शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

आप्पाचीवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प लालफितीत अडकला

By admin | Updated: May 9, 2017 00:25 IST

निधीअभावी प्रकल्प रखडणार ? : प्रकल्पाकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : भुदरगड तालुक्यातील आप्पाचीवाडी, मिणचे बुद्रुक, पंडिवरे, लोटेवाडी, म्हसवे येथील शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी न्यायालयात धाव घेतल्याने नऊ वर्षे रखडलेला भुदरगड तालुक्यातील आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प सुधारित निधीअभावी ठप्प होत चालल्याने या भागाचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शासनाने या प्रकल्पासाठी सुधारित निधी तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांतून होत आहेमिणचे खोरीतील लोटेवाडी, आप्पाचीवाडी, पंडिवरे, बसुदेव धनगरवाडा, मिणचे बुद्रुक, नवरसवाडी, मोरस्करवाडी, बोगार्डेवाडी या जिथे पाण्याचा कुठलाच स्रोत नाही अशा दुर्गम डोंगराळ भागातील गावांतील शेतकऱ्यांसाठी आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पास २००७ साली शासनाच्या जलसंधारण विभागाने मंजुरी दिली. २७.५७ मी. उंची, ३ मीटर रुंदी, २६५ मी. लांबी, साठवण क्षमता १३८९ घनमीटर, सांडवा ३५ मीटर व कालवा ४ कि.मी. व १५५ हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या प्रकल्पाचा ४ कोटी २० लाख रुपयांचा खर्च प्रारंभीस मंजूर केला होता. हा निधी जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केला होता. त्यानंतर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला व पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे सुटला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रियेमुळे गेली नऊ वर्षे या प्रकल्पाचे काम रखडले होते. पुनर्वसनाच्या प्रश्नावर तोडगा निघाल्यानंतर फेब्रुवारी २०१६ ला पुन्हा प्रकल्पाचे काम सुरू झाले, पण जेवढा निधी मिळाला, तेवढेचे काम झाल्याचे संबंधित खात्याचे म्हणणे आहे. उर्वरित कामासाठी सुधारित अंदाजपत्रक २० कोटी, ५४ लाख रुपये केले आहे. गेल्या नऊ वर्षांत ४ कोटींचा प्रकल्प २० कोटी ५४ लाखांवर गेला आहे. संबंधित खात्याने सुधारित निधीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठवला आहे. एवढा मोठा निधी उपलब्ध होईपर्यंत पुढील काम पूर्णत: थांबणार आहे. या प्रकल्पामुळे लोटेवाडी, बोगार्डेवाडी, आप्पाचीवाडी, मिणचे बुद्रुक, पंडिवरे, मोरस्करवाडी, नवरसवाडी या गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. माजी आमदार बजरंग देसाई यांनी लोंडवीर देवालय येथे पाणी परिषद घेऊन येथील शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांनीही या प्रकल्पाच्या कामाचा गांभीर्याने विचार केला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालातआप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प येथील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघून शेतीचे रूपांतर कोरडवाहूतून निघून हरितक्रांतीचे स्वप्न साकार होणार आहे. शासन दरबारी या प्रकल्पाला निधी मंजूर झाल्यास प्रकल्पाचे काम सुरू होईल. त्यासाठी योग्य अंमलबजावणीची नितांत गरज आहे.