शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे खटल्यात महाधिवक्ता मांडणार सरकार पक्षाची बाजू

By admin | Updated: January 15, 2016 00:53 IST

सरकारतर्फे नियुक्ती : सुनावणी लांबणीवर

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला कोल्हापूरबाहेर चालवावा, अशी मागणी संशयित आरोपी समीर गायकवाड याने केली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने आता महाधिवक्ता श्रीहरी अणे हे बाजू मांडणार आहेत. राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. न्यायाधीश श्रीमती साधना जाधव या रजेवर असल्याने या खटल्याची गुरुवारी सुनावणी झाली नाही. त्यामुळे हा खटला कोल्हापुरात चालणार की अन्यत्र याचा निर्णय प्रलंबित राहिला. सुनावणी असल्याने श्रीमती पानसरे व ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी न्यायालयात गेले होते; परंतु सकाळीच त्यांना ही सुनावणी होणार नसल्याचे समजले. या खटल्यात महाधिवक्ताची नियुक्ती करावी, अशी विनंती श्रीमती शैला दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांच्यावतीने त्यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. हा खटला निष्पक्षपातीपणे चालावा, यासाठी तो कोल्हापूरच्या बाहेर चालवावा, अशा मागणीची याचिका संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. दक्षिण शिवाजीनगर, मोती चौक, शनिमारुती मंदिराजवळ, सांगली, सध्या कळंबा कारागृह, कोल्हापूर) याने १२ डिसेंबरला वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांना सहभागी करून घ्यावे, असे प्रतिज्ञापत्र मेघा पानसरे यांनी बुधवारी (दि. १३) दाखल केले आहे. हा खटला कोल्हापूरबाहेर हलविण्यास पानसरे कुटुंबीयांचा विरोध आहे. खटला मुंबई किंवा अन्यत्र हलविण्यामुळे शोधयंत्रणा व अन्य साक्षीदारांवर त्याचा परिणाम होईल, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. गायकवाड याच्यावतीने मुंबईतील सनातन संस्थेचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी ही याचिका (क्रमांक ८४०/२०१५) दाखल केली आहे. त्यामध्ये राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. ही याचिका कोल्हापुरात का नको, याची चार कारणे त्यांनी या याचिकेत दिली आहेत. पानसरे यांच्यावर गतवर्षी दि. १६ फेब्रुवारीस ते सकाळी त्यांच्या सागरमाळ परिसरातील बंगल्यातून फिरायला गेल्यावर गोळ््या झाडण्यात आल्या. त्यांचा त्यामध्ये दि. २० फेब्रुवारीस मृत्यू झाला. याप्रकरणी सनातन संस्थेचा प्रमुख साधक असलेल्या समीर गायकवाड यास राजारामपुरी पोलिसांनी दि. १४ सप्टेंबर २०१५ ला अटक केली. त्याच्यावर या खूनप्रकरणी राज्य गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोषारोपपत्र दाखल केले. सध्या गायकवाड कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. कोल्हापूर पोलिसांचा विरोधहा खटला हलविण्यास विरोध करणारे प्रतिज्ञापत्र तपास अधिकारी व कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गुरुवारी न्यायालयात सादर केले. कोल्हापूर बार असोसिएशनने गायकवाड यास वकील मिळू नये, असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही बार असोसिएशनचे पत्र त्यांनी न्यायालयात सादर केले.महाधिवक्ता का...एखादा खटला जेव्हा महत्त्वाचा असतो, त्यामध्ये घटनात्मक वैधतेविषयी काही मुद्दे उपस्थित होतात तेव्हा राज्य शासन सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी महाधिवक्ताची नियुक्ती करते. हे घटनात्मक पद आहे. या खटल्यात त्यांची नियुक्ती झाल्यामुळे पानसरे कुटुंबीयांची बाजू बळकट झाल्याचे मानण्यात येते.