शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी थांबली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात यंदाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 12:41 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : ऑक्टोबरपर्यंत राहिलेला परतीचा पाऊस , महापुरानंतर खंडित वीज पुरवठ्यामुळे बंद असलेला उपसा आणि आता गेले ...

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ऑक्टोबरपर्यंत राहिलेला परतीचा पाऊस, महापुरानंतर खंडित वीज पुरवठ्यामुळे बंद असलेला उपसा आणि आता गेले दहा दिवस जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी पूर्णपणे थांबली आहे. नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील प्रमुख धरणात तब्बल ९५.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा थोडा अधिक आहे. त्यामुळे यंदाही धरणात पाण्याचा अतिरिक्त साठा राहणार असून, पावसाळ्यापूर्वी त्याचे नियोजन करावे लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून मान्सूनने आपला वेग वाढवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत काही महिन्यांत कमी-अधिक प्रमाणात कोसळत राहिला. यंदा तर जुलै महिन्यात आठ दिवसातच आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. अवघ्या चार-पाच दिवसातच महापूर आणला. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच बहुतांशी धरणे पूर्ण क्षमतेने भरली. २०१९च्या महापुराचा विळखा लक्षात घेऊन पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाने एप्रिलपासूनच धरणातील पाण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे महापुराची अधिक झळ बसली नाही.

जिल्ह्यात १४ लहान-मोठी धरणे असून, धरणक्षेत्रात सरासरी ४,०१९ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा सरापरीपेक्षा अधिक पाऊस झाला. साधारणत: ऑक्टोबरपासून रब्बीचा हंगाम सुरु होतो, त्यातच ऑक्टोबरपासून ऊसासह इतर पिकांना पाणी द्यावे लागत असल्याने नदीतील पाण्याचा उपसा वाढतो. यंदा मात्र निम्मा ऑक्टोबर महिना परतीच्या पावसात वाहून गेला. परतीचा पाऊस थांबल्यानंतर नदीवरील विद्युत पंप बसले खरे मात्र महापुरामुळे विद्युत खांब पडल्याने विजेअभावी उपसा होऊ शकला नाही. शेतकऱ्यांनी महावितरणकडे पाठपुरावा करुन वीज सुरु केली, तोपर्यंत अवकाळी पाऊस सुरु झाला. गेले आठ-दहा दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने ठिय्या मारल्याने शेतकऱ्यांची पाण्याची मागणी शून्य टक्क्यावर आली आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा व आगामी सात महिन्यांत लागणारे पाणी याचा ताळेबंद पाहिला तर किमान २५ टक्के पाणीसाठा अतिरिक्त होऊ शकतो. या साठ्याचे नियोजन पावसाळ्यापूर्वीच करावे लागणार आहे.

पंधरा दिवसांनी पाण्याची मागणी होणार

जिल्ह्यात अजून पाऊस सुरु आहे. आगामी चार-पाच दिवस पावसाची शक्यता कमी असली, तरी जमिनीला वापसा येणार नाही. त्याचबरोबर ३० नाेव्हेंबर ते २ डिसेंबर या तीन दिवसात जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पिकांसाठी पाण्याची गरज डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून लागेल.

राधानगरी’, ‘कासारी’त साठा अधिक

गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा पाहिला तर राधानगरी, कुंभी व कासारी धरणांत तुलनेत अधिक साठा आहे. पाटगाव, कुंभी, कडवीमध्ये गेल्यावर्षी एवढाच आहे.

धरणातील पाणीसाठा ‘टीएमसी’मध्ये असा, कंसात टक्केवारी -

राधानगरी - ७.१७ (९२)

तुळशी - ३.०९ (९५)

वारणा - ३१.३० (९१)

दूधगंगा - २१.५५ (९०)

कासारी - २.७२ (९९)

कडवी - २.४४ (९८)

कुंभी - २.६५ (९८)

पाटगाव - ३.६४ (९९)

वारणा - २४.९१ (९१)

दूधगंगा - २१.५५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरण