शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली; अधिकाऱ्यांवर कधी ?

By admin | Updated: April 13, 2017 00:26 IST

मुळाशी जाण्याची गरज : अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने कर्मचारी सुसाट; अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे प्रकरण

इचलकरंजी : अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे व नागरिकांशी उद्धट वर्तन असा ठपका ठेवून शहापूर पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. या कारवाईचे शहरवासीयांतून स्वागत होत असतानाच शहरातील काही अधिकारीही याला जबाबदार असल्याने त्यांची बदली कधी ? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिस अधीक्षक महादेव तांबडे अशा प्रकरणाच्या मुळाशी जाणार का ? तसेच इचलकरंजी पोलिस दलाची दिवसेंदिवस मलिन होत चाललेली प्रतिमा सुधारणार काय? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.शहरातील वाढती गुन्हेगारी, दिवसाढवळ्या घडणारे थरारक प्रकार, अवैध व्यावसायिकांचे पसरलेले जाळे, आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला मटका, त्यामध्ये दिवसभर गुरफटून पडणारी तरुण पिढी, चोऱ्यांचे वाढलेले प्रमाण, बसस्थानक, आठवडी बाजार याठिकाणी होणाऱ्या चोऱ्या असे गुन्हेगारी क्षेत्रातील दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रमाण यामुळे शहरातील पोलिस दल नेहमी चर्चेत असते. त्यातच अनेक पोलिस गुन्हेगार व अवैध व्यावसायिक यांच्याशी संबंध ठेवून माया गोळा करताना दिसतात. त्यांच्यावर पडद्यामागून एखाद्या अधिकाऱ्याचा हात असतो, हे जगजाहीर आहे.अधिकाऱ्याचा खास असल्याने दररोजच्या ड्युटी रजिस्टरमध्ये अशा माया गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूकही खास असते. त्यामुळे त्यांना इतर कामे करावी लागत नाहीत. शहापूर पोलिस ठाण्यातील गजानन सिद, एस. डी. गिरी, महादेव बिरंजे व अभिजित भातमारे या चौघांची तडकाफडकी बदली करण्यात आली; पण अन्य पोलिस ठाण्यांमध्येही असे ‘खास’ पोलिस कामगिरी बजावत आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार नाही, म्हणजे ते नामानिराळेच का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांचाही अशा प्रकारांमध्ये सहभाग असतो, हे सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. पोलिस अधीक्षक तांबडे यांनी शहर पोलिस दलातील अशा घडामोडींच्या मुळाशी जाऊन तशा अधिकाऱ्यांना वेळीच वेसन घालावे. तसेच पोलिस दलाची मलिन होत चाललेली प्रतिमा सुधारण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावीपूर्वीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीतून मोडीत काढलेली गुन्हेगारी व उद्ध्वस्त केलेले अवैध व्यावसायिकांचे जाळे आपल्या विशेष प्रयत्नातून पुन्हा जोमाने कार्यान्वित करणाऱ्या शहरातील एका प्रमुख अधिकाऱ्याची बदली होणार असल्याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस वर्तुळासह शहरवासीयांत सुरू आहे. यालाही मूर्त स्वरूप देत त्याठिकाणी पोलिस अधीक्षक तांबडे यांनी एका सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशीही मागणी होत आहे.