शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा पाटील हिने केली रौप्य पदकाची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 19:19 IST

महिलांच्या वरिष्ठ गटात ६०० पैकी ५७८ गुण मिळवून तिने रौप्यपदकाची कमाई केली. यापूर्वी तिने आशियाई स्पर्धेत कांस्य, तर जागतिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली

कोल्हापूर - दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा अशोक पाटील हिने रौप्यपदकाची कमाई केली आहे. २५ मीटर स्पोर्टस पिस्तल प्रकारात तिने हे पदक पटकावले.तिने या स्पर्धेत महिलांच्या वरिष्ठ गटात ६०० पैकी ५७८ गुण मिळवून रौप्यपदकाची कमाई केली. यापूर्वी तिने आशियाई स्पर्धेत कांस्य, तर जागतिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. ती भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची विद्यार्थिनी असून तिला प्रभारी संचालक प्रा. डॉ. रवींद्र मराठे, व्यवस्थापन प्रमुख डॉ. आर. डी. जाधव, संगणक विभागप्रमुख डॉ. के. एम. अलास्कर, इंद्रजित देसाई, वैशाली पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, गेल्या ६ डिसेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेची चँम्पियन नेमबाज राही सरनोबत हिने डॉ. करणीसिंग शूटिंग रेंजवर ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी चँम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावून विजयाची हॅट्रीक केली. तर अनुष्का पाटील हिने सांघिक युवा गटात १० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. यानंतर आज अभिज्ञा हिने पटकावलेल्या या पदकामुळे कोल्हापूरची मान पुन्हा एकदा उंचावली गेली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर