शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

पानसरे खटल्यात महाधिवक्ता मांडणार सरकार पक्षाची बाजू

By admin | Updated: January 15, 2016 00:53 IST

सरकारतर्फे नियुक्ती : सुनावणी लांबणीवर

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला कोल्हापूरबाहेर चालवावा, अशी मागणी संशयित आरोपी समीर गायकवाड याने केली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने आता महाधिवक्ता श्रीहरी अणे हे बाजू मांडणार आहेत. राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. न्यायाधीश श्रीमती साधना जाधव या रजेवर असल्याने या खटल्याची गुरुवारी सुनावणी झाली नाही. त्यामुळे हा खटला कोल्हापुरात चालणार की अन्यत्र याचा निर्णय प्रलंबित राहिला. सुनावणी असल्याने श्रीमती पानसरे व ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी न्यायालयात गेले होते; परंतु सकाळीच त्यांना ही सुनावणी होणार नसल्याचे समजले. या खटल्यात महाधिवक्ताची नियुक्ती करावी, अशी विनंती श्रीमती शैला दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांच्यावतीने त्यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. हा खटला निष्पक्षपातीपणे चालावा, यासाठी तो कोल्हापूरच्या बाहेर चालवावा, अशा मागणीची याचिका संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. दक्षिण शिवाजीनगर, मोती चौक, शनिमारुती मंदिराजवळ, सांगली, सध्या कळंबा कारागृह, कोल्हापूर) याने १२ डिसेंबरला वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांना सहभागी करून घ्यावे, असे प्रतिज्ञापत्र मेघा पानसरे यांनी बुधवारी (दि. १३) दाखल केले आहे. हा खटला कोल्हापूरबाहेर हलविण्यास पानसरे कुटुंबीयांचा विरोध आहे. खटला मुंबई किंवा अन्यत्र हलविण्यामुळे शोधयंत्रणा व अन्य साक्षीदारांवर त्याचा परिणाम होईल, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. गायकवाड याच्यावतीने मुंबईतील सनातन संस्थेचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी ही याचिका (क्रमांक ८४०/२०१५) दाखल केली आहे. त्यामध्ये राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. ही याचिका कोल्हापुरात का नको, याची चार कारणे त्यांनी या याचिकेत दिली आहेत. पानसरे यांच्यावर गतवर्षी दि. १६ फेब्रुवारीस ते सकाळी त्यांच्या सागरमाळ परिसरातील बंगल्यातून फिरायला गेल्यावर गोळ््या झाडण्यात आल्या. त्यांचा त्यामध्ये दि. २० फेब्रुवारीस मृत्यू झाला. याप्रकरणी सनातन संस्थेचा प्रमुख साधक असलेल्या समीर गायकवाड यास राजारामपुरी पोलिसांनी दि. १४ सप्टेंबर २०१५ ला अटक केली. त्याच्यावर या खूनप्रकरणी राज्य गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोषारोपपत्र दाखल केले. सध्या गायकवाड कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. कोल्हापूर पोलिसांचा विरोधहा खटला हलविण्यास विरोध करणारे प्रतिज्ञापत्र तपास अधिकारी व कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गुरुवारी न्यायालयात सादर केले. कोल्हापूर बार असोसिएशनने गायकवाड यास वकील मिळू नये, असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही बार असोसिएशनचे पत्र त्यांनी न्यायालयात सादर केले.महाधिवक्ता का...एखादा खटला जेव्हा महत्त्वाचा असतो, त्यामध्ये घटनात्मक वैधतेविषयी काही मुद्दे उपस्थित होतात तेव्हा राज्य शासन सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी महाधिवक्ताची नियुक्ती करते. हे घटनात्मक पद आहे. या खटल्यात त्यांची नियुक्ती झाल्यामुळे पानसरे कुटुंबीयांची बाजू बळकट झाल्याचे मानण्यात येते.