शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

वर्षा पर्यटनासाठी कृती आराखडा

By admin | Updated: June 15, 2017 00:01 IST

वर्षा पर्यटनासाठी कृती आराखडा

महादेव भिसे । लोकमत न्यूज नेटवर्कआंबोली : आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी दरवर्षीप्रमाणे लाखो पर्यटक येतात. या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली असून, सावंतवाडी पोलिसांनी आंबोली वर्षा पर्यटनासाठी नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याप्रमाणे स्थानिक पोलिसांबरोबरच मुख्यालयातून पोलिसांची अतिरिक्त कुमक शनिवार व रविवारी बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार आहे. आंबोली वर्षा पर्यटनाचे नियोजन कसे करायचे याबाबत पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व तशा सूचनाही दिल्या आहेत.आंबोली येथे पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोवा, बेळगाव, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्गमधून लाखो पर्यटक येत असतात. शनिवार व रविवारी तर आंबोली पर्यटकांनी फुलून गेलेली असते. अगदी हाऊसफुल्लच असते. आंबोलीपासून मुख्य धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पर्यटकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे या पर्यटकांना काबूत ठेवण्यासाठी अनेक वेळा पोलिसांना सौम्य असा लाठीमारही करावा लागतो. त्यामुळे पोलीस वर्षा पर्यटनाच्या अगोदरच व्यूहरचना आखत असतात. त्याप्रमाणे यावर्षीही पोलिसांनी वर्षा पर्यटनाचा आराखडा तयार केला आहे.पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सहकारी पोलीस कर्मचारी यांच्यासोबत आंबोलीला भेट दिली व तेथील हॉटेल व्यावसायिक व पोलीस मित्रांसोबत बैठक घेतली आणि त्यांना वर्षा पर्यटन कसे सुरळीत होईल याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मद्यपी पर्यटकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या पर्यटकांपासून इतरांना त्रास होणार नाही याची पोलीस मित्रांनी दक्षता घ्यावी, असे धनावडे यांनी सांगितले असून, पोलीस मित्रही वर्षा पर्यटनाच्या गर्दीत काम करणार आहेत.आंबोलीत दरवर्षी मुख्यालयात विशेष पोलीस बंदोबस्त येतो. यावर्षीही त्याच प्रकारे बंदोबस्त मागविण्यात येणार आहे. हा बंदोबस्त शनिवार व रविवारी विशेष जास्त अतिरिक्त कुमक असणार आहे. त्यांच्यासोबत अधिकारीही असणार आहेत. आंबोलीतील मुख्य धबधब्यावर विशेष पर्यटक असतात. त्याचबरोबर कावळेसाद व महादेव गड येथेही पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे तेथेही पोलिसांची नजर राहणार आहे.वर्षा पर्यटन हे विशेषत: शनिवार व रविवारी असते. त्या दिवशीच मोठ्या प्रमाणात पर्यटक हा आंबोलीला येत असतो. त्यामुळे आंबोलीमार्गे जाणारी व येणारी अवजड वाहतूक खाली दाणोलीत वर आंबोलीत उभी करून ठेवण्यात येणार असून, पूर्ण पर्यटक ओसरले की वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षताही घेण्यात येणार आहे. या काळात आंबोली दूरक्षेत्रावर वाढीव पोलीस बंदोबस्त असणार आहे. तसेच इतर दिवशीही पर्यटक येत असतात. त्यामुळे मुख्य धबधबा परिसरात एक-दोन पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार आहेत.