शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी थांबली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात यंदाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 12:41 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : ऑक्टोबरपर्यंत राहिलेला परतीचा पाऊस , महापुरानंतर खंडित वीज पुरवठ्यामुळे बंद असलेला उपसा आणि आता गेले ...

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ऑक्टोबरपर्यंत राहिलेला परतीचा पाऊस, महापुरानंतर खंडित वीज पुरवठ्यामुळे बंद असलेला उपसा आणि आता गेले दहा दिवस जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी पूर्णपणे थांबली आहे. नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील प्रमुख धरणात तब्बल ९५.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा थोडा अधिक आहे. त्यामुळे यंदाही धरणात पाण्याचा अतिरिक्त साठा राहणार असून, पावसाळ्यापूर्वी त्याचे नियोजन करावे लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून मान्सूनने आपला वेग वाढवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत काही महिन्यांत कमी-अधिक प्रमाणात कोसळत राहिला. यंदा तर जुलै महिन्यात आठ दिवसातच आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. अवघ्या चार-पाच दिवसातच महापूर आणला. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच बहुतांशी धरणे पूर्ण क्षमतेने भरली. २०१९च्या महापुराचा विळखा लक्षात घेऊन पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाने एप्रिलपासूनच धरणातील पाण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे महापुराची अधिक झळ बसली नाही.

जिल्ह्यात १४ लहान-मोठी धरणे असून, धरणक्षेत्रात सरासरी ४,०१९ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा सरापरीपेक्षा अधिक पाऊस झाला. साधारणत: ऑक्टोबरपासून रब्बीचा हंगाम सुरु होतो, त्यातच ऑक्टोबरपासून ऊसासह इतर पिकांना पाणी द्यावे लागत असल्याने नदीतील पाण्याचा उपसा वाढतो. यंदा मात्र निम्मा ऑक्टोबर महिना परतीच्या पावसात वाहून गेला. परतीचा पाऊस थांबल्यानंतर नदीवरील विद्युत पंप बसले खरे मात्र महापुरामुळे विद्युत खांब पडल्याने विजेअभावी उपसा होऊ शकला नाही. शेतकऱ्यांनी महावितरणकडे पाठपुरावा करुन वीज सुरु केली, तोपर्यंत अवकाळी पाऊस सुरु झाला. गेले आठ-दहा दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने ठिय्या मारल्याने शेतकऱ्यांची पाण्याची मागणी शून्य टक्क्यावर आली आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा व आगामी सात महिन्यांत लागणारे पाणी याचा ताळेबंद पाहिला तर किमान २५ टक्के पाणीसाठा अतिरिक्त होऊ शकतो. या साठ्याचे नियोजन पावसाळ्यापूर्वीच करावे लागणार आहे.

पंधरा दिवसांनी पाण्याची मागणी होणार

जिल्ह्यात अजून पाऊस सुरु आहे. आगामी चार-पाच दिवस पावसाची शक्यता कमी असली, तरी जमिनीला वापसा येणार नाही. त्याचबरोबर ३० नाेव्हेंबर ते २ डिसेंबर या तीन दिवसात जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पिकांसाठी पाण्याची गरज डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून लागेल.

राधानगरी’, ‘कासारी’त साठा अधिक

गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा पाहिला तर राधानगरी, कुंभी व कासारी धरणांत तुलनेत अधिक साठा आहे. पाटगाव, कुंभी, कडवीमध्ये गेल्यावर्षी एवढाच आहे.

धरणातील पाणीसाठा ‘टीएमसी’मध्ये असा, कंसात टक्केवारी -

राधानगरी - ७.१७ (९२)

तुळशी - ३.०९ (९५)

वारणा - ३१.३० (९१)

दूधगंगा - २१.५५ (९०)

कासारी - २.७२ (९९)

कडवी - २.४४ (९८)

कुंभी - २.६५ (९८)

पाटगाव - ३.६४ (९९)

वारणा - २४.९१ (९१)

दूधगंगा - २१.५५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरण