शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

निवडणुकीनंतर कोल्हापूर शहरात अतिक्रमण विरोधात तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:44 IST

कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अतिक्रमण कारवाई सुरू करणार आहे. या कारवाईपूर्वी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, नुकसान टाळावे, असे आवाहन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केले आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीनंतर कोल्हापूर शहरात अतिक्रमण विरोधात तडाखानागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अतिक्रमण कारवाई सुरू करणार आहे. या कारवाईपूर्वी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, नुकसान टाळावे, असे आवाहन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केले आहे.शहरात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. आरटीओ कार्यालय, कसबा बावड्यातील भगवा चौक, राजर्षी शाहू जन्मस्थळ, भाजी मंडई, महावीर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका मुख्य कार्यालय परिसर, मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी, गंगावेश परिसर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी परिसर, भवानी मंडप परिसरात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.

शहरातील सर्व फुटपाथ अतिक्रमणाने व्यापले आहेत. नागरिक व नगरसेवकांनी मागणी करूनही ठोस कारवाई होत नाही; त्यामुळे नागरिकांत रोष आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण मोहीम तीव्र करण्याचे आदेश आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहेत. या कारवाईस लोकप्रतिनिधी व नागरिक किती साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

महापालिका क्षेत्रातील नागरिक, व्यावसायिकांनी फुटपाथ, रहदारीचे चौक, मंडई, महानगरपालिकेच्या खुल्या जागा, आदी ठिकाणी अनधिकृतपणे व महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय अनेक ठिकाणी बांधकामे व अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे रहदारीला अडथळा ठरत आहेत. अशी सर्व अतिक्रमणे स्वत:हून आठ दिवसांत संबंधितांनी काढून घ्यावीत. महापालिकातर्फे शहरातील सर्व अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही सुरू करणार असून, यामध्ये कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान झाल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही.- नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता)

 

पोलीस प्रशासन सकारात्मकपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महापालिकेने मागणी न करतानाही अतिक्रमण कारवाईसाठी मदत म्हणून पोलिसांचे एक पथक कायमस्वरूपी देण्याची ग्वाही दिली आहे. पोलीस बंदोबस्त सहज उपलब्ध होणार असल्याने महापालिकेला कारवाई करणे सोपे होणार आहे. सर्वसमावेशक व सातत्य ठेवत महापालिकेने अतिक्रमणविरोधात धडाका लावावा, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर