शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

...तर बियाणे कंपन्यांवर कारवाई

By admin | Updated: June 14, 2016 00:46 IST

कृषी अधिकाऱ्यांचा इशारा : बियाणे विक्रीचा आढावा; विक्रेत्यांना वेठीस धरणाऱ्यांचे धाबे दणाणले

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --बियाणे पुरवठा करताना विक्रेत्यांना वेठीस धरणाऱ्या कंपन्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. येत्या दोन दिवसांत बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची बैठक घेऊन विक्रीचा आढावा घेतला जाणार असून त्यामध्ये दोषी आढळलेल्या कंपन्यांचा ‘परवाना रद्द’च्या कारवाईचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांकडून आगाऊ पैसे घेऊन बियाण्यांचा पुरवठा न करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. यंदा खरिपाचे क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांची बियाण्यांची गरज वाढणार असल्याने बियाणे व खते विक्रेत्यांनी जानेवारीपासूनच याची तयारी केली होती. त्यासाठी कंपन्यांना बुकिंग केलेल्या भात, सोयाबीन बियाण्यांची संपूर्ण रक्कम आगाऊ दिली होती. लाखो रुपयांची गुंतवणूक करून कंपनीकडून बियाणे येणार म्हणून विक्रेत्यांनी स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांकडून बुकिंग करून घेतले होते. गेली महिनाभर विक्रेत्यांनी बियाणे पुरवठा करण्यासाठी कंपन्यांचे उंबरठे झिजवले, पण केवळ बुकिंग मालाच्या निम्माच बियाण्यांचा पुरवठा केल्याने विक्रेते अडचणीत आले आहेत. मालही देईनात आणि पैसेही परत करत नाहीत. पैसे मागितले तर पुढील वर्षी मालच देणार नसल्याची तंबी देत असल्याने विक्रेत्यांना तोंड दाबून मुक्याचा मार सहन करावा लागत आहे. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारच्या अंंकात ‘बियाणे कंपन्यांकडून विक्रेत्यांना ठेंगा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी घेतली. त्यांनी याबाबतची संपूर्ण माहिती गोळा करण्यास सुरूवात केली आहे. येत्या दोन दिवसांत संबंधित कंपन्यांची आढावा बैठक घेऊन बियाण्यांची मागणी व पुरवठा याची माहिती घेऊन दोषींवर थेट ‘परवाना रद्द’ची कारवाई करण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे. तुलनात्मक पेर क्षेत्र, हेक्टरमध्ये पीकगतवर्षीयंदाभात१ लाख ३ हजार१ लाख १० हजार सोयाबीन४२ हजार ९००५३ हजार ६००भुईमूग४८ हजार २००५२ हजार १००तूर२८ हजार३० हजारमूग१४ हजार३५ हजारउडिद१५ हजार३० हजार ऊस१ लाख ४५ हजार१ लाख ३२ हजार