शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अभय योजनेतून व्यापाऱ्यांना कोटीचा दिलासा

By admin | Updated: June 8, 2015 00:53 IST

‘एलबीटी’ प्रश्न : चार वर्षांतील दंड, व्याज माफ; दोन महिन्यांत तिजोरीत साडेबारा कोटी

गणेश शिंदे - कोल्हापूर --स्थानिक संस्था कर अर्थात ‘एलबीटी’ या करासाठीच्या ‘अभय’ योजनेमधून (अ‍ॅम्नेस्टी स्कीम) कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांचे गेल्या चार वर्षांतील सुमारे शंभर कोटी रुपये वाचल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. तर ही रक्कम सत्तर कोटी रुपयांच्या घरात जाते असे महापालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत राज्य शासनाने मुंबई वगळता सर्व महापालिका प्रशासनांना हा आदेश पाठविला आहे. या अभय योजनेमुळे १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१५ या चार वर्षांच्या कालावधीतील कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील व्यापाऱ्यांचे दंड आणि व्याज माफ होणार आहे. दरम्यान, १ एप्रिल ते ३१ मे २०१५ अखेर या दोन महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत एलबीटीमधून सुमारे साडेबारा कोटी रुपये जमा झाले.कोल्हापूर महापालिकेने १ एप्रिल २०११ रोजी एलबीटी या कराची अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्या वर्षी या कराला शहरातील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. व्यापाऱ्यांनी सुमारे ६० कोटी रुपये एलबीटी भरलाच नाही. त्यामुळे एलबीटीमधून ६० कोटी (१ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ पर्यंत) रुपयांचे उत्पन्न मिळाले. यानंतर एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांचा लढा दिवसेंदिवस वाढत गेला आणि कोल्हापुरात सुरू झालेल्या आंदोलनाचा उद्रेक इतरत्र महापालिका क्षेत्रांमध्ये झाला.याचाच परिपाक म्हणून तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारविरोधात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत व्यापाऱ्यांनी मतदान केले. त्याचे रूपांतर राज्यातील सत्तांतरात झाले. अशी होतेय दंड, व्याजाची आकारणीसध्या महापालिकेकडे शहरातील सुमारे १२ हजार एलबीटीधारक व्यापाऱ्यांची नोंदणी आहे. त्यांपैकी बहुतांश व्यापाऱ्यांनी एलबीटी न भरल्यामुळे त्यांना दंड आणि व्याजाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर व्याजावर व्याज म्हणून चक्रवाढ व्याज लावले जाते. त्यामुळे व्याजाची रक्कम वाढली. महापालिका प्रशासन एलबीटीवर व्यापाऱ्यांकडून महिन्याला दोन टक्के असे मिळून वार्षिक २४ टक्के व्याज घेते; तर पाच ते दहा हजार रुपयांवर दंडाची आकारणी करते.शुक्रवारी मार्गदर्शन मेळावाशहरातील व्यापाऱ्यांना अभय योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या वतीने शुक्रवारी मेळावा दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे. या मेळाव्यात अभय योजनेबाबतची सखोल माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात येणार आहे.राज्य शासनाने अभय योजनेबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. व्यापाऱ्यांच्या लढ्यामुळे हे शक्य झाले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवली. या निर्णयामध्ये युतीचा फार मोठा वाटा आहे.- सदानंद कोरगांवकर, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा उद्योजक वव्यापारी महासंघ.काही व्यापारी नियमित एलबीटी भरतात; पण काही व्यापारी एलबीटी भरत नाहीत. जे व्यापारी एलबीटी भरण्यास टाळाटाळ करतात अशांना दंड आणि व्याज लावले जाते. पण, आता राज्य शासनाने अभय योजना लागू केली आहे. याचा व्यापाऱ्यांना फायदा होईल.- दिलीप कोळी, एलबीटी अधिकारी, कोल्हापूर महापालिका.