शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

पलायनानंतर लोकरेचा जंगलात आसरा

By admin | Updated: March 3, 2015 21:56 IST

धक्कादायक जबाब : सावंतवाडी कारागृहातील छप्पर दुरूस्तीवेळी रचला होता कट

अनंत जाधव -सावंतवाडी -एचडीएफसी बँकेची कॅश वाहतूक करणाऱ्या गाडीला उडवून देण्याचा कट रचणारा मास्टर मार्इंड ज्ञानेश्वर जगन्नाथ उर्फ माऊली लोकरे याने सावंतवाडी कारागृहात असताना कारागृह अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करीत कारागृहाच्या छप्पर दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि याचवेळी छपराच्या दोन फळ्या बाजूला करून पसार झाला, असे पोलिसांना दिलेल्या जबाबात लोकरे याने म्हटले आहे. यासाठी दोन सळ्यांचा उपयोग केला आणि पसार झाल्यानंतर तीन दिवस ट्रकच्या शोधात जंगलात लपून बसल्याची धक्कादायक माहिती त्याने दिली. सावंतवाडी पोलिसांनी मंगळवारी ज्ञानेश्वर लोकरे याला बीड पोलिसांकडून ताब्यात घेतल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला. यात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आंबोली-नांगरतास धबधब्याजवळ एचडीएफसी बँकेच्या कॅश वाहतूक करणाऱ्या गाडीला बॉम्बद्वारे उडवून देण्याचा कट लोकरे याने रचला होता. या कटात त्याच्या नातेवाईकांसह अन्य तिघांनी मदत केली होती. घटनेनंतर एक महिन्याने सोलापूर पोलिसांच्या मदतीने त्याच्या मोहोळ (जि. सोलापूर) या गावातून त्याला अटक करण्यात आली होती.या गुन्ह्याची सुनावणी ओरोस येथील जिल्हा न्यायालयात सुरू होती. त्यासाठी त्याला सावंतवाडीतील जिल्हा कारागृहात ठेवले होते. या कालावधीत त्याने कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला. तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे इमारतीच्या छप्पर दुरूस्तीचे काम दिले होते.कैद्यांसाठी जिथे जेवण तयार केले जाते, त्या स्वयंपाकगृहाच्या खोलीच्या छप्पर दुरुस्तीदरम्यान त्याने दोन फळ््या पळून जाता येईल, अशा रीतीने अलगद ठेवल्या होत्या. तत्पूर्वी पळून जाण्यासाठी लोकरे दोरी विणतो, याची माहिती तुरुंगातच पसरल्याने त्याने दोरी विणण्याचा मार्ग सोडून दिला. मात्र, त्याच्या अंथरूणाखाली दोरीचा लांबलचक पुडका अधिकाऱ्यांना मिळाला होता.सिंधुदुर्गमध्ये आलाच नाहीसावंतवाडी कारागृहातून पलायन केल्यानंतर पुन्हा कोकणात आलोच नाही. माझे सर्व गुन्हे सोलापूर, बीड, अहमदनगर आदी ठिकाणीच केले. येथे पोलीस कसून तपासणी करतात. आमच्याकडे एवढी चौकशी होत नाही, असा खुलासाही त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.बीडमध्ये बँक फोडून पलायन करताना आष्टी तालुक्यात माझ्या सोबतच्या चौघांना पकडले. त्यांच्यापैकी एकाच्या मदतीने माझ्या मोबाईलवरून फोन करून मला बोलावून घेतले. त्यांना पकडल्याची माहिती मला नसल्याने मी बेसावध होतो. साथीदाराच्या फोनमुळे मी बीड येथे गेलो असताना तेथेच पोलिसांनी मला पकडल्याचे त्याने सांगितले.पलायनानंतर तिसरे लग्नपलायन केल्यानंतर अवघ्या वर्षभरातच लोकरेने तिसरा विवाह केला. पण हा विवाह फार काळ टिकला नसल्याचे पोलीस जबाबात पुढे आले आहे. विवाहानंतरही चोरीचे धंदे सुरू ठेवल्याने पत्नी कंटाळून सोडून गेल्याचे त्याने सांगितले.चहा घेतला...नाश्ता घेण्याआधीच फरारज्ञानेश्वर लोकरे याने १४ जानेवारी २०११ या दिवशी प्लॅनला दिशा दिली. तो पहाटे ५ वाजता उठला. सहा वाजण्याच्या सुमारास त्याने चहा घेतला. कारागृहात सकाळी साडेसहाच्या सुमारास नाष्टा दिला जातो. पण तो नाष्ट्याच्या ठिकाणी गेलाच नाही. ठरल्याप्रमाणे जेवण खोलीत त्याने दोन मोठ्या सळ्या आणून ठेवल्या होत्या. त्यांच्या आधाराने आधीच ठेवलेल्या दोन फळ््या अलगद बाजूला करून तो चढून वर गेला. छपराची भिंत व कारागृहाची संरक्षक भिंत यांच्यातील अंतर मोठे असल्याने त्याने एक सळी दोन्ही भिंतीवर आडवी टाकली व संरक्षक भिंतीवरून उडी ठोकून पळून गेला.मोती तलावाच्या काठावरून चालतसावंतवाडी कारागृहातून सकाळी साडेसहाच्या सुमारास पलायन केल्यानंतर लोकरे याने कारागृहाच्या भिंतीवरून बाजूला टाकलेल्या वाळूच्या ढिगावर उडी मारल्याने त्याला मोठी दुखापत झाली नाही.त्यानंतर रस्त्याने मोती तलावाच्या काठावर येऊन तो ट्रकची वाट पाहत थांबला होता. तेथे कोणतीच वाहन न मिळाल्याने त्याने थेट एसटी बसस्थानक गाठले. तेथून चालतच आंबोलीच्या दिशेने गेला.सापडण्याच्या भीतीने त्याने अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माडखोल जंगलाचा आसरा घेतला. तब्बल तीन दिवस अन्न-पाण्याविना तो माडखोलच्या जंगलात थांबला होता. या काळात वेळोवेळी रस्त्यावर येऊन एखादे वाहन मिळते का ते तो बघत होता. अखेर पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या ट्रकच्या मागे बसून तो कोल्हापूरला गेला आणि तेथून त्याने आपले गाव मोहोळ गाठले.पंढरपूर पोलिसांना खोटे नाव सांगितल्याने बचावलाखातरजमा नाही : साप तस्करी प्रकरण सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहातून पलायन केल्यानंतर अवघ्या दीड वर्षातच, म्हणजेच २०१२ मध्ये पंढरपूर येथील मित्राच्या मदतीने दुतोंड्या सापाची तस्करी करताना ज्ञानेश्वर उर्फ माऊली लोकरे याच्यासह तिघांना पंढरपूर पोलिसांनी पकडले होते. मात्र, लोकरे याने पोलिसांना राजू कृष्णा पवार असे खोटच नाव सांगितले होते. याबाबत पंढरपूर पोलिसांनी कोणतीही खातरजमा केली नव्हती, अशी माहिती सावंतवाडी पोलीसांनी दिलेल्या जबाबात पुढे आली आहे. पंढरपूर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर मी सोलापूर येथील जिल्हा कारागृहातच होतो. न्यायालयात तीन महिन्याने आरोपपत्र दाखल केल्यानंतर मी जामिनावर सुटलो, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. (प्रतिनिधी)