शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी थांबली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात यंदाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 12:41 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : ऑक्टोबरपर्यंत राहिलेला परतीचा पाऊस , महापुरानंतर खंडित वीज पुरवठ्यामुळे बंद असलेला उपसा आणि आता गेले ...

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ऑक्टोबरपर्यंत राहिलेला परतीचा पाऊस, महापुरानंतर खंडित वीज पुरवठ्यामुळे बंद असलेला उपसा आणि आता गेले दहा दिवस जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी पूर्णपणे थांबली आहे. नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील प्रमुख धरणात तब्बल ९५.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा थोडा अधिक आहे. त्यामुळे यंदाही धरणात पाण्याचा अतिरिक्त साठा राहणार असून, पावसाळ्यापूर्वी त्याचे नियोजन करावे लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून मान्सूनने आपला वेग वाढवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत काही महिन्यांत कमी-अधिक प्रमाणात कोसळत राहिला. यंदा तर जुलै महिन्यात आठ दिवसातच आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. अवघ्या चार-पाच दिवसातच महापूर आणला. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच बहुतांशी धरणे पूर्ण क्षमतेने भरली. २०१९च्या महापुराचा विळखा लक्षात घेऊन पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाने एप्रिलपासूनच धरणातील पाण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे महापुराची अधिक झळ बसली नाही.

जिल्ह्यात १४ लहान-मोठी धरणे असून, धरणक्षेत्रात सरासरी ४,०१९ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा सरापरीपेक्षा अधिक पाऊस झाला. साधारणत: ऑक्टोबरपासून रब्बीचा हंगाम सुरु होतो, त्यातच ऑक्टोबरपासून ऊसासह इतर पिकांना पाणी द्यावे लागत असल्याने नदीतील पाण्याचा उपसा वाढतो. यंदा मात्र निम्मा ऑक्टोबर महिना परतीच्या पावसात वाहून गेला. परतीचा पाऊस थांबल्यानंतर नदीवरील विद्युत पंप बसले खरे मात्र महापुरामुळे विद्युत खांब पडल्याने विजेअभावी उपसा होऊ शकला नाही. शेतकऱ्यांनी महावितरणकडे पाठपुरावा करुन वीज सुरु केली, तोपर्यंत अवकाळी पाऊस सुरु झाला. गेले आठ-दहा दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने ठिय्या मारल्याने शेतकऱ्यांची पाण्याची मागणी शून्य टक्क्यावर आली आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा व आगामी सात महिन्यांत लागणारे पाणी याचा ताळेबंद पाहिला तर किमान २५ टक्के पाणीसाठा अतिरिक्त होऊ शकतो. या साठ्याचे नियोजन पावसाळ्यापूर्वीच करावे लागणार आहे.

पंधरा दिवसांनी पाण्याची मागणी होणार

जिल्ह्यात अजून पाऊस सुरु आहे. आगामी चार-पाच दिवस पावसाची शक्यता कमी असली, तरी जमिनीला वापसा येणार नाही. त्याचबरोबर ३० नाेव्हेंबर ते २ डिसेंबर या तीन दिवसात जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पिकांसाठी पाण्याची गरज डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून लागेल.

राधानगरी’, ‘कासारी’त साठा अधिक

गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा पाहिला तर राधानगरी, कुंभी व कासारी धरणांत तुलनेत अधिक साठा आहे. पाटगाव, कुंभी, कडवीमध्ये गेल्यावर्षी एवढाच आहे.

धरणातील पाणीसाठा ‘टीएमसी’मध्ये असा, कंसात टक्केवारी -

राधानगरी - ७.१७ (९२)

तुळशी - ३.०९ (९५)

वारणा - ३१.३० (९१)

दूधगंगा - २१.५५ (९०)

कासारी - २.७२ (९९)

कडवी - २.४४ (९८)

कुंभी - २.६५ (९८)

पाटगाव - ३.६४ (९९)

वारणा - २४.९१ (९१)

दूधगंगा - २१.५५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरण