शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

खेबवडेतील जवानाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: November 2, 2016 00:57 IST

मृत्यूबाबत संभ्रम

बाचणी : खेबवडे (ता. करवीर) येथील संग्राम दिनकर चौगले (वय २३) या जवानाचा राजस्थान येथे रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याच्या मृत्यूबाबत संभ्रम आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. संग्राम दिवाळीनिमित्त गावी सुटीवर आला होता; पण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी २९ आॅक्टोबरला त्याला सेवेवर बोलावून घेण्यात आले. दरम्यान, त्याच्यावर काळाने घाला घातला. संग्रामचा जन्म २९ मे १९९३ रोजी झाला. त्याचे वडील वेल्डिंगचे काम करतात, तर आई घरकाम करते. त्याची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच होती. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण २००९ मध्ये खेबवडे हायस्कूलमध्येच झाले, तर १२ वी विज्ञानाचे शिक्षण शाहू कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले. बारावीनंतर तो हैदराबाद येथे लष्करात आर्टिलरी सेंटरमध्ये २०११ मध्ये भरती झाला. त्यानंतर पाच वर्षे सेवा झालेल्या संग्रामचा कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द या गावातील सोनाली ज्ञानदेव जाधव हिच्याशी १२ एप्रिल २०१६ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर तो सेवा बजावण्यासाठी पुन्हा रुजू झाला. लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी तो दहा दिवसांच्या सुटीवर आला होता. मात्र, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी २९ आॅक्टोबरला त्याला सेवेवर हजर राहण्याचा आदेश मिळाल्याने तो तत्काळ कर्तव्य बजावण्यासाठी जात असतानाच त्याचा अपघातात मृत्यू झाला. संग्रामचा भाऊही लष्करात कार्यरत आहे. दरम्यान, या घटनेची उशिरापर्यंत गावासह त्याच्या घरापर्यंत काहीच माहिती नव्हती.