शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

अनेक दिवसांनंतर रुग्णसंख्या हजारच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोल्हापूरची रुग्णसंख्या कधी कमी येणार याकडे डोळे लावून बसलेल्या लोकांना सोमवारी चांगला दिलासा मिळाला. अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात ...

कोल्हापूर : कोल्हापूरची रुग्णसंख्या कधी कमी येणार याकडे डोळे लावून बसलेल्या लोकांना सोमवारी चांगला दिलासा मिळाला. अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा एक हजाराच्या खाली आला. सोमवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे ९४० रुग्ण नोंदविण्यात आले असून, ३३ जणांचा मृत्यू झाला. १८२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्याही दहा हजारांच्या आत आली असून, सध्या ९ हजार २४१ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोल्हापूर शहरात २६५, करवीर तालुक्यात १५३, तर हातकणंगले तालुक्यात १३४ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वाधिक १५ मृत्यू असून, त्याखालोखाल करवीर तालुक्यात सातजणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची रुग्णसंख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत सारेच चिंतेत होते. परंतु, आता हळूहळू रुग्णसंख्या कमी होत आहे; परंतु मृत्यू मात्र अजूनही ३० च्या वर आहेत. ही संख्या कमी होण्याची गरज आहे. रुग्णसंख्या कमी आल्याने बेडसह विविध आरोग्यविषयक गरजांचा जिल्हा आरोग्य यंत्रणावरील ताण कांहीसा कमी आला आहे.

चौकट

सर्वाधिक मृत्यू कोल्हापुरात

कोल्हापूर १५

शुक्रवार पेठ, शिवाजी पार्क, आपटेनगर, लक्षतीर्थ वसाहत, राजोपाध्येनगर, यादवनगर, गजानन महाराज नगर, शाहू मिल कॉलनी, नवीन वाशी नाका, कदमवाडी, रुईकर कॉलनी २, सम्राटनगर, विचारे माळ

करवीर ०७

वाशी, प्रयाग चिखली, निगवे दुमाला २, कोथळी, शिये, शिंगणापूर

हातकणंगले ०३

हेर्ले २, कबनूर

शिरोळ ०२

टाकळेवाडी, टाकवडे

गडहिंग्लज ०१

शिप्पूर

शाहूवाडी ०१

पनोरी

आजरा ०१

पोळगाव

इतर ०३

अंकली, पाडळी, मनगुत्ती