शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

पुराचा सामना करावा लागू नये यासाठी कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांना यापुढे पुराला सामोरे जावे लागू नये, यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपाययोजना राबविण्यासाठीचा ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांना यापुढे पुराला सामोरे जावे लागू नये, यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपाययोजना राबविण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली. करवीर तालुक्यातील वळीवडे, चिंचवाड, वसगडे या पूरबाधित गावांच्या पाहणी दरम्यान त्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या.

मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली. वळीवडे येथील ऊसशेतीच्या नुकसानीची पाहणी ट्रॅक्टरमधून केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शितल मुळे-भामरे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, पंचायत समिती सभापती मंगल पाटील, गावचे सरपंच, ग्रामसेवक, पूरबाधित नागरिक उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी वळीवडे, चिंचवाड भागातून रेल्वे मार्ग जात असून याखालील भरावामुळे नदीचे पाणी अडवले जाऊन हे पाणी शेतात पसरते. त्यामुळे रेल्वे मार्ग उंचावर करून कमानी कराव्यात, त्यामुळे प्रवाहाला अडथळा होणार नाही. पंचगंगा नदी व ओढ्यावरील पुलाखालील भराव काढून कमानी कराव्यात, अतिक्रमणे काढावीत अशी मागणी केली.

यावेळी मंत्री पाटील यांनी पुरामुळे करवीर व हातकणंगले तालुक्यातील नागरिकांचे व शेतीचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबत रेल्वे विभागासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांना नुकसानीचे सरसकट पंचनामे करा. पंचनामे जलदगतीने करा, जेणेकरून मदत वेळेत पोहोचविता येईल. पूरबाधित कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्या, अशा सूचना केल्या.

----

वळीवडेत ३५० हेक्टरचे नुकसान

वळीवडे गावातील सुमारे ३५० हेक्टर तर चिंचवाडमधील ३२५ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले असून पंचनामे लवकरच पूर्ण होतील, असे तहसीलदार शितल मुळे यांनी सांगितले.

---

रुई-इंगळी बंधाऱ्याची पाहणी

करवीरनंतर मंत्री पाटील यांनी रुई-इंगळी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे. रुई-इंगळी बंधाऱ्याबरोबरच नदी, ओढ्यावरील भरावामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करणे, ओढ्यावरील व नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे, गाळ काढणे, गावांचे पुनर्वसन करणे, पूररेषा निश्चित करून नद्यांचे रुंदीकरण या उपाययोजना करणे आवश्यक असून याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, मुरलीधर जाधव, तहसीलदार शरद पाटील उपस्थित होते.

---

फोटो नं १४०८२०२१-कोल-सतेज पाटील पाहणी०१

ओळ : कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी करवीर तालुक्यातील वळीवडे, चिंचवाड, वसगडे या पूरबाधित गावांची पाहणी केली.

---

०२ यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

---