शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

मनपा निवडणुकीनंतरच शहराची हद्दवाढी

By admin | Updated: April 5, 2015 00:27 IST

प्रशासन गतिमान : एप्रिल मध्ये पाठविणार अहवाल

 कोल्हापूर : महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीपूर्वी हद्दवाढीचा निर्णय घेतल्यास सध्याच्या सभागृहास किमान एक वर्षाची पुढे संधी मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या चार-पाच गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्याचा मानस राज्य शासनाचा असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. महापालिका हद्दवाढीतील प्रस्तावित १७ गावांची बैठक घेऊन भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यानंतरच याबाबतचा सविस्तर अहवाल ३० एप्रिलपर्यंत शासनास सादर होण्याची शक्यता आहे. हद्दवाढीसाठी प्रशासन प्रयत्न करीत असतानाच नगरसेवक मात्र, महापौर हटाव व येणाऱ्या निवडणुका यातच दंग असल्याचे चित्र आहे. ‘राजकीय विरोधामुळे कोल्हापूरची हद्दवाढ नाकारण्यात येत आहे,’ असे दोन ओळींचे पत्र लिहून राज्य शासनाने कोल्हापूरची हद्दवाढ नाकारली. याप्रश्नी उच्च न्यायालयाने राज्य शासनास निर्णय घेण्याची दिलेली मुदत ओलांडून गेल्याने अवमान याचिकेच्या भीतीने राज्य शासनाने हद्दवाढप्रश्नी तातडीने निर्णय घेतला. दरम्यान, महापालिकेची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत आहे. हद्दवाढीची घोषणा केल्यास नियमाप्रमाणे सभागृहास सहा महिने ते दीड वर्षापर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. ही टाळण्यासाठीच शासनाने राजकीय हेतूने हद्दवाढीचा प्रश्न सध्या बासनात गुंडाळल्याची चर्चा आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हद्दवाढीसाठी प्रस्तावित गावांतील प्रमुखांची बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीच्या अनुषंगाने प्रशासन एप्रिल महिनाअखेरीस शासनास हद्दवाढीचा पुनर्विचार करण्याबाबत प्रस्ताव पाठविणार आहे. हद्दवाढीसाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. याउलट नगरसेवक महापौर हटाव मोहिमेत गुंतल्याचे चित्र आहे. प्रशासनास राजकीय पाठबळ मिळत नसल्याने हद्दवाढीचा प्रश्न कासवगतीने वाटचाल करीत असल्याची खंत याप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)