शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

निवडणुकीनंतर कोल्हापूर शहरात अतिक्रमण विरोधात तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:44 IST

कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अतिक्रमण कारवाई सुरू करणार आहे. या कारवाईपूर्वी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, नुकसान टाळावे, असे आवाहन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केले आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीनंतर कोल्हापूर शहरात अतिक्रमण विरोधात तडाखानागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अतिक्रमण कारवाई सुरू करणार आहे. या कारवाईपूर्वी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, नुकसान टाळावे, असे आवाहन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केले आहे.शहरात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. आरटीओ कार्यालय, कसबा बावड्यातील भगवा चौक, राजर्षी शाहू जन्मस्थळ, भाजी मंडई, महावीर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका मुख्य कार्यालय परिसर, मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी, गंगावेश परिसर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी परिसर, भवानी मंडप परिसरात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.

शहरातील सर्व फुटपाथ अतिक्रमणाने व्यापले आहेत. नागरिक व नगरसेवकांनी मागणी करूनही ठोस कारवाई होत नाही; त्यामुळे नागरिकांत रोष आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण मोहीम तीव्र करण्याचे आदेश आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहेत. या कारवाईस लोकप्रतिनिधी व नागरिक किती साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

महापालिका क्षेत्रातील नागरिक, व्यावसायिकांनी फुटपाथ, रहदारीचे चौक, मंडई, महानगरपालिकेच्या खुल्या जागा, आदी ठिकाणी अनधिकृतपणे व महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय अनेक ठिकाणी बांधकामे व अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे रहदारीला अडथळा ठरत आहेत. अशी सर्व अतिक्रमणे स्वत:हून आठ दिवसांत संबंधितांनी काढून घ्यावीत. महापालिकातर्फे शहरातील सर्व अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही सुरू करणार असून, यामध्ये कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान झाल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही.- नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता)

 

पोलीस प्रशासन सकारात्मकपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महापालिकेने मागणी न करतानाही अतिक्रमण कारवाईसाठी मदत म्हणून पोलिसांचे एक पथक कायमस्वरूपी देण्याची ग्वाही दिली आहे. पोलीस बंदोबस्त सहज उपलब्ध होणार असल्याने महापालिकेला कारवाई करणे सोपे होणार आहे. सर्वसमावेशक व सातत्य ठेवत महापालिकेने अतिक्रमणविरोधात धडाका लावावा, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर