शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

प्रशासक नियुक्तीनंतरच महामंडळाचे ग्रहण सुटेल

By admin | Updated: March 17, 2016 00:05 IST

याचाच परिणाम मागील सर्वसाधारण सभेत ‘रोख रक्कम माझ्याकडे आहे आणि ती एका विशिष्ट कामासाठी ‘अंडर टेबल’ देण्याकरिता मी स्वत:जवळ ठेवली आहे’ असे

विद्यमान कार्यकारिणीतील संचालक, विशेषत: तत्कालीन अध्यक्ष यांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत केलेला मनमानी कारभार, चॅरिटी कमिशनच्या परवानगीशिवाय मोडलेल्या मुदतबंद ठेवी, मानाचा मुजरा कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी त्यावेळी केलेली पैशांची वारेमाप उधळपट्टी, अशा अनेकविध कारणांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून महामंडळाचा कार्यकाळ वादग्रस्त आणि अंधारमय झाला. याचाच परिणाम मागील सर्वसाधारण सभेत ‘रोख रक्कम माझ्याकडे आहे आणि ती एका विशिष्ट कामासाठी ‘अंडर टेबल’ देण्याकरिता मी स्वत:जवळ ठेवली आहे’ असे जाहीरपणे विधान करून महामंडळाच्या पारदर्शी कारकिर्दीला चारित्र्यहननाचा काळाकुट्ट डाग लागला. त्याच सभेत त्यांनी रक्कम उपाध्यक्षांच्या स्वाधीन करीत असल्याचे कबूल केले आणि उपाध्यक्षांनीही, ती उद्या बँकेत भरत असल्याच सांगितले. पण, ती रक्कम त्यांनी भरली नाही, हे महामंडळाने न्यायालयात तत्कालीन अध्यक्ष, सहखजिनदार यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फिर्यादीने सिद्ध होते. अर्थातच सभेत आणलेल्या रोख रकमेचे गौडबंगाल काय आहे? उपाध्यक्षांवर महामंडळाने का कारवाई केली नाही, हे त्याहूनही भयानक आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर कारवाई करण्याबरोबरच, महामंडळाचे कार्य पारदर्शी चालवण्याची प्रमुख कार्यवाह म्हणून आणि स्वत:ला महामंडळाच्या संस्थापकांपैकी एक समजणारे (?) सुभाष भुरके यान्ाांही तितकेच जबाबदार धरून, त्यांच्यावरही कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. म्हणजे भविष्यात असे दु:साहस करण्याचा विचारही कोणी करणार नाही. कामगार-तंत्रज्ञ-कलाकारांच्या घामाचा आणि निर्मात्यांच्या कष्टाचा विचार करून, माजी अध्यक्ष आणि संबंधितांनी महामंडळाच्या पैशांची केलेली उधळपट्टी, सत्तेचा गैरवापर, मनमानी कारभार, हुकूमशाहीने घेतलेले निर्णय, अशा अनेक बाबी ध्यानात घेऊन सर्व संबंधित दोषींची प्रशासकामार्फत चौकशी करावी. हे घडणे आणि घडविणे महामंडळाच्या उज्ज्वल भविष्याकरिता आवश्यक आहे. गोचडीच्या रूपाने महामंडळाला चिकटलेला राजकीय स्पर्श सर्वशक्तीनिशी सर्वांनीच काढून फेकून देणे आणि संकटांच्या कडेलोटावर असलेली महामंडळ ही संस्था वाचविणे एवढीच महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी पूर्वसंध्येला सर्व सभासद-हितचिंतकाकडून रास्त अपेक्षा! गेल्या पाच वर्षांतील तिसऱ्या अध्यक्षांनी काय दिवे लावले, हे प्रशासकीय चौकशीशिवाय बाहेर पडणे अशक्य आहे. महामंडळाचे कोल्हापुरातील प्रमुख व्यवस्थापक आणि मुंबईतील शाखा व्यवस्थापक यांनी मात्र मिळेल तेवढा हात धुऊन घेतला. फेरलेखापरीक्षणात त्यांच्या पापकृत्याचा आलेख दिसून येतो. जे नजरेला आले, कळले, वाचले, त्याचा हा लेखाजोखा. मग पडद्यामागे काय काय घडले असेल ही कल्पनाही करवत नाही. गेल्या पाच वर्षांतील आर्थिक घोटाळ््यांची मालिका सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट व्हायची असेल तर होऊ घातलेल्या निवडणुकांऐवजी महामंडळाचे सर्वंकष शुद्धिकरण होण्यासाठी प्रशासकाची अत्यंत गरज आहे. तसे घडले तरच महामंडळाचे काळेकुट्ट ग्रहण सुटेल.समाप्त