शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन संपल्यानंतर कोल्हापुरातून मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:26 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत अद्याप राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केलेली नाही. राज्य मागासवर्गीय आयोग नेमलेला नाही. निव्वळ घोषणा ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत अद्याप राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केलेली नाही. राज्य मागासवर्गीय आयोग नेमलेला नाही. निव्वळ घोषणा केल्या जात आहेत. आम्ही कोणतेही निर्णय घेतले, तरी मराठा समाज काहीच करू शकत नाही, असा सरकारचा समज झाला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाने आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी कोल्हापुरातून पडणार असल्याचे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

आरक्षणाचे जनक असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज माझे पणजोबा आहेत. त्यामुळे एक मराठा म्हणून सरकारला प्रश्न विचारतो की, आम्ही भीक की, खैरात मागतोय का? आरक्षण आमचा अधिकार, हक्क आहे. जे आरक्षण आम्हाला मिळाले होते. ते या सरकारने घालविले आहे. पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार काहीच पाऊल उचलत नाही. त्यामुळे आता मराठा काय आहे. आपली ताकद काय आहे ते सरकारला दाखविण्यासाठी मराठा समाज एकत्र यावे. पुन्हा लढा उभा करावा. आरक्षणासाठीच्या लढ्याची ठिणगी लॉकडाऊन संपल्यानंतर कोल्हापुरातून पडेल. या लढ्याकरिता समाजाला संघटित करण्यासाठी एक मराठा म्हणून मी आवश्यक ती सर्व पाऊल उचलणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे. मराठा समाजातील बांधव, युवकांना भेटणार आहे. विविध संघटनांशी समन्वय साधून त्यांना एकत्रित करणार आहे. आरक्षण देण्याबाबत पुढील पाऊलं उचलण्यासाठी सरकारला भाग पाडले जाईल, असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

चौकट

मराठा समाजाने नेतृत्व करायचे

आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व हे मराठा समाजाने करायचे आहे. गेल्यावेळी ५८ मोर्चे काढले म्हणून आपल्याला आरक्षण मिळाले. त्यावेळी सामान्य मराठा म्हणून क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालो. मी पहिल्यांदा मराठा असून आणि नंतर पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र यावे. पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून एक मराठा म्हणून मी या लढ्यात सामील होणार आहे. ही भूमिका मी मुंबईत झालेल्या भाजपच्या बैठकीत स्पष्ट केली असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले

मराठा समाजाला गृहित धरून आरक्षणाबाबत राज्य सरकार हलगर्जीपणाने निर्णय घेत आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही नाही, तर सत्ताधारी राजकारण करत आहेत.

पुढच्या पिढीसाठी आता आपण सर्वांनी पक्ष, गट-तट सोडून एकत्र यावे.

आरक्षण घेतल्याशिवाय आता स्वास्थ बसायचे नाही.

राज्याला दिशा देणारे आंदोलन हे कोल्हापूरने उभारले पाहिजे.