शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

सीपीआरला मिळणार जूनअखेर जादा सुरक्षारक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 00:52 IST

डॉक्टरांवरील हल्ले : राज्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालयांचा पहिल्या टप्प्यात समावेश

गणेश शिंदे ल्ल कोल्हापूरराज्यात झालेल्या निवासी, आंतरवासीयता वैद्यकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून महानगर असलेल्या शहरांना एप्रिलअखेर पहिल्या टप्प्यात जादा बंदूकधारी सुरक्षा रक्षक देण्यात आले आहेत. त्यात राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, धुळे या जिल्ह्णांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला (सीपीआर)एप्रिलअखेर जादा सुरक्षा रक्षक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. राज्य शासनाने सीपीआरला जूनअखेर ५८ जादा बंदूकधारी सुरक्षा रक्षक देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आणखीन दोन महिने सीपीआर प्रशासनाला सुरक्षा रक्षकांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.गेल्या महिन्यात राज्यातील मुंबई (सायन), धुळे या ठिकाणी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी व आंतरवासीयता वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाणीचे प्रकार घडले होते. याविरोधात त्यांची शिखरसंस्था असलेल्या ‘मेडिकल असोसिएशन आॅफ रेसिडेन्स डॉक्टर ’अर्थात ‘मार्ड’ने आवाज उठवून राज्य शासनाला जाग आणली. त्याची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०१७ अखेर राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुरक्षा रक्षक पुरविण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते; पण,आता महिना संपायला अवघे तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुरक्षा रक्षक पुरविणे अशक्य आहे. सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असल्याचे कारण सांगून पहिल्यांदा महानगरांमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुरक्षा रक्षक पुरवू,असे राज्य शासनाने सांगितले आहे. दरम्यान, कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात सध्या १९ ‘मेस्को’चे विनाबंदूकधारी सुरक्षा रक्षक आहेत. त्यापैकी तीन महिला सुरक्षा रक्षक आहेत. प्रवीण दीक्षित यांची ‘विशेष नियुक्ती’गेल्या महिन्यात झालेल्या निवासी व आंतरवासीयता वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतर राज्य शासनाने राज्याचे सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची विशेष नियुक्ती केली आहे. दीक्षित यांनी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षेचा आढावा घेऊन याचा अहवाल राज्य शासनाला त्यांना सादर करावयाचा आहे.सध्या राज्य शासनाकडे सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एप्रिलअखेर वैद्यकीय महाविद्यालयाला जादा सुरक्षा रक्षक मिळणार नाहीत. राज्य शासनाने जूनअखेर सुरक्षा रक्षक देऊ, असे सांगितले आहे.- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.