शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

बदलत्या तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करा

By admin | Updated: February 11, 2017 00:25 IST

नानासाहेब पाटील : विवेकानंद महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान

कोल्हापूर : आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटर, इंटरनेट आॅफ थींग्ज अशा तंत्रज्ञानाने मानवी समाजातील सर्वच क्षेत्रे प्रभावित होत असून रोजगारनिर्मितीत घट होत आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाची कौशल्ये प्रत्येकाने आत्मसात करायला हवीत, असे प्रतिपादन निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी शुक्रवारी केले.विवेकानंद कॉलेजतर्फे विज्ञान दिनानिमित्त शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे आयोजित व्याख्यानात ‘नवनवीन वैश्विक तंत्रज्ञान आणि मानवी समाजाचे भान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे होते.पाटील म्हणाले, २००७ साली यू ट्यूबची सुरुवात, अ‍ॅँड्रॉईडचा विकास, इंटरनेट वापरकर्त्यांत वाढ, ‘आयबीएम’ने माणसासारख्या वागणाऱ्या रोबोची केलेली निर्मिती यांमुळे हे वर्ष क्रांतिकारी ठरले. त्यानंतर प्रत्येक ठरावीक अंतराने तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत गेले आहेत. प्रत्येक चार वर्षांत नवे तंत्रज्ञान येत आहे. संगणक, सायबर स्पेस तंत्रज्ञानाची ही चौथी औद्योगिक क्रांतीच म्हणावी लागेल. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत संपर्काच्या साधनांमध्येही बदल घडून आले आहेत. रोबोटिकसारख्या तंत्रज्ञानाचा वापर व्यापार, उद्योग, शिक्षणव्यवस्था, घरगुती दैनंदिन कामासह मोठ्या हॉस्पिटलमध्येही होत आहे. मायक्रो फिश रोबो तर अचूक रोगनिदान करण्यासाठीही आता वापरला जात आहे. मानवी प्रयत्नांना शक्य नाही अशा ठिकाणी हे तंत्रज्ञान अचूकपणे व वेगाने काम करते. त्यामुळे मानवापेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वच क्षेत्रांत प्रभावी ठरत असून, जगभरातील रोजगारांत घट होत आहे. सध्या माहिती संशोधक, यूएक्स डिझायनरला मोठी मागणी आहे. अशा क्षेत्रांची करिअरच्या दृष्टीने निवड करायल्ाा हवी. प्रा. राजश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. हिंदूराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. विठ्ठल पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)नानासाहेब पाटील म्हणाले, युवा पिढीने उच्च प्रतीचे ध्येय बाळगायला हवे.प्रत्येक शाळा, महाविद्यालयात ‘टेक्नॉलॉजी स्कूल’ व्हायला हवे.‘आयबीएम’ने तयार केलेले ‘वॅटसन सॉफ्टवेअर’ हे मानवी प्रगतीचे सर्वांत मोठे प्रतीक आहे.