शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

दूध आंदोलनामुळे कार्यकर्ते रिचार्ज : आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:26 PM

संतोष बामणे।उदगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या वर्षात ऊस दरानंतर सोमवार (दि. ९) पासून गायीच्या दुधाला दर मिळण्यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. याला प्रतिसाद देत राज्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. तसेच मुंबई येथील दूध रोखल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात चक्काजाम करून आंदोलन केले. अखेर सरकारने गुरुवारी दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर जाहीर केल्यानंतर ...

ठळक मुद्देआंदोलन यशस्वी झाल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

संतोष बामणे।उदगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या वर्षात ऊस दरानंतर सोमवार (दि. ९) पासून गायीच्या दुधाला दर मिळण्यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. याला प्रतिसाद देत राज्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. तसेच मुंबई येथील दूध रोखल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात चक्काजाम करून आंदोलन केले. अखेर सरकारने गुरुवारी दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर जाहीर केल्यानंतर हे आंदोलन यशस्वी झाल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. त्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे चित्र आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या सोळा वर्षांपासून औद्योगिक वसाहत, ऊस दर व दूध दरासाठी पुढाकार घेऊन राज्यातील शेतकºयांना न्याय देण्याचे काम खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून झाले आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये खासदार शेट्टी यांनी देशातील १८२ शेतकरी संघटना एकत्रित करून लोकसभेत शेतीमालाला हमीभावासह तीसहून अधिक मागण्यांचे विधेयक मांडण्यात आले आहे. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाबरोबरच देशाचे नेतृत्व करताना खासदार शेट्टी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्यात कोल्हापूर वगळता अन्य जिल्ह्यात १३ ते १८ रुपयेपर्यंत गायीच्या दुधाला भाव मिळत होता. फक्त कोल्हापूर जिल्ह्यात २३ रुपयेप्रमाणे दर दिला जात होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात गायीच्या दुधासाठी आंदोलन सुरू होते. मात्र, गायीच्या दूधप्रश्नी शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सर्वत्र अतिरिक्त दुधाचा प्रश्न व पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी दराने प्रतिलिटर दुधाची किंमत पाहता शेतकºयांच्या हातात काहीच राहात नव्हते. या अनुषंगाने जून महिन्यात पुणे दूध आयुक्तालयावर मोर्चा काढून स्वाभिमानीने निवेदन दिले होते.

या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. ९) पासून पुकारलेल्या राज्यव्यापी ‘दूध बंद’ला राज्यातील शेतकºयांनी पाठिंबा दिल्यामुळे स्वाभिमानीच्या माध्यमातून अखेर दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्र जल्लोषी वातावरण असले तरी शिरोळ तालुक्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज मिळाला आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीमच असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर खासदार शेट्टी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात आपला वरचष्मा कायम राखला आहे.हातकणंगले, बुलढाणा केंद्रस्थानीखासदार शेट्टी दहा वर्षे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगलेतून शेट्टी यांच्याविरोधात सर्व पक्षांकडून उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे.तर स्वाभिमानीचे रविकांत तूपकर यांनी बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे दूध आंदोलनाच्या माध्यमातून हातकणंगले व बुलढाणा मतदार संघ केंद्रस्थानी राहणार असून, यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. 

आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी जितके करता येईल, तितके मी देण्याचा प्रयत्न केला आहे.. सध्याचे सरकार हे शेतकºयांसाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही. त्यासाठी आंदोलनाचे हत्यार हाती घ्यावे लागत आहे. सध्याची दूध दरवाढ सरकारने केली. त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्यास सप्टेंबरमध्ये आंदोलनाच्या लढ्यासाठी सज्ज राहणार आहे.- खासदार राजू शेट्टी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूधStrikeसंप