शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

लॉकडाऊन संपल्यानंतर कोल्हापुरातून मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:26 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत अद्याप राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केलेली नाही. राज्य मागासवर्गीय आयोग नेमलेला नाही. निव्वळ घोषणा ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत अद्याप राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केलेली नाही. राज्य मागासवर्गीय आयोग नेमलेला नाही. निव्वळ घोषणा केल्या जात आहेत. आम्ही कोणतेही निर्णय घेतले, तरी मराठा समाज काहीच करू शकत नाही, असा सरकारचा समज झाला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाने आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी कोल्हापुरातून पडणार असल्याचे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

आरक्षणाचे जनक असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज माझे पणजोबा आहेत. त्यामुळे एक मराठा म्हणून सरकारला प्रश्न विचारतो की, आम्ही भीक की, खैरात मागतोय का? आरक्षण आमचा अधिकार, हक्क आहे. जे आरक्षण आम्हाला मिळाले होते. ते या सरकारने घालविले आहे. पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार काहीच पाऊल उचलत नाही. त्यामुळे आता मराठा काय आहे. आपली ताकद काय आहे ते सरकारला दाखविण्यासाठी मराठा समाज एकत्र यावे. पुन्हा लढा उभा करावा. आरक्षणासाठीच्या लढ्याची ठिणगी लॉकडाऊन संपल्यानंतर कोल्हापुरातून पडेल. या लढ्याकरिता समाजाला संघटित करण्यासाठी एक मराठा म्हणून मी आवश्यक ती सर्व पाऊल उचलणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे. मराठा समाजातील बांधव, युवकांना भेटणार आहे. विविध संघटनांशी समन्वय साधून त्यांना एकत्रित करणार आहे. आरक्षण देण्याबाबत पुढील पाऊलं उचलण्यासाठी सरकारला भाग पाडले जाईल, असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

चौकट

मराठा समाजाने नेतृत्व करायचे

आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व हे मराठा समाजाने करायचे आहे. गेल्यावेळी ५८ मोर्चे काढले म्हणून आपल्याला आरक्षण मिळाले. त्यावेळी सामान्य मराठा म्हणून क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालो. मी पहिल्यांदा मराठा असून आणि नंतर पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र यावे. पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून एक मराठा म्हणून मी या लढ्यात सामील होणार आहे. ही भूमिका मी मुंबईत झालेल्या भाजपच्या बैठकीत स्पष्ट केली असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले

मराठा समाजाला गृहित धरून आरक्षणाबाबत राज्य सरकार हलगर्जीपणाने निर्णय घेत आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही नाही, तर सत्ताधारी राजकारण करत आहेत.

पुढच्या पिढीसाठी आता आपण सर्वांनी पक्ष, गट-तट सोडून एकत्र यावे.

आरक्षण घेतल्याशिवाय आता स्वास्थ बसायचे नाही.

राज्याला दिशा देणारे आंदोलन हे कोल्हापूरने उभारले पाहिजे.