शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जलपर्णी हटविण्यात प्रशासन नापास

By admin | Updated: June 24, 2015 00:56 IST

समस्या बिकट : नदीला पूर आल्यानंतरच जलपर्णी वाहून जाणार

कुरुंदवाड : पंचगंगा नदीत पाणी प्रदूषणाबरोबरच जलपर्णीचीही समस्या गंभीर आहे. जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फारसे प्रयत्नही केले जात नाहीत. त्यामुळे ही समस्या बिकट होत असून, पुराच्या काळात जलपर्णी वाहून गेल्यावरच नदीला मुक्ती मिळते. त्यामुळे जलपर्णी वाहून जाण्यासाठी पंचगंगा नदीकाठावरील नागरिक पुराच्या प्रतीक्षेत आहेत.पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला सोसावा लागत आहे. मात्र, या नदी प्रदूषणाबरोबर जलपर्णीची समस्याही तितकीच गंभीर आहे. पंचगंगा नदीवर तेरवाड व शिरोळ हे शेवटचे बंधारे आहेत. जलपर्णी या बंधाऱ्याला तटल्याने संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने व्यापते. ऐन उन्हाळ्यातच ही समस्या निर्माण होते. जलपर्णीची समस्या गंभीर बनल्यानंतरच जिल्हा प्रशासन ते हटविण्यासंदर्भात नियोजन करते. मात्र, चार ते पाच फूट उंचीचा थर निर्माण होत असल्याने जलपर्णी पूर्ण हटविणे जिकिरीचे बनते. अखेर महापुरातूनच जलपर्णी वाहून जाते. निसर्गाने निर्माण केलेले संकट निसर्गच मुक्त करतो. त्यामुळे जलपर्णी वाहून जाण्यासाठी पंचगंगा नदीकाठचे नागरिक व शेतकरी पुराच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे पंचगंगा तुडुंब भरून वाहत आहे. नदीवरील पूल, बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्यानंतरच जलपर्णी वाहून जाते. पाण्यामुळे जलपर्णी पात्रातून वर येत असून, लवकरच पंचगंगा नदी जलपर्णीमुक्तहोण्याची शक्यता आहे. जलपर्णीमुळे आॅक्सिजनचे प्रमाण घटतेहवेतील आॅक्सिजन पाण्यात विरघळल्यावरच जलचरांना श्वास घेणे शक्य आहे. मात्र, नदीपात्र जलपर्णीने व्यापल्याने, तसेच प्रदषणामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासे मृत पावण्याच्या घटना घडत असतात.