शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

बदलत्या तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करा

By admin | Updated: February 11, 2017 00:25 IST

नानासाहेब पाटील : विवेकानंद महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान

कोल्हापूर : आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटर, इंटरनेट आॅफ थींग्ज अशा तंत्रज्ञानाने मानवी समाजातील सर्वच क्षेत्रे प्रभावित होत असून रोजगारनिर्मितीत घट होत आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाची कौशल्ये प्रत्येकाने आत्मसात करायला हवीत, असे प्रतिपादन निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी शुक्रवारी केले.विवेकानंद कॉलेजतर्फे विज्ञान दिनानिमित्त शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे आयोजित व्याख्यानात ‘नवनवीन वैश्विक तंत्रज्ञान आणि मानवी समाजाचे भान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे होते.पाटील म्हणाले, २००७ साली यू ट्यूबची सुरुवात, अ‍ॅँड्रॉईडचा विकास, इंटरनेट वापरकर्त्यांत वाढ, ‘आयबीएम’ने माणसासारख्या वागणाऱ्या रोबोची केलेली निर्मिती यांमुळे हे वर्ष क्रांतिकारी ठरले. त्यानंतर प्रत्येक ठरावीक अंतराने तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत गेले आहेत. प्रत्येक चार वर्षांत नवे तंत्रज्ञान येत आहे. संगणक, सायबर स्पेस तंत्रज्ञानाची ही चौथी औद्योगिक क्रांतीच म्हणावी लागेल. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत संपर्काच्या साधनांमध्येही बदल घडून आले आहेत. रोबोटिकसारख्या तंत्रज्ञानाचा वापर व्यापार, उद्योग, शिक्षणव्यवस्था, घरगुती दैनंदिन कामासह मोठ्या हॉस्पिटलमध्येही होत आहे. मायक्रो फिश रोबो तर अचूक रोगनिदान करण्यासाठीही आता वापरला जात आहे. मानवी प्रयत्नांना शक्य नाही अशा ठिकाणी हे तंत्रज्ञान अचूकपणे व वेगाने काम करते. त्यामुळे मानवापेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वच क्षेत्रांत प्रभावी ठरत असून, जगभरातील रोजगारांत घट होत आहे. सध्या माहिती संशोधक, यूएक्स डिझायनरला मोठी मागणी आहे. अशा क्षेत्रांची करिअरच्या दृष्टीने निवड करायल्ाा हवी. प्रा. राजश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. हिंदूराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. विठ्ठल पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)नानासाहेब पाटील म्हणाले, युवा पिढीने उच्च प्रतीचे ध्येय बाळगायला हवे.प्रत्येक शाळा, महाविद्यालयात ‘टेक्नॉलॉजी स्कूल’ व्हायला हवे.‘आयबीएम’ने तयार केलेले ‘वॅटसन सॉफ्टवेअर’ हे मानवी प्रगतीचे सर्वांत मोठे प्रतीक आहे.