शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अनेक दिवसांनंतर रुग्णसंख्या हजारच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोल्हापूरची रुग्णसंख्या कधी कमी येणार याकडे डोळे लावून बसलेल्या लोकांना सोमवारी चांगला दिलासा मिळाला. अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात ...

कोल्हापूर : कोल्हापूरची रुग्णसंख्या कधी कमी येणार याकडे डोळे लावून बसलेल्या लोकांना सोमवारी चांगला दिलासा मिळाला. अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा एक हजाराच्या खाली आला. सोमवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे ९४० रुग्ण नोंदविण्यात आले असून, ३३ जणांचा मृत्यू झाला. १८२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्याही दहा हजारांच्या आत आली असून, सध्या ९ हजार २४१ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोल्हापूर शहरात २६५, करवीर तालुक्यात १५३, तर हातकणंगले तालुक्यात १३४ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वाधिक १५ मृत्यू असून, त्याखालोखाल करवीर तालुक्यात सातजणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची रुग्णसंख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत सारेच चिंतेत होते. परंतु, आता हळूहळू रुग्णसंख्या कमी होत आहे; परंतु मृत्यू मात्र अजूनही ३० च्या वर आहेत. ही संख्या कमी होण्याची गरज आहे. रुग्णसंख्या कमी आल्याने बेडसह विविध आरोग्यविषयक गरजांचा जिल्हा आरोग्य यंत्रणावरील ताण कांहीसा कमी आला आहे.

चौकट

सर्वाधिक मृत्यू कोल्हापुरात

कोल्हापूर १५

शुक्रवार पेठ, शिवाजी पार्क, आपटेनगर, लक्षतीर्थ वसाहत, राजोपाध्येनगर, यादवनगर, गजानन महाराज नगर, शाहू मिल कॉलनी, नवीन वाशी नाका, कदमवाडी, रुईकर कॉलनी २, सम्राटनगर, विचारे माळ

करवीर ०७

वाशी, प्रयाग चिखली, निगवे दुमाला २, कोथळी, शिये, शिंगणापूर

हातकणंगले ०३

हेर्ले २, कबनूर

शिरोळ ०२

टाकळेवाडी, टाकवडे

गडहिंग्लज ०१

शिप्पूर

शाहूवाडी ०१

पनोरी

आजरा ०१

पोळगाव

इतर ०३

अंकली, पाडळी, मनगुत्ती