शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

पुन्हा जातीनेच घेतला सूरजचा बळी

By admin | Updated: January 9, 2015 00:46 IST

विचारपूस नाही : शासकीय यंत्रणाही ढिम्मच

सचिन भोसले -कोल्हापूर - असंवेदनशील यंत्रणा आणि संस्थाचालकांचा नसलेला वचक यांमुळे एका उमलणाऱ्या भविष्याचा गुरुवारी अंत झाला. पाचगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेत नववीत शिकणाऱ्या सूरज पोवारने शाळा अधीक्षक व शिक्षकांनी वारंवार केलेल्या मानहानीमुळे शांतीनगर, उचगाव येथील राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.सूरजची मृत्यूशी झुंज सुरू असताना एकाही शासकीय अधिकाऱ्याने त्याची साधी चौकशीही केली नाही. भटक्या जाती जमातींतील मुले शिकून शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी सुरु झालेल्या शाळेत परत या मुलाचा जातीनेच बळी घेतला असे वास्तव या घटनेतून पुढे आले आहे.रंजल्या-गांजलेल्या समाजातील मुले शिकून शहाणी व्हावीत म्हणून कोल्हापुरात संस्थानकाळात राजर्षी शाहू महाराजांनी विविध जातिधर्मांच्या मुलांसाठी इंग्लंडच्या धर्तीवर कोल्हापुरातही वसतिगृहे काढली. यामुळे अनेक मुले त्या काळी शिकली आणि आजही शिकत आहेत. अशा करवीरनगरीतच्या पाचगाव येथील राजर्षींच्याच नावे असलेल्या आश्रमशाळेतील सतरा वर्षांच्या सूरज पोवार याने आत्महत्या केली. हा दुदैवी प्रकार म्हणजे एका उमलत्या भविष्याचा जणू संवेदना नसणाऱ्या यंत्रणेमुळे हकनाक जीव गेला. आठ वर्षांपूर्वी सूरजचे वडील शामराव पोवार यांचे व्यसनामुळे निधन झाले. काही वर्षे आईने सूरजसह दोन मोठ्या भावांचा सांभाळ केला. पुढे आईचेही निधन झाले. त्यामुळे सूरज लहान असल्याने कधी मोठ्या भावांबरोबर, तर कधी काका अप्पाजी काळे आणि मामांकडे राहत होता. सातवीपर्यंत तो रजपूतवाडी येथील व्यंकाप्पा भोसले यांच्या आश्रमशाळेत शिकला. पुढे त्याने पाचगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेत प्रवेश घेतला. ३० डिसेंबरला त्याच्यावर शाळेतील अधीक्षक आणि शिक्षकांनी चोरीचा आळ घेतल्याची तक्रार आहे. तू फासेपारध्याचा असल्याने चोऱ्याच करणार असे रागाने शिक्षक म्हटल्याने तो तडक मामाकडे निघून गेला व मामाच्या घरी रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलाचा जीव गेला त्याचे काय...?नऊ दिवस सूरज राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना त्याच्याकडे नातेवाइकांशिवाय कोणीच फिरकले नाही. त्याची विचारपूस करायला ना शाळेचे कर्मचारी आले, ना समाजकल्याण विभागाचा कोणी अधिकारी. आश्रमशाळा तशा समाज व शासनाच्याही लेखी दुर्लक्षितच. तसेच दुर्लक्ष या घटनेकडेही झाले व शिकून आयुष्याचे भले झाले असते असे एक आयुष्य उमलण्यापूर्वीच कोमजले. आता चौकशा होतील, पाहणी केली जाईल परंतु मुलाचा जीव गेला त्याचे काय...?