शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून विद्यापीठ साकारणार ‘आदर्श दत्तक ग्राम’

By admin | Updated: July 30, 2015 00:46 IST

आराखड्याचे काम सुरू :कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील सहा गावे

संतोष मिठारी - कोल्हापूर -लोकसहभाग आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ आपल्या कार्यक्षेत्रातील सहा गावे ‘आदर्श दत्तक ग्राम’ म्हणून विकसित करणार आहे. याबाबतचा प्रस्तावित नियोजन आराखडा बनविण्याचे काम विद्यापीठाकडून सुरू आहे.नवी दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार ‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. शिवाय यासाठी स्वच्छ भारत- स्वस्थ भारत अभियान समिती नियुक्त केली आहे. समितीने आदर्श दत्तक ग्रामसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे सांगाव (ता. कागल), कडगाव (ता. गडहिंग्लज), सांगलीतील वाडीभागाई (ता. शिराळा), तडवळे (ता. आटपाडी) आणि साताऱ्यातील माहुली (ता. सातारा), शिरढोण (ता. कोरेगाव) यांची निवड केली. या गावांच्या मूलभूत गरजा विचारात घेऊन लोकसहभागातून ग्रामसूक्ष्म नियोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाने मुख्य समन्वयक, जिल्हानिहाय समन्वयक व उपसमिती कार्यान्वित केल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून या गावांचे प्रस्तावित नियोजनाचे काम सुरू आहे. या उपक्रमाबाबत विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड म्हणाले, जिल्हा समन्वयकांची कार्यवाही सुरू झाली आहे. संबंधित गावांमध्ये २० आॅगस्टपर्यंत भेटी देऊन तेथील सरपंच व अन्य पदाधिकारी, ग्रामस्थांशी चर्चा करून गावांच्या प्राथमिक गरजांची माहिती घेतली जाईल. आॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान या गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.या मुद्यांवर असेल भर...शौचालयांची उभारणी वृक्षारोपण आणि जुन्या वृक्षांचे संवर्धन प्लास्टिकमुक्त पर्यावरण रेन वॉटर हार्वेस्टिंगग्रीन बिल्डिंग संकल्पनेचा विकास पर्यावरणपूरक कचरा निर्मूलनसौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांच्या वापरावर भर असा साधणार गावचा विकास...विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ आणि यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रूरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ‘आदर्श दत्तक ग्राम’ उपक्रम राबविण्यात येईल. निवडलेल्या सहा गावांच्या विकासासाठी पाच वर्षांची मुदत राहणार आहे. जिल्हा उपसमित्या संबंधित गावांचा अभ्यास करून ग्रामविकास आराखडा तयार करतील. शिवाय लोकसहभागाचे मूल्यांकन करतील. ग्रामविकासाच्या उपयुक्त आणि आवश्यक असणाऱ्याच योजना राबविण्यात येतील. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी मिळविला जाईल. ‘आदर्श दत्तक ग्राम’ उपक्रमात विद्यापीठातील विविध विभागांचे सहकार्य घेतले जाणार आहे.