शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम: पैसेवाल्यांना पायघड्या; कार्यकर्त्यांच्या दांड्या

By भारत चव्हाण | Updated: June 13, 2025 12:08 IST

चार सदस्य प्रभाग रचनेमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांत नाराजी

भारत चव्हाण कोल्हापूर : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने घेतलेला चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय पक्षीय पातळीवर सोयीचा असला, तरी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या दृष्टीने मात्र तो तोंडाला फेस आणणारा तसेच सर्वसामान्य उमेदवारांची निवडणुकीपूर्वीच दांडी उडवणारा असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ज्यांचे शहरात काम आहे, ज्यांचे नाव आहे आणि ज्यांच्याकडे पैसा आहे असेच सशक्त उमेदवार निवडून येणार आहेत.कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ‘एक प्रभाग चार सदस्य’ अशा प्रभाग रचनेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे अगोदरच साडेचार वर्षे निवडणुकीची प्रतीक्षा करून निराश झालेल्या शेकडो इच्छुक उमेदवारांचे चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे धाबे दणाणले आहेत. ‘एक प्रभाग एक सदस्य’ अशा निवडणूक पद्धतीमुळे सर्वपक्षीय उमेदवारांसह सर्वसामान्य उमेदवारांना देखील निवडणूक लढवणे सर्वार्थाने सोयीचे होते. उमेदवारांना साडेपाच ते साडेसहा हजार मतदारांसमोर निवडणूक काळात पोहोचणे सहज शक्य होते, आर्थिकदृष्ट्याही परवडणारे होते. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांचा मतदारांशी संपर्क असायचा. आता चार सदस्यीय प्रभागामुळे हे सर्व अशक्य होणार आहे.नवीन प्रभाग रचना जाहीर व्हायला किमान महिना, दीड महिना लागणार आहे. प्रभाग निश्चित झाल्यानंतरच उमेदवारांना मतदारांसमोर जावे लागणार आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे सर्वच उमेदवारांसमोर मोठे आव्हान असेल. विशेष म्हणजे काही ठराविक जण सोडले तर बहुसंख्य इच्छुक उमेदवार पलिकडील प्रभागात पोहोचलेले नाहीत. चार प्रभागांत पोहोचणे तर दूरच आहे. त्यामुळे चार सदस्यांच्या एक प्रभागात साधारणपणे २५ ते ३० हजार मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांच्या खिशाला तर कात्री लागणारच आहे, शिवाय तोंडालाही फेस येणार आहे.निवडणूक कोणालाच सोपी नाहीराजकीय पक्षांच्या दृष्टीने हा निर्णय चांगलाच आहे. त्यांना युती, आघाडी करून उमेदवारांचे पॅनल करावे लागणार आहे. ज्या राजकीय पक्षांकडे एखाद्या प्रभागात दोन किंवा तीन उमेदवार चांगल्या ताकदीचे असतील तर चौथ्या उमेदवाराला ते निवडून आणू शकतात. पण एकच उमेदवार ताकदीचा आहे आणि बाकीचे तीन कमकुवत असतील तर ताकदवान उमेदवाराचा देखील पराभव होणार आहे. त्यामुळे निवडणूक कोणालाच सोपी राहिलेली नाही.

चार सदस्य प्रभागामुळे ही निवडणूक पैसेवाल्यांची झाली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणे अशक्य आहे. कारण त्यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. निवडणुकीनंतर एकाच प्रभागात चार नगरसेवकांनी कामे कशी करायची, हाही प्रश्न निर्माण होणार आहे. - सुभाष बुचडे, माजी नगरसेवक 

ज्या उमेदवारचे काम आहे, नाव आहे आणि ज्याच्याकडे पैसा आहे, तोच उमेदवार राजकीय पक्षांच्या यादीत असेल. पक्षीय तसेच नागरिकांच्या सेवेत कायम असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कमी संधी मिळणार आहे. - संजय मोहिते, माजी उपमहापौर