शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

राज्य बँक निवडणुकीनंतर थेट कर्जाचा निर्णय घ्यावा

By admin | Updated: January 9, 2017 01:08 IST

हसन मुश्रीफ : बँकेवर पुन्हा सत्ता आमचीच

कोल्हापूर : कर्ज वाटपातील त्रिस्तरीय प्रणाली रद्द करून राज्य बॅँकेच्या माध्यमातून थेट विकास संस्थांना पीक कर्जपुरवठा करण्याचे सहकारमंत्र्यांचे धोरण आहे. परंतु, राज्य बॅँकेची निवडणूक होईपर्यंत त्यांनी निर्णय घेऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. बॅँकेवर पुन्हा दोन्ही कॉँग्रेसचीच सत्ता येणार असल्याने कोल्हापूरसह इतर ठिकाणी सुरू केलेल्या शाखा सुरू ठेवायच्या का? याबाबतही निर्णय होईल, असे सूतोवाचही त्यांनी केले. राज्य बॅँकेने कोल्हापुरात शाखा सुरू करून त्या माध्यमातून विकास संस्थांना पीक कर्ज वाटपाचे धोरण राबविले आहे. बॅँकेच्या या निर्णयाचे आपण स्वागत करतो. जिल्हा बॅँकेला पीक कर्जाच्या माध्यमातून ४०० कोटींचा संचित तोटा सहन करावा लागतो. थेट कर्जपुरवठा केल्यास तो कमी होईल; पण प्रशासकीय मंडळाने गडबड करू नये. राज्य बॅँकेच्या निवडणुकीबाबत नागपूर खंडपीठाकडे याचिका प्रलंबित आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर संचालक मंडळाची संख्या जास्तीत जास्त २१ करता येते, तरीही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची पुन्हा सत्ता येणार आहे. थेट कर्जपुरवठ्याचे धोरण राबवायचे की नाही, हे ठरविले जाणार आहे. कोल्हापूरसह सुरू केलेल्या शाखा बंद करण्याचा निर्णयही कदाचित होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीपर्यंत प्रशासकीय मंडळाने निर्णय घेऊ नये, असे मुश्रीफ यांनी सांगितले. सहकारमंत्र्यांची विरोधाची भूमिकासहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे अलीकडील निर्णय बघता, ते जिल्हा बॅँकेच्या विरोधात भूमिका घेत आहेत. जिल्हा बॅँकेत कर्जपुरवठा करताना राजकारण होत असल्याची भीती असेल तर राष्ट्रीयीकृत बॅँका आहेत. त्यासाठी राज्य बॅँकेला का आणता? असा सवाल मुश्रीफ यांनी केला.