शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

पंचगंगा प्रदूषित करून काळम्मावाडीच्या मागे

By admin | Updated: December 25, 2015 00:24 IST

कोल्हापूर, इचलकरंजीचे पाप : नदीकाठच्या अन्य गावांना वाली कोण?: नशिबी दूषित पाणीच

अतुल आंबी --- इचलकरंजी पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये कोल्हापूर महानगरपालिका ५२ टक्के, तर इचलकरंजी नगरपालिका २३ टक्के जबाबदार आहे, असे असतानाही या दोन्ही शहरांचा काळम्मावाडीतून थेट पाईपलाईनद्वारे पिण्यासाठी शुद्ध पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुद्ध पाणी घेऊन वापरून पुन्हा दूषित झालेले पाणी पंचगंगा नदीतच मिसळणार. त्यामुळे नदीकाठच्या अन्य गावांना मात्र प्रदूषित पाणीच मिळत राहणार. त्यापेक्षा पंचगंगा नदीच प्रदूषणमुक्त, शुद्ध केल्यास सर्वांनाच समान न्याय मिळेल, अशी भावना नदीकाठच्या अनेक गावांतील नागरिकांनी व्यक्त केली.कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील घरगुती, मैलामिश्रित व औद्योगिक सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे अनेकवेळा उघडकीस आले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (निरी)ने दिलेल्या अहवालातही प्रदूषण असल्याचे नमूद केले आहे. कोल्हापूरला सध्या पंचगंगा नदीतून पिण्यासाठी पाणी घेऊन जलशुद्धिकरण प्रकल्पाच्या माध्यमातून शुद्ध करून पाणीपुरवठा केला जातो. तसेच इचलकरंजी नगरपालिकेनेही पंचगंगा व कृष्णा नदीतून पाणी घेऊन शुद्धिकरण करून पुरवठा केला जातो. याउलट नदीकाठच्या गावांना मात्र शुद्धिकरण प्रकल्पही उभारण्यासाठी निधी मिळत नाही. त्यामुळे पंचगंगा नदीतील प्रदूषित पाणीच थेट प्यावे लागते.असे असतानाही प्रदूषणास मुख्य जबाबदार मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका व इचलकरंजी नगरपालिका आता कोट्यवधी रुपये शासनाकडून मंजूर करून घेऊन त्या माध्यमातून काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे शुद्ध पाणी आणून ते पिण्यासाठी वापरणार आहेत. हे पाणी वापरून प्रदूषित झालेले सांडपाणी पुन्हा गटारी व नाल्यांमार्फत पंचगंगा नदीमध्येच सोडले जाणार. कोल्हापूर महापालिकेच्यावतीने मोठा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असला तरी त्यालाही बराच कालावधी लोटणार आहे. इचलकरंजीत आता भुयारी गटार योजना कार्यान्वित झाली आहे, असे सांगितले जात आहे, तर एसटीपी प्रकल्पाचा अद्याप फक्त प्रयत्न सुरू आहे. नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ व काही जाणकार नागरिकांच्या मते या दोन शहरांतील घरगुती व औद्योगिक सांडपाणी पंचगंगेत मिसळणे बंद झाले, तरी पंचगंगा बऱ्याच अंशी प्रदूषणमुक्त होईल. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविताना दिखावा न करता शंभर टक्के क्षमतेने चालणारी योजना राबवावी, अशी मागणीही होत आहे. त्यामुळे पर्यायाने ग्रामीण भागातील ग्रामस्थांसह शेतीलाही चांगले पाणी मिळेल.नदीचे प्रदूषण झाले म्हणून थेट पाईपलाईनचा पर्याय सुचविला जाणे, हेच मुळात चुकीचे आहे. प्रत्येकजण थेट पाईपलाईन म्हणत राहिला, तर नदीचे अस्तित्वच संपुष्टात येईल. अशा योजना म्हणजे निसर्गचक्राच्या आणि शहराच्या पर्यावरणीय विकासाच्या विरोधात आहे. त्यापेक्षा सांडपाण्याचेच लोंढे एकत्र करून पाईप बंद करून त्यावर उत्तम प्रक्रिया करणे योग्य ठरेल. प्रदूषण नियंत्रण करून पर्यावरण नीती अवलंबल्यास नदीचे संवर्धन होऊन सर्वांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरेल.- संदीप चोडणकर (एम.एस्सी. पर्यावरण शास्त्र)एकीकडे कोल्हापूर व इचलकरंजी शहरे राजकीय ताकद लावून काळम्मावाडीतून थेट पाणी पिण्यासाठी आणत आहेत, तर दुसरीकडे याच शहरांचे प्रदूषित पाणी पिणाऱ्या गावांना मात्र प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करायला निधीही मिळत नाही. फक्त शहरांनाच काळम्मावाडीतून थेट पाणीपुरवठा का? थेट पाणीपुरवठा करायचा असेल, तर नदीकाठावरच्या सर्वच गावांनाही करावा. त्यामुळे देशात सर्वांना समान हक्क असल्याची जाणीव होईल.- भरत खोत, ग्रामस्थ, चंदूर.नदीवर ६४ बंधारेपंचगंगा नदी व उपनद्यांवर मिळून कासारी १४, कुंभी १०, धामणी ५, तुळशी ९ , भोगावती ६ व त्यानंतर पंचगंगा नदीवरील ८ असे एकूण ६४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्यामुळे नदीला ६४ तलावांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.