शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई अजित पवार यांना त्रास देण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राज्यातील सत्तेतील नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपचा आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राज्यातील सत्तेतील नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपचा आहे. जरंडेश्वर साखर कारखाना विक्री राज्य बँकेने केली. त्याच्या झालेल्या दोन्ही चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. तरीही ‘ईडी’मार्फत चौकशी लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्रास देण्याचा प्रयत्न असल्याची टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपच्या कार्यकारणी बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अनिल परब यांच्या ‘सीबीआय’ चौकशीचा ठराव केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकारणीत अशा प्रकारचा ठराव करणे, हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे. राज्य सहकारी बँकेने रीतसर टेंडर काढून जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री केली. बँकेच्या कलम ८८ व निवृत्त न्यायाधीशांनी केलेल्या तपासणीत काहीही निष्पन्न झालेले नाही. राज्यातील मंत्र्याच्या स्वीय सहायकांना अटक करणे, त्यांची चौकशी करणे हे नवीन तंत्र भाजपने काढल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

लिंगनूर-मुद्दाळतिट्टा हा रस्ता तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘हायब्रीड ॲन्युटी’ अंतर्गत सुरू केला. मात्र गेली अनेक वर्षे बंद आहे. या कामातील टक्केवारीने ठेकेदार हैराण आहे. या अंतर्गत झालेल्या राज्यातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी आपण केल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे भला माणूस

मंत्री असताना आपण ‘हायब्रीड ॲन्युटी’ अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशीची मागणी कशी करता? असे विचारले असता, मागील सरकारच्या काळात वृक्षलागवड, दुष्काळ व टँकरमध्ये भ्रष्टाचाऱ्याबाबत अनेक वेळा मंत्रिमंडळ बैठकीत आवाज उठवला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भला माणूस आहेत. भाजप कसा गैरफायदा घेते, सत्तेसाठी कशी भीती दाखवली जाते, हे आज त्यांना कळले असेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पायऱ्यांवर बसावे लागल्याचे फडणवीसांना दु:ख

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीस हेच आहेत. १०५ आमदार असूनही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसावे लागते, याचे दु:ख फडणवीस यांना आहे. पडळकर यांनी भान ठेवून बोलवे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेडच्यावतीने घोषणाबाजी

मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा, अधिवेशनात याबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी घोषणाबाजी केली. मंत्री मुश्रीफ यांनीही मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी आता दिल्लीवर धडक दिली पाहिजे, असे सांगत ‘चलो दिल्ली’च्या घोषणा दिल्या.

वेड्या बाईला सासर-माहेर सारखेच

फडणवीस सरकारच्या काळात आंबेअहोळ प्रकल्पाला गती मिळाल्याचे समरजित घाटगे सांगतात, यावर विचारले असता, मुख्यमंत्री कोण जरी असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा केला. येथे श्रेयाचा प्रश्न नाही. लोकांचे जीवन सुखी झाले पाहिजे. टीका करणाऱ्यांना फार महत्त्व देऊ नका, वेड्या बाईला सासर-माहेर साखरेच असते, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.