एकाही शासकीय अधिकाऱ्याने त्याची साधी चौकशीही केली नाही. भटक्या जाती जमातींतील मुले शिकून शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी सुरु झालेल्या शाळेत परत या मुलाचा जातीनेच बळी घेतला असे वास्तव या घटनेतून पुढे आले आहे.रंजल्या-गांजलेल्या समाजातील मुले शिकून शहाणी व्हावीत म्हणून कोल्हापुरात संस्थानकाळात राजर्षी शाहू महाराजांनी विविध जातिधर्मांच्या मुलांसाठी इंग्लंडच्या धर्तीवर कोल्हापुरातही वसतिगृहे काढली. यामुळे अनेक मुले त्या काळी शिकली आणि आजही शिकत आहेत. अशा करवीरनगरीतच्या पाचगाव येथील राजर्षींच्याच नावे असलेल्या आश्रमशाळेतील सतरा वर्षांच्या सूरज पोवार याने आत्महत्या केली. हा दुदैवी प्रकार म्हणजे एका उमलत्या भविष्याचा जणू संवेदना नसणाऱ्या यंत्रणेमुळे हकनाक जीव गेला. आठ वर्षांपूर्वी सूरजचे वडील शामराव पोवार यांचे व्यसनामुळे निधन झाले. काही वर्षे आईने सूरजसह दोन मोठ्या भावांचा सांभाळ केला. पुढे आईचेही निधन झाले. त्यामुळे सूरज लहान असल्याने कधी मोठ्या भावांबरोबर, तर कधी काका अप्पाजी काळे आणि मामांकडे राहत होता. सातवीपर्यंत तो रजपूतवाडी येथील व्यंकाप्पा भोसले यांच्या आश्रमशाळेत शिकला. पुढे त्याने पाचगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेत प्रवेश घेतला. ३० डिसेंबरला त्याच्यावर शाळेतील अधीक्षक आणि शिक्षकांनी चोरीचा आळ घेतल्याची तक्रार आहे. तू फासेपारध्याचा असल्याने चोऱ्याच करणार असे रागाने शिक्षक म्हटल्याने तो तडक मामाकडे निघून गेला व मामाच्या घरी रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलाचा जीव गेला त्याचे काय...?नऊ दिवस सूरज राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना त्याच्याकडे नातेवाइकांशिवाय कोणीच फिरकले नाही. त्याची विचारपूस करायला ना शाळेचे कर्मचारी आले, ना समाजकल्याण विभागाचा कोणी अधिकारी. आश्रमशाळा तशा समाज व शासनाच्याही लेखी दुर्लक्षितच. तसेच दुर्लक्ष या घटनेकडेही झाले व शिकून आयुष्याचे भले झाले असते असे एक आयुष्य उमलण्यापूर्वीच कोमजले. आता चौकशा होतील, पाहणी केली जाईल परंतु मुलाचा जीव गेला त्याचे काय...?