शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

मनपा निवडणुकीनंतरच शहराची हद्दवाढी

By admin | Updated: April 5, 2015 00:27 IST

प्रशासन गतिमान : एप्रिल मध्ये पाठविणार अहवाल

 कोल्हापूर : महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीपूर्वी हद्दवाढीचा निर्णय घेतल्यास सध्याच्या सभागृहास किमान एक वर्षाची पुढे संधी मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या चार-पाच गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्याचा मानस राज्य शासनाचा असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. महापालिका हद्दवाढीतील प्रस्तावित १७ गावांची बैठक घेऊन भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यानंतरच याबाबतचा सविस्तर अहवाल ३० एप्रिलपर्यंत शासनास सादर होण्याची शक्यता आहे. हद्दवाढीसाठी प्रशासन प्रयत्न करीत असतानाच नगरसेवक मात्र, महापौर हटाव व येणाऱ्या निवडणुका यातच दंग असल्याचे चित्र आहे. ‘राजकीय विरोधामुळे कोल्हापूरची हद्दवाढ नाकारण्यात येत आहे,’ असे दोन ओळींचे पत्र लिहून राज्य शासनाने कोल्हापूरची हद्दवाढ नाकारली. याप्रश्नी उच्च न्यायालयाने राज्य शासनास निर्णय घेण्याची दिलेली मुदत ओलांडून गेल्याने अवमान याचिकेच्या भीतीने राज्य शासनाने हद्दवाढप्रश्नी तातडीने निर्णय घेतला. दरम्यान, महापालिकेची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत आहे. हद्दवाढीची घोषणा केल्यास नियमाप्रमाणे सभागृहास सहा महिने ते दीड वर्षापर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. ही टाळण्यासाठीच शासनाने राजकीय हेतूने हद्दवाढीचा प्रश्न सध्या बासनात गुंडाळल्याची चर्चा आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हद्दवाढीसाठी प्रस्तावित गावांतील प्रमुखांची बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीच्या अनुषंगाने प्रशासन एप्रिल महिनाअखेरीस शासनास हद्दवाढीचा पुनर्विचार करण्याबाबत प्रस्ताव पाठविणार आहे. हद्दवाढीसाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. याउलट नगरसेवक महापौर हटाव मोहिमेत गुंतल्याचे चित्र आहे. प्रशासनास राजकीय पाठबळ मिळत नसल्याने हद्दवाढीचा प्रश्न कासवगतीने वाटचाल करीत असल्याची खंत याप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)