शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

जलपर्णी हटविण्यात प्रशासन नापास

By admin | Updated: June 24, 2015 00:56 IST

समस्या बिकट : नदीला पूर आल्यानंतरच जलपर्णी वाहून जाणार

कुरुंदवाड : पंचगंगा नदीत पाणी प्रदूषणाबरोबरच जलपर्णीचीही समस्या गंभीर आहे. जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फारसे प्रयत्नही केले जात नाहीत. त्यामुळे ही समस्या बिकट होत असून, पुराच्या काळात जलपर्णी वाहून गेल्यावरच नदीला मुक्ती मिळते. त्यामुळे जलपर्णी वाहून जाण्यासाठी पंचगंगा नदीकाठावरील नागरिक पुराच्या प्रतीक्षेत आहेत.पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला सोसावा लागत आहे. मात्र, या नदी प्रदूषणाबरोबर जलपर्णीची समस्याही तितकीच गंभीर आहे. पंचगंगा नदीवर तेरवाड व शिरोळ हे शेवटचे बंधारे आहेत. जलपर्णी या बंधाऱ्याला तटल्याने संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने व्यापते. ऐन उन्हाळ्यातच ही समस्या निर्माण होते. जलपर्णीची समस्या गंभीर बनल्यानंतरच जिल्हा प्रशासन ते हटविण्यासंदर्भात नियोजन करते. मात्र, चार ते पाच फूट उंचीचा थर निर्माण होत असल्याने जलपर्णी पूर्ण हटविणे जिकिरीचे बनते. अखेर महापुरातूनच जलपर्णी वाहून जाते. निसर्गाने निर्माण केलेले संकट निसर्गच मुक्त करतो. त्यामुळे जलपर्णी वाहून जाण्यासाठी पंचगंगा नदीकाठचे नागरिक व शेतकरी पुराच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे पंचगंगा तुडुंब भरून वाहत आहे. नदीवरील पूल, बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्यानंतरच जलपर्णी वाहून जाते. पाण्यामुळे जलपर्णी पात्रातून वर येत असून, लवकरच पंचगंगा नदी जलपर्णीमुक्तहोण्याची शक्यता आहे. जलपर्णीमुळे आॅक्सिजनचे प्रमाण घटतेहवेतील आॅक्सिजन पाण्यात विरघळल्यावरच जलचरांना श्वास घेणे शक्य आहे. मात्र, नदीपात्र जलपर्णीने व्यापल्याने, तसेच प्रदषणामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासे मृत पावण्याच्या घटना घडत असतात.