शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे शहरात दुपारनंतर शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 13:55 IST

CoroanVirus Kolhapur : कोल्हापूर शहरात लागू असलेली संचारबंदी आणि दिवसभर कडाक्याचे ऊन यामुळे दुपारनंतर शहरातील वर्दळ कमी झाली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद होत्या. त्यामुळे शहरात दुपारपासून शांतता निर्माण झाली. रस्ते काहीसे ओस पडल्याचे दिसले.

ठळक मुद्देसंचारबंदीमुळे शहरात दुपारनंतर शांतता सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद

कोल्हापूर : शहरात लागू असलेली संचारबंदी आणि दिवसभर कडाक्याचे ऊन यामुळे दुपारनंतर शहरातील वर्दळ कमी झाली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद होत्या. त्यामुळे शहरात दुपारपासून शांतता निर्माण झाली. रस्ते काहीसे ओस पडल्याचे दिसले.नेहमीप्रमाणे सकाळी भाजीपाल्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक पिशव्या हातात घेऊन बाहेर पडले. तेव्हा अनेक ठिकाणी महापालिकेची पथके रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करत असल्याचे लक्षात येताच अनेकांनी अन्य पर्यायी रस्त्याने जाणेच पसंद केली.

भाजी मंडईतून गेल्या चार दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने भाजी मंडईतील वर्दळ कमी दिसली. मंडईतसुध्दा भाजी विक्रेत्यांमार्फत सोशल डिस्टन्स राखून भाजी विक्री केली जात असल्याचे पाहायला मिळाले.चारचाकीसह दुचाकी वाहनधारकांची वर्दळ मात्र सुरूच होती.

पोलीस, महापालिकेची पथके त्यांना अडवून येण्या-जाण्याची कारणे विचारत होती. विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करत होती. काही ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य काही दुकाने अर्धी शटर उघडून व्यवसाय करत होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर